शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

३३ कोटी वृक्ष लागवडीतील झाडे करपली अन्‌ गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST

अक्षम्य दुर्लक्ष, वनविभाग, सामाजिक वनीकरण वगळता अन्य ६९ यंत्रणांचे वृक्ष लागवड केवळ कागदोपत्रीच अमरावती : फडणवीस सरकारच्या काळात ...

अक्षम्य दुर्लक्ष, वनविभाग, सामाजिक वनीकरण वगळता अन्य ६९ यंत्रणांचे वृक्ष लागवड केवळ कागदोपत्रीच

अमरावती : फडणवीस सरकारच्या काळात सन २०१९ मध्ये राबविण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीतून जिल्ह्यात बहुतांश झाडे करपली असून, काही झाडे गायबही झाल्याचे वास्तव आहे. वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग वगळता अन्य ६९ यंत्रणांची वृक्ष लागवड मोहीम केवळ ‘फोटो सेशन’ पुरतीच होते का, असा सवाल उपस्थित होत आहे.

३३ कोटी वृक्ष लागवडीतून जिल्ह्यात १ कोटी १० लाख ४५ हजार ४२४ रोपे लावण्यात आले. त्यापैकी मे २०२० पर्यंत ७६ लाख ३८ हजार १४३ रोपे जीवंत असल्याची आकडेवारी शासनाला पाठविलेल्या अहवालात नमूद आहे. परंतु, मे नंतर ऑक्टोबर २०२० पर्यत किती झाडे जीवंत आहे, करपली अन्‌ गायब किती झालेत, याचा लेखाजोखा अद्यापही शासनाला पाठविला नाही, त्यामुळे ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेविषयी महाविकास आघाडी सरकारने बोट ठेवले आहे. मोठा गाजावाजा करून ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली. परंतु, किती झाडे जगलीत, याबाबत कोणतीच यंत्रणा सत्य आकडेवारी सांगू शकत नाही, हे वास्तव आहे, शासनाने म्हटले म्हणून विविध शासन, प्रशासकीय यंत्रणांनी वृक्ष लागवडीत सहभाग घेतला. वृक्ष लावताना फोटो सेशन झाले आणि पुढे या रोपांची देखभाल, निगा कोणत्याच यंत्रणेने केली नाही. त्यामुळे जिल्ह्यात एकूण वृक्ष लागवडीत २० ते २५ टक्केच झाडे जगली असावेत, असे दिसून येते. यात वन विभाग, सामाजिक वनीकरण, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने उत्तरदायित्व म्हणून वृक्ष लागवडीतील झाडे जीवंत ठेवले, हे विशेष. वृक्षांची देखभाल, निगा राखण्यासाठी नुकतेच निधी प्राप्त झाला असला तरी तो तोकडा असल्याची माहिती आहे.

------------------

असे होते विविध यंत्रणांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी- १३५१५०

नगर विकास विभाग- ६४१०

महापालिका - २०३००

सार्वजनिक बांधकाम विभाग- ५००१५०

सिंचन विभाग- ६७८५०

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था- ७०५०

एमआयडीसी, जिल्हा उद्योग, महाराष्ट्र प्रदुषण- १७६०००

जिल्हा परिषद शिक्षण - १५१५००

जिल्हा क्रीडा -१६८५०

विद्यापीठ, उच्च शिक्षण - ३४७५

तंत्रशिक्षण, ग्रामीण पोलीस, एसआरपीएफ, पोलीस आयुक्त - १७६५०

मध्यवर्ती कारागृह, खुले कारागृह मोर्शी- २७२५०

आदिवासी, समाजकल्याण - १८७६०

व्हीजेएनटी, पर्यटन, सांस्कृतिक कार्य, आरोग्य विभाग- २३४००

उर्जा विभाग- ३५५०

एफडीए, पीडीएमसी- १०००

एक्साईज, एसटी महामंडळ- २५००

सहायक कामगार आयुक्त, जिल्हा व सत्र न्यायालय- १३१००

लघुसिंचन, लघु पाटबंधारे- २५३००

महसूल- २१५००

जिल्हा व्यवसाय- ५४५०

जिल्हा महिला बालविकास - ९२००

पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण- ६३४३

दुग्ध, मत्स्य व्यवसाय, कोषागार - ४८०००

ग्राम पंचायती, मनरेगा - २६८८८५०

गृह निर्माण, बडनेरा रेल्वे - १२५०

राष्ट्रीय महामार्ग, बीएसएनएल, डाक विभाग- ६००

जिल्हआ रेशीम -१०००००

वन विभाग, सामाजिक वनीकरण , व्याघ्र प्रकल्प- ६९३२०००

०००००००००००००००००

३३ कोटी वृक्ष लागवडीत ६९.१५ टक्के झाडे जीवंत आहे. ही माहिती मे २०२० च्या अहवालानुसार वेबसाईटवर उपलब्ध आहे. वन विभाग, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्पाने झाडे पूर्णपणे जगविण्याचा प्रयत्न केला आहे. ईतर यंत्रणांना ही रोपे जीवंत ठेवण्याची जबाबदारी शासनाने सोपविली आहे.

-चंद्रशेखरन बाला, उपवनसंरक्षक, अमरावती