शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

यात्रेनंतर बहिरम मंदिर परिसर बकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:10 PM

विदर्भातील सुप्रसिध्द आणि दीर्घकाळ चालणारी बहिरम यात्रा २० फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. दोन महिने रोज मटनाच्या हंडीचे बेत अनुभवणाऱ्या बहिरम यात्रा परिसरात तुर्तास घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

ठळक मुद्देसर्वत्र कचरा : प्लास्टिकचा खच, मातीच्या फुटक्या हंडी कायम

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : विदर्भातील सुप्रसिध्द आणि दीर्घकाळ चालणारी बहिरम यात्रा २० फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. दोन महिने रोज मटनाच्या हंडीचे बेत अनुभवणाऱ्या बहिरम यात्रा परिसरात तुर्तास घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मंदिर परिसरासह नजिकच्या शेती व खुल्या जागांमध्ये शेकडो टन ओला व सुका कचरा विखुरलेल्या स्थितीत असल्याने हेच काय ते वैभवशाली बहिरम? असा प्रश्न भाविक उपस्थित करीत आहेत.दरवर्षी २० डिसेंबर रोजी होमहवनाने बहिरम यात्रेस सुरुवात होत असते. दोन महिने लाखो भाविकांची वर्दळ असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. येथील चुलीवर हंडीत शिजविलेल्या मटनाची ख्याती औरच. मात्र, यात्रा संपल्यानंतर त्याच चुली कचरा झाल्या आहेत. त्या मातीची धूळ प्रदुषणात भर पाडणारी ठरली आहे. यात्रा संपल्यानंतर परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढिग साचले आहेत. स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. यात्रा व्यवस्थापकांचे याकडे दुर्लक्ष असून, ते ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत आहेत. कचºयाची विल्हेवाट लावण्याचे औदार्य त्यांनी दाखवलेले नाही.प्लास्टिक बंदीचा फज्जायात्रेतील स्वच्छतागृहातील घाण तशीच पडून आहे. स्वच्छतागृहाची देखभाल व दुरूस्ती आणि दुर्दशा शब्दापलिकडची ठरली आहे. प्लास्टिक बंदीचा फज्जा कसा उडातोय, हे दर्शविणारी ही यात्रा राज्यात सर्वोत्तम उदाहरण ठरली आहे. यात्रेत सर्रास प्लास्टिकचा वापर करण्यात आला. ते प्लास्टिक, पिशव्या यात्रा परिसरात सर्वत्र विखुरल्या आहेत.आरोग्य धोक्यातयात्रेतील घाण, कचरा, घोंगावणाºया माशा गावांसह बहिरमचे ग्रामस्थ आणि यात्रेकरूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत आहेत.यात्रेच्या सुरूवातीला यात्रेत आढळून न येणाºया माशा यात्रा संपताना शेवटीच बघायला मिळतात. ही बाब इंग्रजांनी गॅझेटीयरमध्येही नोंदविली होती.