शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शासनाच्या फतव्याने व-हाडाला २०४ कोटींचा फटका, पीक कापणीअंती १४४ मंडळ निकषात बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 16:37 IST

शासनाचे कपाशीच्या पीक कापणीअंती बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्राचा मंडळनिहाय अहवाल शासनाने या आठवड्यात विभागीय आयुक्तांना मागितला. यात विभागातील १४४ महसूल मंडळ निकषात बाद ठरल्याने ‘एनडीआरएफ’च्या २०४ कोटी २५ लाखांच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : शासनाचे कपाशीच्या पीक कापणीअंती बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्राचा मंडळनिहाय अहवाल शासनाने या आठवड्यात विभागीय आयुक्तांना मागितला. यात विभागातील १४४ महसूल मंडळ निकषात बाद ठरल्याने ‘एनडीआरएफ’च्या २०४ कोटी २५ लाखांच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार आहे. यामध्ये विभागातील २५१ मंडळांत ६१२ कोटी ७७ लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल २३ फेब्रुवारीला पाठविण्यात आला. यापूर्वी संयुक्त सर्वेक्षणानंतर विभागात ८१७ कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल २३ जानेवारीला शासनाला पाठविण्यात आला होता. शासनाने महिनाभराच्या अंतरात दोन वेळा बाधित कपाशी क्षेत्राचा  अहवाल आवश्यक मदतनिधीच्या मागणीसह विभागीय आयुक्तांना मागतिला होता. मात्र, दुस-या अहवालात शब्द फिरवून मंडळनिहाय अहवाल मागितल्याने यवतमाळ वगळता उर्वरित चार जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्राच्या ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय केवळ फार्स ठरणार आहे. शासनाचे ७ डिसेंबरचे आदेशान्वये विभागात बोंडअळीमुळे ३३ टक्क्क््यांवर बाधित क्षेत्राचे संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ९,३८,११५ शेतकºयांचे १०,५१,७७१ हेक्टरमधील कपाशीचे ८१७ कोटी तीन लाख ७९ हजारांचे नुकसान झाल्याचा अहवाल २३ जानेवारीला पाठविण्यात आला. त्यानंतर १७ फेब्रुवारीचे आदेशान्वये प्रत्येक जिल्ह्याची पीक कापणी प्रयोनंतरची स्थितीचा अहवाल शासनाने मागीतला यात विभागातील २५१ महसूल मंडळामध्ये ६,८४,७९२ शेतकºयांच्या  ८,१३,६१४ हेक्टरमधील  कपाशीचे ६१२ कोटी ७७ लाख ८६ हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल २३ फेब्रुवारीला फाठविण्यात आता. शासनाचे शब्दच्छलामुळे २०४ कोटींचा फटका शेतकºयांना बसला आहे.

२३ जानेवारीच्या अहवालात वस्तुस्थितीविभागात बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्राचे ‘जीपीएस’ इनबिल्ट फोटो काढण्यात येऊन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल शासनाला २३ जानेवारीला पाठविण्यात आला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १८२ कोटी ६० लाख, अकोला १३५ कोटी ५१ लाख, यवतमाळ ३४९ कोटी १७ लाख, बुलडाणा १३४ कोटी ३४ लाख व वाशिम जिल्ह्यात १५ कोटी ४० लाख असे एकूण ८१७ कोटी तीन लाखांच्या मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यात आली.

२३ फेब्रुवारीचा मंडळनिहाय अहवाल विभागात पीक कापणी प्रयोगानंतर कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसानामध्ये अमरावती जिल्ह्याच्या ४६ मंडळात १०३ कोटी ६४ लाख, अकोला जिल्ह्यात १८ मंडळात ५१ कोटी ६९ लाख, बुलडाणा जिल्ह्यात ६२ मंडळांत १०३ कोटी दोन लाख, वाशिम जिल्ह्यात २४ मंडळात पाच कोटी २४ लाखांचे नुकसान झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती जैसे थै आहे.

टॅग्स :cottonकापूसAmravatiअमरावती