शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

८० टक्के पावसाळा संपला, जलसाठा ५० टक्केच उरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 15:13 IST

अपुरे पर्जन्य : १५ लघु प्रकल्पांच्या साठ्यात झपाट्याने होत आहे घट

अमरावती : जूनमध्ये तीन आठवडे मान्सूनला विलंब झाला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही पावसाची दडी, त्यामुळे पावसाची तूट आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ लघु प्रकल्पांमध्ये अद्याप ५० ते ६० टक्केच जलसाठा आहे. यातही झपाट्याने घट होत आहे. त्यातच ८० टक्के पावसाळा आता संपलेला आहे. त्यामुळे प्रकल्पांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

पावसाळ्याचे जून ते सप्टेंबर म्हणजेच १२० दिवस गृहीत धरण्यात येतात. यातील ९३ दिवस पार झाले तरी जिल्ह्यात ४० टक्के तूट आहे. जिल्ह्यात केवळ चांदूरबाजार तालुकावगळता १३ तालुक्यांत पावसाची ६० ते ३० टक्क्यांपर्यंत तूट आहे. केवळ जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठली होती. त्यामुळे ही सरासरी दिसून येत आहे. दशकात यंदा सर्वांत कमी पाऊस ऑगस्ट महिन्यात झाला आहे. त्यामुळे लघु प्रकल्पात पुरेसा साठा झालेला नसल्याचे चित्र आहे.

केवळ नांदगाव तालुक्यातील पिंपळगाव, मोर्शी तालुक्यातील दाभेरी, वरुड तालुक्यातील लोणी धवलगिरी, धारणी तालुक्यात रभांग, मोगर्दा व बोबदो लघु प्रकल्पात शत-प्रतिशत जलसाठा आहे.

या लघु प्रकल्पात जलसाठा कमी

१) मालखेड, बासलापूर, जळका, भिवापूर, बेलसावंगी, साद्राबाडी, गावलानडोह, सावलीखेडा, मांडवा, सालई, गंभेरीसह अनेक लघुप्रकल्पांवर ५० ते ७० टक्के एवढाच जलसाठा आहे.

२) लघुप्रकल्पाची साठवण क्षमता कमी असल्याने जलसाठ्यात झपाट्याने कमी येत असते. त्यामुळे लघुप्रकल्प परिसरात दमदार पाऊस होईस्तोवर या प्रकल्पात जलसाठा वाढणार नाही.

टॅग्स :Waterपाणीmonsoonमोसमी पाऊसRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण