शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:01 IST

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नाही, ही भूमिका राज्य शासनाने घेतली व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय आयोगाकडे सुपूर्द करण्यात आलेले निवडणुकीसंदर्भातील काही अधिकार शासनाकडे परत घेतले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील ओबीसी आरक्षणाचा तूर्तास न संपणारा घोळ  असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद, दहा पंचायत समित्या व महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली व प्रशासकांची नियुक्ती झाली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे. जिल्ह्यात सध्या २७० ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडल्यास प्रशासकाची नियुक्ती होणार का, याबाबतची चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या २७ जानेवारीच्या आदेशान्वये जिल्ह्यात सध्या २७० ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली व ४ मार्चपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. यावर १५ मार्चला उपविभागीय अधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी घेण्यात येणार आहे. २९ मार्चला जिल्हाधिकारी अंतिम प्रभागरचना जाहीर करणार आहेत. आठवड्यात ज्या पद्धतीने घडामोडी झाल्यात, विधेयक पारित झाले, ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नाही, ही भूमिका राज्य शासनाने घेतली व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय आयोगाकडे सुपूर्द करण्यात आलेले निवडणुकीसंदर्भातील काही अधिकार शासनाकडे परत घेतले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील ओबीसी आरक्षणाचा तूर्तास न संपणारा घोळ  असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे.

इच्छुकांच्या तयारीवर फेरले पाणीजिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली होती. या तयारीवर आता पाणी फेरले गेले आहे. ग्रामपंचायतीसाठी आयोग किंवा ग्रामविकास विभागाकडून सध्या तरी काही आदेश नाहीत. मात्र, निवडणूक लांबणीवर पडल्यास गावपातळीवरील इच्छुकांना पुन्हा काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्याजिल्ह्यात जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २७० ग्रामपंचायती आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यात १३, भातकुली १२, तिवसा १६, अचलपूर २३, चांदूरबाजार २५, दर्यापूर २४, अंजनगाव १३, मोर्शी २४, वरूड २३, चांदूर रेल्वे २८, धामणगाव रेल्वे ७, नांदगाव खंडेश्वर १७, धारणी २६ व चिखलदरा तालुक्यात २९ ग्रामपंचायती आहेत.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतOBC Reservationओबीसी आरक्षण