शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

३९४ उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. यात सन २०१५ मध्ये निवडणूक लढविलेल्या पाच तालुक्यांतील ...

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. यात सन २०१५ मध्ये निवडणूक लढविलेल्या पाच तालुक्यांतील ३९४ उमेदवारांना निवडणूक लढविण्यास अपात्र करण्यात आलेले आहे. या उमेदवारांनी त्यावेळी विहित मुदतीत खर्च सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे व अशा उमेदवारांची माहिती जिल्हा निवडणूक विभागाद्वारा संबंधित तालुक्यांना पाठविण्यात आलेली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निकाल जाहीर झाल्याचे आत सक्षम प्राधिकाऱ्याकडे निवडणूक खर्च सादर करणे प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक आहे. जिल्ह्यात यापूर्वी सन २०१५ मध्येदेखील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. यात १ नोव्हेंबरला मतदान व ३ नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या आत या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे संबंधित तहसीलदारांनी ही प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली. या सर्व प्रकरणात सुनावणी झाली. यामध्ये अनेक उमेदवार सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहिले. त्यामुळे तत्कालीन जिल्हधिकारी अभिजित बांगर यांनी या उमेदवारांना सहा वर्षांसाठी अनर्ह ठरविले. त्यामुळे या सर्व उमेदवारांना आता २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही. ९९ ग्रामपंचायतींमधील ३९४ उमेदवारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे. आता पुन्हा ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली असताना या सर्व उमेदवारांना निवडणूक लढता येणार नसल्याने त्यांच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेले आहे.

पाईंटर

जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती : ८४०

आलेख

सन २०१५ मधील निवडणुकीत अपात्र ठरलेले उमेदवार

अमरावती : २८

भातकुली : १७८

नांदगाव खंडेश्वर : ६३

चांदूर रेल्वे : ६५

धामणगाव रेल्वे : ६०

बॉक्स

सदस्यसंख्येनुसार निवडणूक खर्च

* ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवाराला खर्चाची मर्यादा ही त्या ग्रामपंचायतींचे सदस्यसंख्येनुसार आहे. यामध्ये ७ ते ९ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये २५ हजार, ११ ते १३ सदस्यसंख्येच्या ग्रामपंचायतींमध्ये ३५ हजार व १५ ते १७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी ५० हजार रुपये निवडणूक खर्चाची मर्यादा आहे.

* उमेदवारांना या खर्चाचे मर्यादेत राहून निवडणुकीचा खर्च करावा करावा लागतो व हा खर्च बिलासहीत सक्षम प्राधिकाऱ्याकडे नोंदवावा लागतो. निवडणूक निकाल जाहीर झाल्याचे एक महिन्याचे आत सादर न केल्यास त्यांना निवडणूक विभागाद्वारा नोटीस बजावली जाते व त्यानंतरही हिशोब सादर न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होते.