शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! मेळघाटात 6 महिन्यांत आठ मातांसह ३६४ बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 21:18 IST

टायरअभावी आरोग्य विभागाची वाहने उभी; औषधांच्या तुटवड्यामुळे हाल

- नरेंद्र जावरे परतवाडा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात सहा महिन्यांत आठ मातांसह ३६४ बालकांचा विविध आजाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत रविवारी तिसऱ्यांदा धारणी तालुक्यातील बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देणार आहेत. टायरअभावी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका उभ्या असून, लहान बालकांसाठी आवश्यक औषधसाठा तेथे उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे.मेळघाटात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत ० ते ६ वयोगटातील २६४ बालके दगावली, तर शंभर उपजत बालकांचा मृत्यू, अशी एकूण १८० दिवसांत ३६४ बालके दगावली. ऑक्टोबर महिन्यात दहा दिवसांत ११ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद नुकतीच झाली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक बालमृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली असून, गेला आठवडाभर आरोग्य संचालक नागपूर व अकोला येथील आरोग्य उपसंचालक व इतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेळघाटचे दौरे केले. आरोग्य केंद्रांना भेटी दिल्यात. यामध्ये मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक वाहनांना टायर नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे मत स्वयंसेवी संस्थेचे बंड्या साने यांनी शासनाकडे मांडले असून, बालमृत्यूची आकडेवारीसुद्धा त्यांनी शुक्रवारी न्यायालयात सादर केली.बाल व स्त्रीरोगतज्ज्ञ दाखल, मात्र औषधांचा पत्ताच नाहीमेळघाटातील बालमृत्यूचे तांडव पाहता तीन स्त्रीरोगतज्ज्ञ व सात बालरोग तज्ञांची तत्काळ नियुक्ती काही दिवसांसाठी करण्यात आली. मेळघाटातील खेड्यापाड्यांत जाऊन हे तज्ञ डॉक्टर माता आणि बालकांची तपासणी करत आहेत. परंतु, बालकांसाठी सर्दी, खोकला, तापासाठी उपयोगी औषध आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने दिली. 

न्युमोनियाने आठ मातांचा मृत्यूऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक बालमृत्यू धारणी तालुक्यात झाले. त्यात न्युमोनियाने बालमृत्यूची संख्या वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात धारणी व चिखलदरा तालुक्यात १२ दिवसांत ११ बालकांचा मृत्यू झाला. गत दोन महिन्यांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. सहा महिन्यात आठ मातामृत्यू झाले. यात मध्यप्रदेश व बाहेरगावी ५ मृत्यू झाले असून तीन मेळघाटात झाल्याचे आरोग्य विभागाने कळवले.

सहा महिन्यांत ० ते सहा वर्षांच्या आतील २६४ व उपजत शंभर बालकांचा मृत्यू झाला. ऑक्टोबर महिन्यात बालमृत्यू रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. बालरोग, स्त्रीरोग तज्ज्ञ मेळघाटात कार्यरत आहे. वाहनांना टायर व औषधसाठा दिला जात आहे.- सुरेश असोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती 

टॅग्स :Deathमृत्यूMelghatमेळघाटHealthआरोग्य