शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

१४ व्या वित्त आयोगाच्या निधीवर सीईओंचे नियंत्रण, भ्रष्टाचाराला बसणार आळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 16:59 IST

चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र, चौथ्या वर्षासाठी निधी देण्याबाबत नव्याने आराखडे तयार करण्याच्या सूचना जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवर ‘सीईओं’मार्फत शासनाचे नियंत्रण राहणार आहे.

अमरावती : चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र, चौथ्या वर्षासाठी निधी देण्याबाबत नव्याने आराखडे तयार करण्याच्या सूचना जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवर ‘सीईओं’मार्फत शासनाचे नियंत्रण राहणार आहे.केंद्र शासनाने सन २०१५-१६ पासून १४ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितींना मिळणारा निधी बंद असून, १०० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देणे सुरू केले आहे. आपल्या गावच्या योजना गावानेच सुचवून त्या राबवाव्यात, असे शासन धोरण आहे. त्यानुसार ‘आमचं गाव आमचा विकास’ संकल्पना राबवून पाच वर्षांचे आराखडे ग्रामपंचायतींना तयार करण्यास सांगण्यात आले. आतापर्यंत तीन वर्षांच्या विकास आराखड्यानुसार काही कामे झालीत, तर काही सुरू आहेत. तथापी या कामावरून व निधी खर्च करण्यावरून गावागावांत वादंग उठले. परिणामी जिल्हा परिषद व विभागीय आयुक्तांकडे तक्रारी वाढल्यात. अनेक गावांतील सरपंच व ग्रामसेवकांविरूद्ध नागरिकांनी सीईओंकडे तक्रार केली. निधी उपलब्धतेचे मांडलेले अंदाज वस्तूनिष्ठ नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे मुख्य सचिव नीला रानडे यांनी शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या निधीतून कार्यक्षेत्रातील शाळा, अंगणवाडीतील गुणवत्ता वाढविणे, इमारतीची देखभाल, दुरूस्ती, स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा देण्यावर प्राधान्याने लक्ष देणे, दारिद्र्य निर्मूलन आदीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय यावर नियंत्रणासाठी जिल्हा संनियंत्रण समितीमार्फत नियमित आढावा बैठक, दफ्तर तपासणीबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निधी खर्चाच्या बाबतीत शासनाचा वचक राहणार आहे.

भ्रष्टाचाराला बसणार आळाशासनाच्या जाचक अटीमुळे ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार करणा-यांना आळा बसणार आहे. शिवाय सत्ताधारींच्या मनमानीलाही लगाम बसणार आहे. केलेल्या कामांवर सीईओंचे नियंत्रण राहणार आहे. १४ ला वित्त आयोगातून गावाला मिळणा-या भेटी निधी खर्चावर शासनाचा वचक आल्याने आर्थिक शिस्त लागेल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती