शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

दोन वर्षांत शाळा जिल्हा परिषदेच्या १५ शाळा पडल्या बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 1:23 PM

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये काही गावांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने त्या बंद करण्याची वेळ आली. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १५ शाळा बंद पडल्या असून, त्या सुरू करण्यासाठी कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत.

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये काही गावांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने त्या बंद करण्याची वेळ आली. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १५ शाळा बंद पडल्या असून, त्या सुरू करण्यासाठी कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकत्याच झालेल्या बैठकीचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे.ग्रामीण भागात कॉन्व्हेंट संस्कृतीचे लोण पोहोचले, तसेच वाहतुकीची साधने वाढल्याने शहर, ग्रामीण भागाचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्रासपणे शहरी भागातील शाळांमध्ये दाखल होत आहेत. त्यातच जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा दर्जाही घसरला. त्याचाही परिणाम, शाळांतील विद्यार्थी प्रवेशावर होत आहे. काही गावांची लोकसंख्याही कमीच असल्याने २० पर्यंत विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या सर्व बाबींच्या परिणामी, २०१७ ते आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या १५ शाळा बंद करून इतर शाळांमध्ये जोडण्यात आल्या. त्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लगतच्या शाळेत धाव घ्यावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या संचमान्यतेनुसार शिक्षकांची पदेही घटली आहेत. याबाबतची माहिती पुन्हा शासनाने मागविल्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पाठविली आहे.- गरिबांचे शिक्षण, शिक्षकांची पदे वाचवा!मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कास्ट्राइब कर्मचारी संघटनेसोबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेने बंद केलेल्या शाळांचा मुद्दा उपस्थित केला. त्यामध्ये जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने शाळांना कुलूप लावण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थी घडत असतात म्हणून त्या सुरू ठेवाव्या, अशी मागणी केली. बैठकीला कास्ट्राइब संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ उपस्थित होते. त्या इतिवृत्तानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला पत्र देत कार्यवाही करण्याचे सांगितले आहे.

- बंद पडलेल्या प्राथमिक शाळाकमी पटसंख्येमुळे बंद पडलेल्या शाळांची संख्या जिल्ह्यात १५ आहे. त्यापैकी काही शाळांतील विद्यार्थी संख्या शून्य ते १० पर्यंत आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा सोनाळा-०८, साहित-०८, मालपुरा-७, लखमापूर-१०, मोझरी-४, उर्दू शाळा जामठी बु.-३, ठोकबर्डी-७, अडोशी-१०, वणी-४, कवठा खुर्द-६, सर्व विद्यार्थी संख्या शून्य असलेल्या शाळांमध्ये राजापूर, एडली, व्याळा उर्दू, खांबोरा गावांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदSchoolशाळा