शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रहार’ची वेगळी चूल, आनंदराव अडसूळ निवडणूक लढविण्यावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 22:56 IST

अमरावतीत भाजपचा उमेदवार वेटिंगवर; महायुतीत ‘ऑलवेल’ नाहीच

गणेश वासनिक

अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी अमरावती लोकसभा मतदार संघ हा भाजपच लढविणार, असे जाहीर केले आहे. मात्र, उमेदवार कोण? याबाबत पत्ते ओपन केले नाही. तर दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहारचे बच्चू कडू आणि शिंदे सेनेेचे आनंदराव अडसूळ यांनी वेगळी भूमिका घेण्याची तयारी चालविल्याने महायुतीत ‘ऑलवेल’ नाही असे दिसून येते.

काँग्रेसने आमदार बळवंत वानखडे यांची अमरावतीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. वानखडे यांनी भेटीगाठी सुरू केल्या असताना भाजप अथवा महायुतीकडून उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले नाही. शिंदे सेेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अमरावती मतदार संघ हा शिवसेनेचा असून तो आम्ही मागणार आणि लढविणार अशी भूमिका घेतली आहे. तर प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी महायुतीत आम्हाला विचारले जात नसेत तर वेगळी चूल मांडू असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. एवढेच नव्हे तर ३ एप्रिल रोजी प्रहार उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली. महायुतीत अमरावती लोकसभा जागेचा वाद संपुष्टात आला नाही. आता अमरावतीत उमेदवारी कोणाला याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असून त्यांच्या कोर्टात हे प्रकरण गेल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राणा दाम्पत्यांनी भाजपची उमेदवारी मिळणार याविषयी ते ठाम असून प्रचारदेखील सुरू केला आहे. खासदार नवनीत राणा यांनी गत पाच वर्षांपासून भाजपचेच काम करीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. असे असले तरी अमरावतीची जागा कोणाच्या वाट्याला आणि उमेदवार कोण? हे येत्या आठवड्यात स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांचा फोन

आमदार बच्चू कडू यांना २६ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी अमरावती लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईला बोलावले, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांच्या चर्चेनंतर बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मान अपमान जर समजून घेतला नाही तर वेळ आली तर पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करू, असे आमदार कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा करायला हरकत नाही पण अपमान कोणी सहन करणार नाही, अशी भूमिका त्यांची आहे. राणा विरोधात कार्यकर्त्यांची नाराजी आहे. राणांचा प्रचार केला तर प्रहारमधून बाहेर पडू असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, असेही आमदार कडू म्हणाले.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४