शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी वऱ्हाडात रब्बी, उन्हाळी पिकांना सिंचन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:51 IST

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणात पूरक जलसाठा उपलब्ध झाला नसल्याने पश्चिम विदर्भात (वºहाड) रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी मिळणे अशक्य आहे.

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणात पूरक जलसाठा उपलब्ध झाला नसल्याने पश्चिम विदर्भात (वºहाड) रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी मिळणे अशक्य आहे; पण अकोला जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने दोन धरणातील पाणी आतापासूनच सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.वºहाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठ्यात गत दोन महिन्यांत १४ ते १५ टक्के घट झाली असून, आजमितीस ५१.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात आजमितीस ३७.५८ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा व मस दोन्ही धरणातील जलसाठाच नसून, इतर धरणात अल्प जलसाठा शिल्लक असल्याने या धरणामधून सिंचनासाठी पाणी सोडणार नसल्याचे वृत्त आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २३ नोव्हेंबर रोजी ५१.४८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा यावर्षी सुरुवातीपासूनच शून्य टक्के आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात ९४.२६ टक्के जलसाठा संकलित झाला होता. हा साठा आता ७७.५७ टक्के आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ९४.०४, उमा ९२.९८ टक्के तर मोर्णा धरणात ४९.७१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. वान धरणात ९१.३८ टक्के जलसाठा आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मस धरणात शून्य साठा असून, कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ २.६५ टक्के आहे. तोरणा १२.८०, उतावळी धरणातील पातळी ४०.४२ टक्के आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १६.०८ टक्के, पेनटाकळी धरणात ११.६६ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.१८ टक्के, पलढगमध्ये २८.७६ टक्के, मन धरणात २२.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ८२.६९ टक्के, एकबुर्जी ७३.६० तर सोनल धरणात ९५.९८ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९४.२९, अरुणावती ७०.६७ तर बेंबळा धरणातील जलसाठा ४३.६६ टक्के आहे.

 

ज्या धरणात मुबलक जलसाठा आहे, त्या धरणातील पाणी सिंचनासाठी सोडले जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान धरणात पाणी आहे. त्यामुळे काटेपूर्णा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प