शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; गाढवाचा धोका, कोल्हा तारणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 10:40 IST

The weather department's forecast was wrong again : यंदा मृग नक्षत्रात पावसात खंड पडल्याने आर्द्राचे वाहन कोल्हा तारणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १० टक्के पेरणी आटोपलीपावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतित

अकोला : दरवर्षीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला. सुरुवातीला चांगला पाऊस झाला आणि हवामान खात्यानेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. आता पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतित आहेत. मृगाचे वाहन गाढव, तर आर्द्राचे कोल्हा आहे. यंदा मृग नक्षत्रात पावसात खंड पडल्याने आर्द्राचे वाहन कोल्हा तारणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मान्सूनचे आगमन होऊन बरेच दिवस झाले. तरी जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाला नाही. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेले. त्यातच पाऊस आठ दिवस लांबल्याचे चित्र आहे. दिवसा कडक ऊन तर रात्री आकाशात चांदणे दिसत आहे. अचानक पावसाचे वातावरण तयार होते. मात्र, पाऊस पडत नाही. मृग नक्षत्रात जिल्ह्यात पावसाची संततधार अपेक्षित होती; पण पडणारा पाऊसही विखरून पडत आहे. त्यामुळे ज्या भागात पाऊस झाला. तेथील शेतकरी सुखावतो तर बाकीच्यांना प्रतीक्षा करावी लागते. जिल्ह्यात १०.२१ टक्के क्षेत्रावर यंदा खरिपाचा पेरा झाला आहे. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतित आहे.

 

पावसाची स्थिती (मिमी)

२५०

अपेक्षित पाऊस

१६५.३

आतापर्यंत झालेला पाऊस

 

कोठे किती पेरणी (हेक्टरमध्ये)

३,१०,०००

अपेक्षित पेरणी क्षेत्र

४९,३३४

आतापर्यंत झालेली पेरणी

 

सर्वांत कमी पाऊस

अकोट तालुका ३४.६

सर्वांत जास्त पाऊस

मूर्तिजापूर तालुका १३१.२

 

तालुकानिहाय पेरणी व झालेला पाऊस

तालुका झालेला पाऊस (मिमी) पेरणी (हेक्टरमध्ये)

अकोट ३४.६                         ८,२११

तेल्हारा ५३.७                         ७,१६३

बाळापूर ५८.५                         १,२६३

पातूर ९०.९                         १३,५३०

अकोला ५४.०                         ४,२८१

बार्शीटाकळी ९४.५                         १३,९८४

मूर्तिजापूर १३१.२                         ९०२

 

 

...तर खते-बियाणे कशी मिळणार?

यंदा चांगला पाऊस होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मान्सूनही लवकर दाखल झाला. मात्र, पेरणी केल्यानंतर पावसाने पाठ फिरविली.

- किशोर मोरे, शेतकरी

सुरुवातीला काही दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतात कपाशीची पेरणी केली. आता पाऊस नसल्याने पीक कोमेजून जात आहे.

- विजय पाटील, शेतकरी

 

यावर्षी बियाणे-खतांचे दर वाढले आहे. महागडे बियाणे घेऊन पेरणी केली. मात्र, पावसात खंड पडल्याने यंदाही नुकसान होण्याची शक्यता आहे.

- देवीदास धोत्रे, शेतकरी

टॅग्स :AkolaअकोलाweatherहवामानRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती