शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

राज्यातील १०० आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार यूपीएससीचे प्रशिक्षण

By गणेश वासनिक | Updated: August 29, 2022 10:52 IST

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा पुढाकार : आयएएस, आयपीएस होण्याची संधी, कोचिंगसाठी दिल्लीला पाठविणार

गणेश वासनिक

अमरावती : दऱ्या-खोऱ्यात, वस्ती, वाड्यांत वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आता आयएएस, आयपीएस होण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी १०० आदिवासी विद्यार्थ्यांना यूपीएससीचे प्रशिक्षण दिले जाणार असून, त्याकरिता दिल्ली येथे निवासी व्यवस्था करण्यात येणार आहे. चार कोटी रुपयांची ही स्वतंत्र योजना आहे. त्याकरिता आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे.

राज्यातील अनुसूचित जमाती उमेदवारांचे संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी)मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये योग्य प्रशिक्षणाअभावी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता संघ लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी मिळावी, म्हणून शासनाने पावले उचलली आहेत. यूपीएससीमार्फत होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेच्या संपूर्ण तयारीकरिता (पूर्व व मुख्य परीक्षा, मुलाखत) आदिवासी विद्यार्थ्यांना ‘बार्टी’च्या धर्तीवर आता पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. यूपीएससी प्रशिक्षणासाठी ‘श्रीराम आयएएस, नवी दिल्ली’ या संस्थेसोबत शासनाने करार केला आहे.

यूपीएससी प्रशिक्षणासाठी होणार सामाईक प्रवेश परीक्षा

प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. नियमानुसार मुली व दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहे. परंतु, आरक्षित जागेवर महिला व दिव्यांग, अनाथ पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास ही जागा अनुसूचित जमातीतील गुणानुक्रमे पात्र असलेल्या उमेदवाराला दिली जाणार आहे. याकरिता आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या या https://trti.maharashtra.gov.in संकेतस्थळावर इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. पदवीधर उमेदवारांना यात अर्ज करता येणार आहे.

अशा आहेत सुविधा

  •  प्रत्येक प्रशिक्षणार्थीला दर महिन्याला १२ हजार रुपये विद्यावेतन.
  • विद्यावेतनासाठी प्रशिक्षणार्थीची किमान ७५ टक्के हजेरी बंधनकारक.
  • पुस्तके खरेदीसाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीला एकदाच १४ हजार रुपये.
  • प्रशिक्षण केंद्रावर सुरूवातीला जाण्यासाठी व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी दोन हजार रुपये.

 

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्था विद्यार्थ्यांना दरवर्षी यूपीएससी कोचिंगसाठी दिल्लीला पाठवतात. परंतु, पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था जुनी असूनही ही योजना नव्हती. त्यामुळे ‘बार्टी’च्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांना यूपीएससी प्रशिक्षणासाठी पाठवावे, म्हणून १३ मार्च २०२० रोजी तत्कालीन सरकारशी पत्रव्यवहार केला होता. आता राज्य शासनाने चार कोटी नऊ लाख सहा हजार रुपयांची स्वतंत्र योजना तयार केली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना या योजनेचा नक्कीच लाभ मिळेल.

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम, महाराष्ट्र

टॅग्स :Educationशिक्षणMPSC examएमपीएससी परीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थीexamपरीक्षा