शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

न्यायासनावर सर्वांचाच विश्वास

By admin | Updated: September 19, 2016 00:08 IST

प्रथमेश आणि अजय यांच्यावर झालेल्या नरबळी हल्ल्यासंबंधी ग्रामीण पोलिसांनी आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांना अभय दिल्याची भावना सामान्यजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे;..

तक्रारी बेदखल : कार्याध्यक्षांवर लागलेले आरोप गंभीरअमरावती : प्रथमेश आणि अजय यांच्यावर झालेल्या नरबळी हल्ल्यासंबंधी ग्रामीण पोलिसांनी आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांना अभय दिल्याची भावना सामान्यजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे; तथापि आश्रम पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची विनंती करणारा अर्ज आता न्यायासनासमोर असल्यामुळे तपास दडपला जाणार नाही, असा विश्वास सामान्यजन मोठ्या प्रमाणात व्यक्त करू लागले आहेत. मुद्दा संवेदनशील आणि निरागस मुलांवर झालेल्या नरबळी हल्ल्याशी संबंधित असल्यामुळे व्यापक लोकभावना यांसंबंधीच्या घडामोडींशी जुळलेल्या आहेत. आश्रम पदाधिकाऱ्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आश्चर्य वाटावे, असा लोकरेटा उभा ठाकला. त्यात सातत्य होते. धामणगाव, चांदूररेल्वे, अंजनसिंगी, कडकडीत बंद होते. अमरावतीत महामोर्चा निघाला, अमरावतीहून थेट आश्रमावर मार्च नेण्यात आला. नागपुरातील संविधान चौकात धरणे दिले गेले. साऱ्यांची मागणी एकच होती- शंकर महाराज, ट्रस्टीवर गुन्हे नोंदवा, प्रकरणाची सीआयडी चौकशी करा, नरबळी प्रकरण मुळापासून खणून काढा, ज्यांना शक्य होते, ते रस्त्यावर उतरले. परंतु रस्त्यावर न उतरलेले नि याच मागण्यांशी सहमत असलेले हजारो लोक घराघरांत आहेत. मातृत्त्वाचा घात झाल्यामुळे महिलांच्या भावना या प्रकरणाशी विशेषत्त्वाने जुळल्या आहेत. सामान्य लोकांच्या पत्रांमधून त्यांच्या भावनांची तीव्रता स्पष्ट होते.धामणगावचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन.आर.इंदरकर यांच्या न्यायालयात संजय वानखडे या अमरावतीच्या वकिलाने स्वत:हून दाखल केलेला अर्ज, हादेखील 'कॉमन मॅन' जागा झाल्याचेच ज्वलंत उदाहरण म्हणता येईल. क्वचितच प्रकरणी कुणी न्यायासनाकडे धाव घेऊन पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी आर्जव करतात. तपास यंत्रणा गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याची शंका उत्पन्न झाल्यामुळे न्यायासनाकडे धाव घेण्यात आली आहे. समाजातून अंधश्रद्धा आणि त्यामुळे समान्यांचे जीवहानीच्या प्रकारांचे समुळ उच्चाटण व्हावे, यासाठी आग्रह धरणाऱ्या सामान्यजनांचा न्यायालयांवर विश्वास किती गाढा आहे, हे यातून अधोरेखित होते.घराघरांत, चौकाचौकांत चर्चिले जाणारे, अनेक गुढ मुद्यांबाबत सामान्यजनांची उत्सुकता चाळवणारे हे प्रकरण आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या अत्यंत बेकायदा वागणुकीमुळे अधिकच संशय उत्पन्न करणारे ठरले आहे. चौधरी यांच्याकडून प्रथमेशचा घात आजही होऊ शकतो, अशी तक्रार, त्याच्या आप्तेष्टांनी पोलिसांकडे केली आहे. मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे याच्याकडूनही पोलिसांना तक्रार देण्यात आली आहे. गुन्हा कबूल करायला लावणाऱ्यांत, शिवाय बाहेर काढू, असे सांगणाऱ्यांत शिरीष चौधरींचे नाव त्याने घेतले आहे. चौधरी हे कार्याध्यक्ष असताना त्यांच्या आश्रमात नरबळीच्या प्रयत्नांचे गुन्हे घडणे, चौधरींनी त्याबाबतची माहिती लपविणे, अजयच्या आईला खोटी माहिती देणे, प्रकरण उघड झाल्यावर गुन्हेगार म्हणून ज्यांची नावे पोलिसांना दिली त्यातील मुख्य गुन्हेगारानेच चौधरींचे नाव घेणे, प्रथमेशच्या नातेवाईकांनी चौधरींविरुद्ध घातपाताच्या योजनेची तक्रार नोंदविणे, या घटना आंतर्संबंध दर्शविणारी साखळी निर्माण करतात. त्यांचा संबंध थेट आश्रम ट्रस्टच्या कार्याध्यक्षांशी असल्याने आश्रमाविरुद्धचा समान्यांचा संशय सकारण असल्याचे म्हणता येते. कायदे सर्वांसाठीच सारखे आहेत. पोलिस त्यांचा अंमल भलेही आपपर भावाने करतील; न्यायालये मात्र गुन्हे लपू न देण्याचे नि अन्याय दंडित करण्याचे कर्तव्य चोखपणे बजावतातच.