शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बटालियन कॅम्पच्या धर्तीवर वानचे पाणी नेणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST

प्रशांत विखे तेल्हारा: तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेला राज्य राखीव बटालियन कॅम्प अचानक दुसरीकडे हलविल्याचा प्रकार घडला आहे. त्याच धर्तीवर ...

प्रशांत विखे

तेल्हारा: तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेला राज्य राखीव बटालियन कॅम्प अचानक दुसरीकडे हलविल्याचा प्रकार घडला आहे. त्याच धर्तीवर वान धरणाचे पाणी पळवून नेण्याचा डाव तर नाही ना?, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे; मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पाणी नेऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

तालुक्यात राज्य राखीव बटालियन कॅम्प मंजूर झाला होता. त्यानंतर जागा हस्तांतरणची प्रक्रिया सुरू असतानाच कॅम्प दुसरीकडे हलविण्यात आला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असते, तर कॅम्प दुसरीकडे गेला नसता. आता वानचे पाणी पेटले आहे. सध्या वानचे पाणी बाळापूरला नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाणी आरक्षण मंजुरी देण्याचा विषय हा जलसंपदा खात्याकडे असून, या जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडेच ते खाते आहे. पालकमंत्रीसुद्धा धरणात पाणी नसल्याने व स्थानिक शेतकऱ्यांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो, त्यासाठी नवीन कोणतीही पाणी पुरवठा योजना तयार करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीत. गतवेळीसुद्धा तालुक्यात राज्य राखिव बटालियन कॅम्प होऊ देण्याचे आश्वासनच नाही, तर मुख्यमंत्र्यांना पत्रसुद्धा दिले होते. तरीही कॅम्प दुसरीकडे हलविण्यात आला. आता शेतकरी धरणातील पाणी जाऊ न देण्यासाठी व अकोला येथील अमृत योजनेसाठी मंजूर झालेले पाणी आरक्षण रद्द करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनासुद्धा निवेदन दिले आहे, तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात बैठकांचे आयोजन करून पुढील आंदोलनची रूपरेषा ठरविण्यात येत असल्याचे चित्र आहे.