शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:01 IST

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नाही, ही भूमिका राज्य शासनाने घेतली व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय आयोगाकडे सुपूर्द करण्यात आलेले निवडणुकीसंदर्भातील काही अधिकार शासनाकडे परत घेतले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील ओबीसी आरक्षणाचा तूर्तास न संपणारा घोळ  असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद, दहा पंचायत समित्या व महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली व प्रशासकांची नियुक्ती झाली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे. जिल्ह्यात सध्या २७० ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडल्यास प्रशासकाची नियुक्ती होणार का, याबाबतची चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या २७ जानेवारीच्या आदेशान्वये जिल्ह्यात सध्या २७० ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली व ४ मार्चपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. यावर १५ मार्चला उपविभागीय अधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी घेण्यात येणार आहे. २९ मार्चला जिल्हाधिकारी अंतिम प्रभागरचना जाहीर करणार आहेत. आठवड्यात ज्या पद्धतीने घडामोडी झाल्यात, विधेयक पारित झाले, ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नाही, ही भूमिका राज्य शासनाने घेतली व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय आयोगाकडे सुपूर्द करण्यात आलेले निवडणुकीसंदर्भातील काही अधिकार शासनाकडे परत घेतले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील ओबीसी आरक्षणाचा तूर्तास न संपणारा घोळ  असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे.

इच्छुकांच्या तयारीवर फेरले पाणीजिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली होती. या तयारीवर आता पाणी फेरले गेले आहे. ग्रामपंचायतीसाठी आयोग किंवा ग्रामविकास विभागाकडून सध्या तरी काही आदेश नाहीत. मात्र, निवडणूक लांबणीवर पडल्यास गावपातळीवरील इच्छुकांना पुन्हा काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्याजिल्ह्यात जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २७० ग्रामपंचायती आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यात १३, भातकुली १२, तिवसा १६, अचलपूर २३, चांदूरबाजार २५, दर्यापूर २४, अंजनगाव १३, मोर्शी २४, वरूड २३, चांदूर रेल्वे २८, धामणगाव रेल्वे ७, नांदगाव खंडेश्वर १७, धारणी २६ व चिखलदरा तालुक्यात २९ ग्रामपंचायती आहेत.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतOBC Reservationओबीसी आरक्षण