शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

पश्चिम विदर्भातील ५११ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात पाच टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:10 AM

अमरावती/ संदीप मानकर पश्चिम विदर्भातील ५११ सिंचन प्रकल्पांमध्ये १० जूनच्या अहवालानुसार २६.४६ टक्के पाणीसाठा होता. मात्र, विदर्भात मान्सूनच्या आगमनामुळे ...

अमरावती/ संदीप मानकर

पश्चिम विदर्भातील ५११ सिंचन प्रकल्पांमध्ये १० जूनच्या अहवालानुसार २६.४६ टक्के पाणीसाठा होता. मात्र, विदर्भात मान्सूनच्या आगमनामुळे आठवड्याभरातच पाणीसाठ्यात ५.०३ टक्क्यांनी वाढ झाली असून, सद्यस्थितीत ५११ प्रकल्पांमध्ये सरासरी ३१.४९ टक्के पाणीसाठा आहे. ही नागरिकांसाठी आनंदाची बाब ठरली आहे.

यंदा पश्चिम विदर्भात १० जूननंतर मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे काही नद्यासुद्धा दुथडी भरून वाहिल्या. परिणामी उन्हाळ्यात घट झालेल्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात तरी वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदासुद्धा चांगला पाऊस बरसणार असून, प्रकल्प शंभर टक्के भरण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

१९ जूनच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, १० जून रोजी नऊ मोठ्या प्रकल्पात ३२.२४ टक्के पाणीसाठा होता. आता त्यात वाढ होऊन तो ३७.१५ टक्के झाला. २५ मध्यम प्रकल्पांत ३०.३५ टक्के पाणीसाठा होता. आता ३६.७७ टक्के झाला. ४७७ लघू प्रकल्पांत १६.९५ टक्के पाणीसाठा होता. आता मात्र वाढ होऊन २१.०२ टक्के झाला आहे. ५११ सिंचन प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा हा १०३१.४७ दलघमी आहे. त्याची सरासरी ३१.४१ टक्के आहे. पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने सध्या तरी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. प्रकल्प शंभर टक्के भरल्यास हजारो हेक्टरला सिंचनाचीसुद्धा सोय होणार आहे. सध्या नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३७.१५ टक्के, २५ मध्यम प्रकल्पांमध्ये ३६.७७ टक्के, तर ४७७ लघु प्रकल्पांमध्ये २१.०२ टक्के पाणीसाठा आहे.

बॉक्स:

नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ४४.६५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३५.८५ टक्के, अरुणावती २८.९५ टक्के, बेंबळा ५२.५१ टक्के पाणीसाठा आहे, तर अकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा प्रकल्प ३०.४० टक्के, वान ३३.७० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात २८.७२ टक्के, पेनटाकळी २६.६१ टक्के, तर खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. अमरावती जिल्ह्यतील तीन मध्यम प्रकल्पात ४८ टक्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे, तर यवतमाळ जिल्ह्यतील दोन प्रकल्पात ४७ टक्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमध्ये ४३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.