शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

सत्ता स्थापनेचा मुद्दा, पोलिसांना अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 6:00 AM

विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा मुद्दा रखडला आहे. सत्ता स्थापनेवरून राजकीय वातावरणात घमासान चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात निश्चित कालावधीपूर्वी सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देक्राईम मिटिंग : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभेचा निकाल लागूून दहा दिवस ओलांडलेत. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. येत्या आठवड्यात होऊ घातलेला अयोध्येतील राममंदिर व बाबरी मशिदीचा मुद्दा, पीएमसी बँक घोटाळा, अवकाळी पावसामुळे शेती पिके बुडाली, त्यांची आंदोलने, या सर्व पार्श्वभूमीवर गृहविभागाकडून अमरावती पोलिसांनीही सजग राहण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. सोमवारी पोलीस आयुक्तालयात आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांची बैठक बोलावण्यात आली. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी पोलीस निरीक्षकांना यासंबंधी सजग राहण्याच्या सूचना केल्यात.विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा मुद्दा रखडला आहे. सत्ता स्थापनेवरून राजकीय वातावरणात घमासान चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात निश्चित कालावधीपूर्वी सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी वर्तविली आहे. त्या अनुषंगानेही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सत्ता स्थापन न झाल्यास काय? यावर जनसामान्यांची नजर रोखली आहे. याबाबत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात संदेश व्हायरल होऊ लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. दरम्यान अयोध्या येथील मंदिर-मशिदीचा मुद्दाही सोशल मीडियावर जोर धरू लागला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यामुळे बँक वर्तुळात प्रचंड खळबळ आहे. बँकेतील पैसे काढून घ्या, इतपत संदेश व्हायरल केले जात आहे.या घडामोडींच्या अनुषंगाने सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांचा बाजार पाहता विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. यासंबंधाने गृहविभागाकडून पोलिसांना सूचना प्राप्त झाल्याची माहिती पुढे येत आहे.पोलिसांच्या सुट्टा रद्दविधानसभा निवडणुकीत पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या होत्या. दिवाळीनंतर पोलिसांना सुट्या देण्यात आल्या. २५ ते ३० टक्के पोलीस सुटीवर गेले होते. मात्र, आता आगामी सण-उत्सवात ईद, गुरुनानक जयंतीनिमित्त पोलिसांना शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज राहावे लागणार आहेत. त्यातच सत्ता स्थापनेचा पेच व अयोध्येचा मुद्दा पुढे असल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस महासंचालकाच्या आदेशाचे संदेश पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसू लागले आहेत. त्यामुळे ज्यांना सुटी घ्यायची होती, ते पोलीस आता चिंतेत पडल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू असल्याचे बोलले जात आहे.अफवांवर विश्वास ठेवू नकासोशल मीडिया, व्हाट्सअ‍ॅप समूहावर सत्ता स्थापनेविषयी व अयोध्येत राम मंदिर व बाबरी मशिद या मुद्द्यावर विविध प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. या संदेशावर व अफवांवर विश्वास ठेवू नका, आगामी सण-उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन तयारीत असून, जनसामान्यांनी कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी केले आहे.

टॅग्स :Policeपोलिस