शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

न्यायासनावर सर्वांचाच विश्वास

By admin | Updated: September 19, 2016 00:08 IST

प्रथमेश आणि अजय यांच्यावर झालेल्या नरबळी हल्ल्यासंबंधी ग्रामीण पोलिसांनी आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांना अभय दिल्याची भावना सामान्यजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे;..

तक्रारी बेदखल : कार्याध्यक्षांवर लागलेले आरोप गंभीरअमरावती : प्रथमेश आणि अजय यांच्यावर झालेल्या नरबळी हल्ल्यासंबंधी ग्रामीण पोलिसांनी आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांना अभय दिल्याची भावना सामान्यजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे; तथापि आश्रम पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची विनंती करणारा अर्ज आता न्यायासनासमोर असल्यामुळे तपास दडपला जाणार नाही, असा विश्वास सामान्यजन मोठ्या प्रमाणात व्यक्त करू लागले आहेत. मुद्दा संवेदनशील आणि निरागस मुलांवर झालेल्या नरबळी हल्ल्याशी संबंधित असल्यामुळे व्यापक लोकभावना यांसंबंधीच्या घडामोडींशी जुळलेल्या आहेत. आश्रम पदाधिकाऱ्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आश्चर्य वाटावे, असा लोकरेटा उभा ठाकला. त्यात सातत्य होते. धामणगाव, चांदूररेल्वे, अंजनसिंगी, कडकडीत बंद होते. अमरावतीत महामोर्चा निघाला, अमरावतीहून थेट आश्रमावर मार्च नेण्यात आला. नागपुरातील संविधान चौकात धरणे दिले गेले. साऱ्यांची मागणी एकच होती- शंकर महाराज, ट्रस्टीवर गुन्हे नोंदवा, प्रकरणाची सीआयडी चौकशी करा, नरबळी प्रकरण मुळापासून खणून काढा, ज्यांना शक्य होते, ते रस्त्यावर उतरले. परंतु रस्त्यावर न उतरलेले नि याच मागण्यांशी सहमत असलेले हजारो लोक घराघरांत आहेत. मातृत्त्वाचा घात झाल्यामुळे महिलांच्या भावना या प्रकरणाशी विशेषत्त्वाने जुळल्या आहेत. सामान्य लोकांच्या पत्रांमधून त्यांच्या भावनांची तीव्रता स्पष्ट होते.धामणगावचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन.आर.इंदरकर यांच्या न्यायालयात संजय वानखडे या अमरावतीच्या वकिलाने स्वत:हून दाखल केलेला अर्ज, हादेखील 'कॉमन मॅन' जागा झाल्याचेच ज्वलंत उदाहरण म्हणता येईल. क्वचितच प्रकरणी कुणी न्यायासनाकडे धाव घेऊन पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी आर्जव करतात. तपास यंत्रणा गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याची शंका उत्पन्न झाल्यामुळे न्यायासनाकडे धाव घेण्यात आली आहे. समाजातून अंधश्रद्धा आणि त्यामुळे समान्यांचे जीवहानीच्या प्रकारांचे समुळ उच्चाटण व्हावे, यासाठी आग्रह धरणाऱ्या सामान्यजनांचा न्यायालयांवर विश्वास किती गाढा आहे, हे यातून अधोरेखित होते.घराघरांत, चौकाचौकांत चर्चिले जाणारे, अनेक गुढ मुद्यांबाबत सामान्यजनांची उत्सुकता चाळवणारे हे प्रकरण आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या अत्यंत बेकायदा वागणुकीमुळे अधिकच संशय उत्पन्न करणारे ठरले आहे. चौधरी यांच्याकडून प्रथमेशचा घात आजही होऊ शकतो, अशी तक्रार, त्याच्या आप्तेष्टांनी पोलिसांकडे केली आहे. मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे याच्याकडूनही पोलिसांना तक्रार देण्यात आली आहे. गुन्हा कबूल करायला लावणाऱ्यांत, शिवाय बाहेर काढू, असे सांगणाऱ्यांत शिरीष चौधरींचे नाव त्याने घेतले आहे. चौधरी हे कार्याध्यक्ष असताना त्यांच्या आश्रमात नरबळीच्या प्रयत्नांचे गुन्हे घडणे, चौधरींनी त्याबाबतची माहिती लपविणे, अजयच्या आईला खोटी माहिती देणे, प्रकरण उघड झाल्यावर गुन्हेगार म्हणून ज्यांची नावे पोलिसांना दिली त्यातील मुख्य गुन्हेगारानेच चौधरींचे नाव घेणे, प्रथमेशच्या नातेवाईकांनी चौधरींविरुद्ध घातपाताच्या योजनेची तक्रार नोंदविणे, या घटना आंतर्संबंध दर्शविणारी साखळी निर्माण करतात. त्यांचा संबंध थेट आश्रम ट्रस्टच्या कार्याध्यक्षांशी असल्याने आश्रमाविरुद्धचा समान्यांचा संशय सकारण असल्याचे म्हणता येते. कायदे सर्वांसाठीच सारखे आहेत. पोलिस त्यांचा अंमल भलेही आपपर भावाने करतील; न्यायालये मात्र गुन्हे लपू न देण्याचे नि अन्याय दंडित करण्याचे कर्तव्य चोखपणे बजावतातच.