शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पहिल्या सभेसाठी ‘एके’ अन् ‘आरआय’ अध्यासी अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:20 AM

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक बाकी असल्याने गावागावांतील वातावरण तापलेलेच आहे. आता ...

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक बाकी असल्याने गावागावांतील वातावरण तापलेलेच आहे. आता ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान यासाठी संबंधित ग्रामपंचायतींची पहिली सभा घेण्यात येईल. यासाठी अव्वल कारकून (एके) व मंडळ अधिकारी (आरआय) यांची अध्यासी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी काढले.

ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत २ व ४ फेब्रुवारीला सर्व तालुक्यांमध्ये पार पडल्याने या पदाच्या आरक्षणाचा तिढा सुटला आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवारांना सरपंचपदाचे वेध लागले व गावगाड्यात तडजोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. काही गावांत एका गटाला बहुमत असले तरी सरपंचपदाचा उमेदवार अन्य गटाजवळ असल्याने फोडाफोडीच्या राजकारणालाही सुरुवात झालेली आहे. यासाठी गावातील पदाधिकारीदेखील लक्ष देऊन आहेत.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३० व ३३ नुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीनुसार प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.

बॉक्स

तालुकानिहाय निवडणूक तारीख

भातकुली तालुक्यात ११ ते १६ फेब्रुवारी, तिवसा व चांदूर रेल्वे ११ ते १५, मोर्शी व अंजनगाव सुर्जी ११ ते १६, धारणी ११ ते १७ तसेच अमरावती, चांदूर बाजार, चिखलदरा, वरूड, अचलपूर व दर्यापूर ११ ते १७, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक होईल.

बॉक्स

राखीव उमेदवार नसल्यास या उमेदवारांना संधी

राखीव प्रवर्गात सरपंचपदाचा उमेदवार नसल्यास व व याच प्रवर्गातील सर्वसामान्य प्रभागातून निवडून आलेला उमेदवार सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. मात्र, त्यांना जात वैधता प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.