शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

यावर्षी वऱ्हाडात रब्बी, उन्हाळी पिकांना सिंचन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:51 IST

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणात पूरक जलसाठा उपलब्ध झाला नसल्याने पश्चिम विदर्भात (वºहाड) रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी मिळणे अशक्य आहे.

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणात पूरक जलसाठा उपलब्ध झाला नसल्याने पश्चिम विदर्भात (वºहाड) रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी मिळणे अशक्य आहे; पण अकोला जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने दोन धरणातील पाणी आतापासूनच सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.वºहाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठ्यात गत दोन महिन्यांत १४ ते १५ टक्के घट झाली असून, आजमितीस ५१.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात आजमितीस ३७.५८ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा व मस दोन्ही धरणातील जलसाठाच नसून, इतर धरणात अल्प जलसाठा शिल्लक असल्याने या धरणामधून सिंचनासाठी पाणी सोडणार नसल्याचे वृत्त आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २३ नोव्हेंबर रोजी ५१.४८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा यावर्षी सुरुवातीपासूनच शून्य टक्के आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात ९४.२६ टक्के जलसाठा संकलित झाला होता. हा साठा आता ७७.५७ टक्के आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ९४.०४, उमा ९२.९८ टक्के तर मोर्णा धरणात ४९.७१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. वान धरणात ९१.३८ टक्के जलसाठा आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मस धरणात शून्य साठा असून, कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ २.६५ टक्के आहे. तोरणा १२.८०, उतावळी धरणातील पातळी ४०.४२ टक्के आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १६.०८ टक्के, पेनटाकळी धरणात ११.६६ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.१८ टक्के, पलढगमध्ये २८.७६ टक्के, मन धरणात २२.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ८२.६९ टक्के, एकबुर्जी ७३.६० तर सोनल धरणात ९५.९८ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९४.२९, अरुणावती ७०.६७ तर बेंबळा धरणातील जलसाठा ४३.६६ टक्के आहे.

 

ज्या धरणात मुबलक जलसाठा आहे, त्या धरणातील पाणी सिंचनासाठी सोडले जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान धरणात पाणी आहे. त्यामुळे काटेपूर्णा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प