शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात यंदा नैसर्गिक आपत्तीचे ४४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 16:43 IST

७,५३९ हेक्टर क्षेत्र बाधित : ४५ गंभीर जखमी, लहान-मोठी १०४ जनावरे मृत  

अमरावती : यंदा जून कोरडाच गेला. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले. या ७५ दिवसांदरम्यान पश्चिम विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे ४४ व्यक्ती मृत पावले. यापैकी ३६ प्रकरणांत १.४४ कोटींची मदत देण्यात आली. अद्याप ८ प्रकरणे प्रलंबित आहेत. याच अवधीत लहान-मोठी १०४ जनावरे दगावली आहेत. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे ७,५३९ हेक्टर शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले.

विभागात १६ ऑगस्टपर्यंत नैसर्गिक आपत्तीचे सर्वाधिक १६ जणांचा मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात झालेले आहे. अमरावती जिल्ह्यात १०, अकोला ७, बुलडाणा ८ व वाशीम जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये ११ व्यक्ती पुरात वाहून गेल्याने, तर २३ जण वीज पडून ठार झालेत. आपत्तीच्या इतर कारणांनी १० व्यक्ती मृत झाल्या आहेत. यासाठी अमरावती जिल्ह्यात २० लाख, अकोला २० लाख, यवतमाळ ६४ लाख, बुलडाणा २८ लाख, तर वाशीम जिल्ह्यात १२ अशीे एकूण एक कोटी ४४ लाखांची मदत शासनातर्फे देण्यात आली आहे.

विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे ११७ जनावरे दगावली. यामध्ये मोठी दुधाळ ५९ जनावरे, २८ लहान दुधाळ, तर ओढकाम करणारी २५ मोठी व १३ लहान जनावरांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात एकूण २४ जनावरे नैसर्गिक आपत्तीत मृत पावली, अकोला जिल्ह्यात १०, यवतमाळ जिल्ह्यात ३५, बुलडाणा जिल्ह्यात ३४ व वाशीम जिल्ह्यात १३ जनावरांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणात एकूण १९.५७ लाखांची शासकीय मदत देण्यात आलेली आहे. या कालावधीत नदी-नाल्यांना पूर आल्याने तसेच शेतात पाणी साचल्याने ७,५३९ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापैकी ४,०२२ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ४,१२३ हेक्टर क्षेत्र बुलडाणा, तर ३,३१९ हेक्टर क्षेत्र अकोला जिल्ह्यातील आहे.

 ३,९४४ घरांची, १०० गोठ्यांची पडझडपावसाळ्याच्या या अडीच महिन्यांच्या कालावधीत अमरावती विभागात ३,९४४ घरांची पडझड झाली. यासाठी ६.५७ लाखांचे सानुग्रह अनुदान बाधितांना देण्यात आले आहे. यामध्ये पूर्णत: पडझड झालेली २५३ घरांचा समावेश आहे. अंशत: ३६६७ व नष्ट झालेल्या झोपड्यांची संख्या १७ आहे. तसेच वाशीम वगळता अन्य चार जिल्ह्यांतील १०० गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या व्यतिरिक्त २ सार्वजनिक मालमत्ता व ७९ खासगी मालमत्तेचे नुकसान झालेले आहे.

टॅग्स :Natural Calamityनैसर्गिक आपत्ती