शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

पश्चिम विदर्भात २२ टक्केच पीककर्ज वाटप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 16:43 IST

सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असताना पश्चिम विदर्भात खरिपाचे २२ टक्केच कर्जवाटप झाले आहे.

ठळक मुद्देसरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असताना पश्चिम विदर्भात खरिपाचे २२ टक्केच कर्जवाटप झाले आहे.आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना बँका माघारी पाठवित असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाला राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याने या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

अमरावती - सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असताना पश्चिम विदर्भात खरिपाचे २२ टक्केच कर्जवाटप झाले आहे. आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना बँका माघारी पाठवित असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाला राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याने या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

विभागात १ जून ते २४ जुलै या कालावधीत पावसाची ३५०.३ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १९३ मिमी पाऊस पडला. ही ५७ टक्केवारी आहे. पावसाच्या १२० दिवसांपैकी ५४ दिवस पार झाले असताना ४७ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे किमान पाच लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशा स्थितीत शेतकरी आर्थिक संकटात असताना बँकांचा नन्नाचा पाढा आहे. अमरावती विभागात यंदाच्या खरिपासाठी ८५४९ कोटी ३२ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत २,५७,३७९ शेतकऱ्यांना २,३८,५७३ हेक्टर क्षेत्रासाठी १९१५ कोटी ४५ लाखांचे कर्जवाटप केले. ही २२.४० टक्केवारी आहे.  

विभागात जिल्हा सहकारी बँकांना २३०५ कोटी ६९ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,५३,२५३ शेतकरी खातेदारांना २,३८,५७३ हेक्टर क्षेत्रासाठी ९६४.८७ कोटीचे वाटप करण्यात आले. ही ४१.८५ टक्केवारी आहे. यामध्येही यवतमाळ जिल्हा बँकेचे ७५ टक्के कर्जवाटप असल्याने टक्केवारी सुधारली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ५४११ कोटींचे लक्ष्यांक असताना ९३,३४९ शेतकरी खातेदारांना ८५४.३१ कोटींचे वाटप करण्यात आले. १५.७९ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांना ८३२.५८ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आज तारखेपर्यंत १०,७७७ शेतकºयांना ९६.२७ कोटींचे वाटप करण्यात आले. ही ११.५६ टक्केवारी आहे. केवळ  जिल्हा सहकारी बँकाचे कर्जवाटपाच्या वाढीव प्रमाणावर विभागाचे वाटप २२ टक्के दिसून येत आहे. मात्र, सर्वाधिक लक्ष्यांक असणाºया राष्ट्रीयीकृत बँका  कर्जवाटपात माघारल्या आहेत. शासनाद्वारा दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना कर्जवाटपाचा आढावा घेण्याच्या सूचना असताना कर्जवाटपात दर आठवड्यात फक्त एक टक्केच सुधारणा झालेली आहे.

कर्जवाटपात वाढ व्हावी यासाठी तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये मेळावे घेण्याचे शासनादेश आहे. जिल्हा बँकांद्वारा वाटपाच्या टक्क्यात सुधारणा आहे. मात्र, व्यापारी बँका माघारल्याने त्यांनी वेग वाढविण्याची सूचना केली आहे.

- राजेंद्र दाभेराव, विभागीय सहनिबंधक

जिल्हानिहाय खरीप कर्जवाटपाची सद्यस्थिती (कोटी)

जिल्हा           लक्ष्यांक        सभासद       वाटप        टक्काअमरावती     १६८५००.००    ३३२८७      ३३२७३.११    १९.७५अकोला        १३९८७८.००    ३४७३५      ३१४०६.४३   २२.४५वाशीम         १५३०००.००     ३५०४९      २८२३८.६६   १८४६बुलडाणा      १७७३७७        ४०२०१३०   १६२२०.४०    ९.१४यवतमाळ    २१६१७६.६८    १३४१७८    ८२४०७.१०    ३८.१२एकूण          ८५४९३२.०८    २५७३६९  १९१५४५.७०  २२.४०

 

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीagricultureशेतीMONEYपैसा