शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

पटेलांविना हतबल अवघे प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:24 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ठिय्या देत असलेल्या ७०० आदिवासी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी राजकुमार पटेलांना सोबत घेऊन शिष्टाई करावी, ...

ठळक मुद्देराणांची शिष्टाई : अमरावती, अकोला जिल्हाधिकाऱ्यांसह सीसीएफ डेरेदाखल

आॅनलाईन लोकमतअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ठिय्या देत असलेल्या ७०० आदिवासी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी राजकुमार पटेलांना सोबत घेऊन शिष्टाई करावी, असा संदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी आ. रवी राणा यांना बुधवारी दिला. प्रशासनासोबत चर्चा करण्यास पटेल यांनी होकार दिला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी शासनाचे पत्रदेखील पटेल यांना दिले. दरम्यान प्रशासनाचे अधिकारी पोहचण्यापूर्वीच पटेल निघून गेल्याने सर्व ताफा मेळघाटात खोळंबला आहे.जिल्हाधिकारी व आ. रवि राणा यांच्यात बुधवारी चर्चा झाली. मात्र, पटेल प्रशासनासी चर्चा करण्यासाठी अमरावतीत येण्यास उत्सुक नसल्याने दुपारी ३ वाजतादरम्यान आ. राणा, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अकोला जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस रेड्डी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक एम.एम. मकामदार आदींनी मेळघाटकडे कूच केले. दुपारी प्रशासनाचा राजकुमार पटेलांशी संपर्क झाला. मात्र, सायंकाळी उशिरा सर्व अधिकारी धारगड विश्रामगृहात पोहोचले होते. मात्र, त्यांचा संपर्क पटेलांसी होऊ शकला नसल्याची माहिती आहे. प्रशासनाचे हे सर्व अधिकारी आदिवासी प्रकल्पग्रस्तांसोबत संवाद साधण्याकरिता उशिरा रवाना झाले. उशिरा मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाच्यावतीने तेलपाणी येथे १० तसेच अमरावती व दर्यापूर आगारात त्याचप्रमाणे अकोट व तेल्हारा येथे काही बसेस प्रकल्पग्रस्तांना आणण्यास तयार ठेवण्यात आलेल्या आहेत.एकीकडे या प्रकरणातून मान मोकळी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाचे अधिकारी राजकुमार पटेलांची मदत घेत असताना त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असल्याने शासनाची नेमकी भूमिका कोणती, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आठ गावांच्या पुनर्वसनात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. शेतीच्या मोबदल्यात शेती व भूमिहिनांना २.५ एकर शेती व प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा लाभ यासह अन्य सुविधा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बैठकीत दिले. मात्र, या आश्वासनाचा सोईस्कर विसर पडला, याचे निषेधार्थ आदिवासी बांधवांनी पोलीस व वन विभागाला गुंगारा देत पुन्हा मेळघाट वाघ्र प्रकल्पात ठिय्या मांडला आहे.मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, प्रशासनाची लेखी विनंतीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राजकुमार पटेल यांच्याशी संपर्क साधून प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटपाचे धोरण लवकरच जाहीर केले जाईल व लागवडयोग्य जमीन वाटपाची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी (अकोला) यांनी पुनर्वसित गावांलगतची २०० एकर ई-क्लास जमीन सुनिश्चित केली आहे. तसेच धारणी व चिखलदरा तालुक्यातील लागवडीस योग्य जमीन निश्चित करण्यात येऊन प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलेला असल्याचे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी पटेल यांना बुधवारी अवगत करून प्रकल्पग्रस्तांना आंदोलनापासून परावृत्त करावे, अशी विनंती लेखी पत्राद्वारे केली. याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बैठक घेतली आहे. त्यानंतर २८ नोव्हेंबरला विभागीय आयुक्तांनी व ११ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. मात्र, शासन आश्वासन पाळत नाही. याच्या निषेधार्थ आदिवासी बांधवांनी चार दिवसांपासून मेळघाटात ठिय्या दिल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.राजकुमार पटेलांच्या खेळीने पोलिसांचा डाव पुन्हा फसलाप्रकरण धारणी न्यायालयात : 'से साठी १६ तारीखआॅनलाईन लोकमतधारणी : येथील न्यायालयात राजकुमार पटेल यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यावरून दोन फौजदारी प्रकरणात जामीन अर्ज रद्द करून ताब्यात घेण्याचा डाव फसल्याने पोलिसांच्या हाती निराशा आली. या दोन्ही प्रकरणातील अधिवक्ता हे न्यायालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे आरोपी राजकुमार पटेलांतर्फे ‘से’ बुधवारी दाखल करण्यात न आल्याने प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे.राजकुमार पटेलांविरुद्ध न्यायालयीन एसडीओ संजय मीणा यांच्याशी बाचाबाची केल्याप्रकरणी २०१४ मध्ये आरोपपत्र धारणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आले होते. गतवर्षी एमएसईबीच्या प्रांगणात कर्तव्यावर हजर असणाºया पीएसआय सविता वड्डे यांच्यासोबतसुद्धा बाचाबाची केल्याप्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणात न्यायालयाने राजकुमार पटेल यांना काही अटी व शर्तींचे अधीन राहून जामीन दिला होता.खारी येथील प्रकरणातही पोलिसांचा मुख्य आरोपी हा राजकुमार पटेलच असल्याने धारणी न्यायालयातील प्रकरण त्यांनी अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे त्यांचे धारणीतील प्रलंबित प्रकरणांतील जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता. हे प्रकरण बुधवारी आरोपी राजकुमार पटेल यांचा से साठी ठेवण्यात आले होते. मात्र, से दाखल करण्यात न आल्याने हे प्रकरण १६ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. त्यामुळे पटेलांना अटक करण्याचा पोलिसांचा डाव आजही फसला. पोलिसांचे राजकुमार पटेलांना अटक करण्याचे डाव दरवेळी फसत असतानाच उद्या गुरुवारी खादी प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. आता सर्वांचे लक्ष अचलपूर न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.