शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार हेक्टर क्षेत्र नापेर

By admin | Updated: January 4, 2015 23:03 IST

जिल्ह्यात रबी हंगामाकरीता असणाऱ्या एकूण १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३१ हजार ७०८ क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१४ पावेतो पेरणी झालेली आहे. कृषी विभागाने नियोजन केल्याच्या

रबी हंगाम : अंजनगाव तालुक्यात ३६ टक्केच पेरणी
अमरावती : जिल्ह्यात रबी हंगामाकरीता असणाऱ्या एकूण १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३१ हजार ७०८ क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१४ पावेतो पेरणी झालेली आहे. कृषी विभागाने नियोजन केल्याच्या तुलनेत हे पेरणी क्षेत्र ८९ टक्के आहे. रबी पेरणीचा कालावधी संपल्यागत असल्याने १६ हजार २५८ हेक्टर क्षेत्र नापेर राहणार आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात पेरणीपासून पावसाने दीड महिना दडी मारली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरुवात झाली. याचा परिणाम होऊन रबी हंगामाची पेरणी दोन महिने माघारली. साधारणपणे पावसाचे १२० दिवस असतात व ८०० ते ८५० मि. मी. पावसाची सरासरी असायला पाहिजे परंतु यंदा ५५० मि. मी. पाऊस पडला. त्यामुळे रबी हंगाम पेरणीसाठी जमिनीत पुरेसी आर्द्रता नसल्याने हरभऱ्याची उगवणशक्ती कमी झाली. जिल्ह्यात ९० टक्के पेरणीक्षेत्रात कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी केल्या जाते. मात्र हलक्या प्रतिच्या जमिनीत पुरेश्या आर्द्रतेमुळे रबीची पेरणी झालेली नाही. परिणामी असे १२ हजारावर हेक्टर क्षेत्र नापेर राहीले आहे.
या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला. मात्र रबी हरभरा पेरणीचा अंतिम कालावधी १५ नोव्हेंबर पावेतो असतो त्यामुळे आता कालावधी संपल्यानंतर हरभरा पेरणी शक्य नाही. त्यामुळे या पाऊसाचा फायदा पेरणी झालेल्या हरभरा, गहू पिकाला होणार आहे.
३१ डिसेंबरपर्यंत धारणी तालुक्यात १४,६७६ हेक्टर, चिखलदरा ४४६०, अमरावती ८०९०, भातकुली ७९४४, नांदगाव खंडेश्वर ९७६०, चांदूररेल्वे ६१६८, तिवसा ९१७६, मोर्शी ७८६६, वरूड ७३२४, दर्यापूर २०५९२, अंजनगाव ६६७६, अचलपूर ५६२७, चांदूरबाजार ९६२२, धामणगाव १३,७२७ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी आटोपली आहे. रबीचा हंगाम दोन महिने माघारल्याने याचा विपरीत परिणाम उत्पन्नावर होणार आहे. (प्रतिनिधी)