शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

तलावातील पाणी पिल्याने ११ बकऱ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:29 AM

तालुक्यातील बोरी गावातील सज्जू नंदा जामूनकर या आदिवासी शेतकऱ्याच्या ११ बकºया तलावातील पाणी पिल्याने दगावल्या. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने तलावाच्या पाण्यामध्ये विष टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देबोरी येथील घटना : पाण्यात विष टाकल्याचा संशय

धारणी : तालुक्यातील बोरी गावातील सज्जू नंदा जामूनकर या आदिवासी शेतकऱ्याच्या ११ बकऱ्या तलावातील पाणी पिल्याने दगावल्या. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने तलावाच्या पाण्यामध्ये विष टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.बोरी गावातील सज्जू जामुनकर या आदिवासी शेतकऱ्यांचा मुलगा मुकेश (१३) शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बकऱ्यांना पाणी पाजण्याकरिता जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाच्या तलावाशेजारी घेऊन गेला होता. बकऱ्या तलावाच्या काठाकाठाने चरल्यानंतर पाणी पिण्यासाठी तलावाकडे वळल्या. पाणी पिल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत एकापाठोपाठ सर्वांनीच माना खाली टाकून जमिनीवर लोळायला सुरुवात केली. काही वेळातच त्या दगावल्या. मुकेशने घडलेल्या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. त्यांनी लगेच तलावाकडे धाव घेतली ते पोहोचेपर्यंत सर्व बकऱ्या दगावल्या होत्या. सज्जू जामुनकर यांनी धारणी पोलिसांत शनिवार दुपारी तीनच्या तीन वाजताच्या दरम्यान तक्रार नोंदवली. पोलिसांनी तलावावर जाऊन चौकशी केली. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. रविवारी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तलाव ठिकाणी जाऊन बकºयांची पाहणी केली. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत बकऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळू शकेल.तलावाशेजारी वन्यप्राण्यांचा वावरलघु सिंचन विभागाचा हा तलाव वनविभागाच्या जंगलाशेजारी वसलेला आहे. त्यामुळे या तलावावर पश्चिम मेळघाट वनविभागांतर्गत येणाऱ्या जंगलातील वन्यप्राणीसुद्धा तहान भागविण्याकरिता येतात. कदाचित त्या वन्यप्राण्यांच्या हत्येकरिता तलावात विषप्रयोग झाला नसेल ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. त्याअनुषंगाने वनविभागाचे अधिकारी, कर्मचारीसुद्धा जंगलात जाऊन तपास कामाला लागले आहेत.

टॅग्स :WaterपाणीDeathमृत्यू