शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

पश्चिम विदर्भात २२ टक्केच पीककर्ज वाटप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 16:43 IST

सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असताना पश्चिम विदर्भात खरिपाचे २२ टक्केच कर्जवाटप झाले आहे.

ठळक मुद्देसरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असताना पश्चिम विदर्भात खरिपाचे २२ टक्केच कर्जवाटप झाले आहे.आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना बँका माघारी पाठवित असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाला राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याने या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

अमरावती - सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असताना पश्चिम विदर्भात खरिपाचे २२ टक्केच कर्जवाटप झाले आहे. आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना बँका माघारी पाठवित असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाला राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याने या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

विभागात १ जून ते २४ जुलै या कालावधीत पावसाची ३५०.३ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १९३ मिमी पाऊस पडला. ही ५७ टक्केवारी आहे. पावसाच्या १२० दिवसांपैकी ५४ दिवस पार झाले असताना ४७ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे किमान पाच लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशा स्थितीत शेतकरी आर्थिक संकटात असताना बँकांचा नन्नाचा पाढा आहे. अमरावती विभागात यंदाच्या खरिपासाठी ८५४९ कोटी ३२ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत २,५७,३७९ शेतकऱ्यांना २,३८,५७३ हेक्टर क्षेत्रासाठी १९१५ कोटी ४५ लाखांचे कर्जवाटप केले. ही २२.४० टक्केवारी आहे.  

विभागात जिल्हा सहकारी बँकांना २३०५ कोटी ६९ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,५३,२५३ शेतकरी खातेदारांना २,३८,५७३ हेक्टर क्षेत्रासाठी ९६४.८७ कोटीचे वाटप करण्यात आले. ही ४१.८५ टक्केवारी आहे. यामध्येही यवतमाळ जिल्हा बँकेचे ७५ टक्के कर्जवाटप असल्याने टक्केवारी सुधारली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ५४११ कोटींचे लक्ष्यांक असताना ९३,३४९ शेतकरी खातेदारांना ८५४.३१ कोटींचे वाटप करण्यात आले. १५.७९ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांना ८३२.५८ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आज तारखेपर्यंत १०,७७७ शेतकºयांना ९६.२७ कोटींचे वाटप करण्यात आले. ही ११.५६ टक्केवारी आहे. केवळ  जिल्हा सहकारी बँकाचे कर्जवाटपाच्या वाढीव प्रमाणावर विभागाचे वाटप २२ टक्के दिसून येत आहे. मात्र, सर्वाधिक लक्ष्यांक असणाºया राष्ट्रीयीकृत बँका  कर्जवाटपात माघारल्या आहेत. शासनाद्वारा दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना कर्जवाटपाचा आढावा घेण्याच्या सूचना असताना कर्जवाटपात दर आठवड्यात फक्त एक टक्केच सुधारणा झालेली आहे.

कर्जवाटपात वाढ व्हावी यासाठी तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये मेळावे घेण्याचे शासनादेश आहे. जिल्हा बँकांद्वारा वाटपाच्या टक्क्यात सुधारणा आहे. मात्र, व्यापारी बँका माघारल्याने त्यांनी वेग वाढविण्याची सूचना केली आहे.

- राजेंद्र दाभेराव, विभागीय सहनिबंधक

जिल्हानिहाय खरीप कर्जवाटपाची सद्यस्थिती (कोटी)

जिल्हा           लक्ष्यांक        सभासद       वाटप        टक्काअमरावती     १६८५००.००    ३३२८७      ३३२७३.११    १९.७५अकोला        १३९८७८.००    ३४७३५      ३१४०६.४३   २२.४५वाशीम         १५३०००.००     ३५०४९      २८२३८.६६   १८४६बुलडाणा      १७७३७७        ४०२०१३०   १६२२०.४०    ९.१४यवतमाळ    २१६१७६.६८    १३४१७८    ८२४०७.१०    ३८.१२एकूण          ८५४९३२.०८    २५७३६९  १९१५४५.७०  २२.४०

 

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीagricultureशेतीMONEYपैसा