शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

यावर्षी वऱ्हाडात रब्बी, उन्हाळी पिकांना सिंचन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:51 IST

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणात पूरक जलसाठा उपलब्ध झाला नसल्याने पश्चिम विदर्भात (वºहाड) रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी मिळणे अशक्य आहे.

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणात पूरक जलसाठा उपलब्ध झाला नसल्याने पश्चिम विदर्भात (वºहाड) रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी मिळणे अशक्य आहे; पण अकोला जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने दोन धरणातील पाणी आतापासूनच सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.वºहाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठ्यात गत दोन महिन्यांत १४ ते १५ टक्के घट झाली असून, आजमितीस ५१.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात आजमितीस ३७.५८ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा व मस दोन्ही धरणातील जलसाठाच नसून, इतर धरणात अल्प जलसाठा शिल्लक असल्याने या धरणामधून सिंचनासाठी पाणी सोडणार नसल्याचे वृत्त आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २३ नोव्हेंबर रोजी ५१.४८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा यावर्षी सुरुवातीपासूनच शून्य टक्के आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात ९४.२६ टक्के जलसाठा संकलित झाला होता. हा साठा आता ७७.५७ टक्के आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ९४.०४, उमा ९२.९८ टक्के तर मोर्णा धरणात ४९.७१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. वान धरणात ९१.३८ टक्के जलसाठा आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मस धरणात शून्य साठा असून, कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ २.६५ टक्के आहे. तोरणा १२.८०, उतावळी धरणातील पातळी ४०.४२ टक्के आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १६.०८ टक्के, पेनटाकळी धरणात ११.६६ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.१८ टक्के, पलढगमध्ये २८.७६ टक्के, मन धरणात २२.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ८२.६९ टक्के, एकबुर्जी ७३.६० तर सोनल धरणात ९५.९८ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९४.२९, अरुणावती ७०.६७ तर बेंबळा धरणातील जलसाठा ४३.६६ टक्के आहे.

 

ज्या धरणात मुबलक जलसाठा आहे, त्या धरणातील पाणी सिंचनासाठी सोडले जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान धरणात पाणी आहे. त्यामुळे काटेपूर्णा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प