शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:21 IST

अकोला: अर्धा पावसाळा संपला; पण दमदार पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे.

अकोला: अर्धा पावसाळा संपला; पण दमदार पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. उमा व निर्गुणा या दोन धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. अकोल्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात ३.५ टक्के साठा शिल्लक आहे. मागील आठ दिवसांपासून हा साठा स्थिर असला तरी ३५ ते ४० दिवस पुरेल एवढाच आहे. त्यामुळे सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात बार्शीटाळी तालुक्यातील महानचे काटेपूर्णा व तेल्हारा तालुक्यातील वान ही दोन मोठी धरणे आहेत. तर तीन मध्यम स्वरू पाची धरणे आहेत. यात मूर्तिजापूर तालुक्यातील उमा तसेच घुंगशी बॅरेज, पातूर तालुक्यातील मोर्णा व निर्गुणा धरण आहे. बार्शीटाकळी तालुक्यात दगडपारवा प्रकल्प आहे. तथापि, यातील निर्गुणा व उमा धरण शून्य टक्के असून, घुंगशी बॅरेजमध्ये २.७८ टक्के साठा आहे. मोर्णा धरणात १०.४४ टक्के जलसाठा आहे. वान धरणात २६.९९ टक्केच जलसाठा आहे. गतवर्षी या धरणातून यावेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. दरम्यान, काटेपूर्णा धरणात जलपातळी मागील आठ दिवसांपासून स्थिर आहे. २५ ते २६ जुलैपासून पाऊस सुरू झाल्यानंतर पातळीत ०.१ दोन टक्क्यांचा फरक पडला. मागील आठ ते दहा दिवसाची टक्केवारी बघितल्या २० जुलै रोजी काटेपूर्णा धरणात ३.४७ टक्के जलसाठा होता. २६ जुलै ते २८ जुलैपर्यंत हा साठा ३.९ टक्के स्थिर होता. २९ जुलै रोजी मात्र यात ०.४ टक्के घट झाली. येत्या ३० व ३१ रोजी विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे; परंतु हा इशारा केवळ किरकोळ ठिकाणी असल्याने अकोलेकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाचे चित्र बघता महापालिका प्रशासनाने मृत साठा उचलण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे असून, नियोजन करण्याची गरज आहे.२००५ मध्ये केला होता मनपाने प्रस्ताव२००४-०५ मध्ये उद्भवलेल्या भीषण पाणी टंचाईनंतरअकोला शहराची कायमची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तत्कालीन मनपा आयुक्तांनी या दोन्ही धरणातून पाणी आणण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता. अप्पर वर्धा धरणाची जलवाहिनी कुरू मपर्यंत असल्याने येथून सहज जलवाहिनी टाकता येऊ शकते.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणwater scarcityपाणी टंचाई