शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

न्यायासनावर सर्वांचाच विश्वास

By admin | Updated: September 19, 2016 00:08 IST

प्रथमेश आणि अजय यांच्यावर झालेल्या नरबळी हल्ल्यासंबंधी ग्रामीण पोलिसांनी आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांना अभय दिल्याची भावना सामान्यजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे;..

तक्रारी बेदखल : कार्याध्यक्षांवर लागलेले आरोप गंभीरअमरावती : प्रथमेश आणि अजय यांच्यावर झालेल्या नरबळी हल्ल्यासंबंधी ग्रामीण पोलिसांनी आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांना अभय दिल्याची भावना सामान्यजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे; तथापि आश्रम पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची विनंती करणारा अर्ज आता न्यायासनासमोर असल्यामुळे तपास दडपला जाणार नाही, असा विश्वास सामान्यजन मोठ्या प्रमाणात व्यक्त करू लागले आहेत. मुद्दा संवेदनशील आणि निरागस मुलांवर झालेल्या नरबळी हल्ल्याशी संबंधित असल्यामुळे व्यापक लोकभावना यांसंबंधीच्या घडामोडींशी जुळलेल्या आहेत. आश्रम पदाधिकाऱ्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आश्चर्य वाटावे, असा लोकरेटा उभा ठाकला. त्यात सातत्य होते. धामणगाव, चांदूररेल्वे, अंजनसिंगी, कडकडीत बंद होते. अमरावतीत महामोर्चा निघाला, अमरावतीहून थेट आश्रमावर मार्च नेण्यात आला. नागपुरातील संविधान चौकात धरणे दिले गेले. साऱ्यांची मागणी एकच होती- शंकर महाराज, ट्रस्टीवर गुन्हे नोंदवा, प्रकरणाची सीआयडी चौकशी करा, नरबळी प्रकरण मुळापासून खणून काढा, ज्यांना शक्य होते, ते रस्त्यावर उतरले. परंतु रस्त्यावर न उतरलेले नि याच मागण्यांशी सहमत असलेले हजारो लोक घराघरांत आहेत. मातृत्त्वाचा घात झाल्यामुळे महिलांच्या भावना या प्रकरणाशी विशेषत्त्वाने जुळल्या आहेत. सामान्य लोकांच्या पत्रांमधून त्यांच्या भावनांची तीव्रता स्पष्ट होते.धामणगावचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन.आर.इंदरकर यांच्या न्यायालयात संजय वानखडे या अमरावतीच्या वकिलाने स्वत:हून दाखल केलेला अर्ज, हादेखील 'कॉमन मॅन' जागा झाल्याचेच ज्वलंत उदाहरण म्हणता येईल. क्वचितच प्रकरणी कुणी न्यायासनाकडे धाव घेऊन पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी आर्जव करतात. तपास यंत्रणा गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याची शंका उत्पन्न झाल्यामुळे न्यायासनाकडे धाव घेण्यात आली आहे. समाजातून अंधश्रद्धा आणि त्यामुळे समान्यांचे जीवहानीच्या प्रकारांचे समुळ उच्चाटण व्हावे, यासाठी आग्रह धरणाऱ्या सामान्यजनांचा न्यायालयांवर विश्वास किती गाढा आहे, हे यातून अधोरेखित होते.घराघरांत, चौकाचौकांत चर्चिले जाणारे, अनेक गुढ मुद्यांबाबत सामान्यजनांची उत्सुकता चाळवणारे हे प्रकरण आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या अत्यंत बेकायदा वागणुकीमुळे अधिकच संशय उत्पन्न करणारे ठरले आहे. चौधरी यांच्याकडून प्रथमेशचा घात आजही होऊ शकतो, अशी तक्रार, त्याच्या आप्तेष्टांनी पोलिसांकडे केली आहे. मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे याच्याकडूनही पोलिसांना तक्रार देण्यात आली आहे. गुन्हा कबूल करायला लावणाऱ्यांत, शिवाय बाहेर काढू, असे सांगणाऱ्यांत शिरीष चौधरींचे नाव त्याने घेतले आहे. चौधरी हे कार्याध्यक्ष असताना त्यांच्या आश्रमात नरबळीच्या प्रयत्नांचे गुन्हे घडणे, चौधरींनी त्याबाबतची माहिती लपविणे, अजयच्या आईला खोटी माहिती देणे, प्रकरण उघड झाल्यावर गुन्हेगार म्हणून ज्यांची नावे पोलिसांना दिली त्यातील मुख्य गुन्हेगारानेच चौधरींचे नाव घेणे, प्रथमेशच्या नातेवाईकांनी चौधरींविरुद्ध घातपाताच्या योजनेची तक्रार नोंदविणे, या घटना आंतर्संबंध दर्शविणारी साखळी निर्माण करतात. त्यांचा संबंध थेट आश्रम ट्रस्टच्या कार्याध्यक्षांशी असल्याने आश्रमाविरुद्धचा समान्यांचा संशय सकारण असल्याचे म्हणता येते. कायदे सर्वांसाठीच सारखे आहेत. पोलिस त्यांचा अंमल भलेही आपपर भावाने करतील; न्यायालये मात्र गुन्हे लपू न देण्याचे नि अन्याय दंडित करण्याचे कर्तव्य चोखपणे बजावतातच.