शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:21 IST

अकोला: अर्धा पावसाळा संपला; पण दमदार पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे.

अकोला: अर्धा पावसाळा संपला; पण दमदार पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. उमा व निर्गुणा या दोन धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. अकोल्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात ३.५ टक्के साठा शिल्लक आहे. मागील आठ दिवसांपासून हा साठा स्थिर असला तरी ३५ ते ४० दिवस पुरेल एवढाच आहे. त्यामुळे सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात बार्शीटाळी तालुक्यातील महानचे काटेपूर्णा व तेल्हारा तालुक्यातील वान ही दोन मोठी धरणे आहेत. तर तीन मध्यम स्वरू पाची धरणे आहेत. यात मूर्तिजापूर तालुक्यातील उमा तसेच घुंगशी बॅरेज, पातूर तालुक्यातील मोर्णा व निर्गुणा धरण आहे. बार्शीटाकळी तालुक्यात दगडपारवा प्रकल्प आहे. तथापि, यातील निर्गुणा व उमा धरण शून्य टक्के असून, घुंगशी बॅरेजमध्ये २.७८ टक्के साठा आहे. मोर्णा धरणात १०.४४ टक्के जलसाठा आहे. वान धरणात २६.९९ टक्केच जलसाठा आहे. गतवर्षी या धरणातून यावेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. दरम्यान, काटेपूर्णा धरणात जलपातळी मागील आठ दिवसांपासून स्थिर आहे. २५ ते २६ जुलैपासून पाऊस सुरू झाल्यानंतर पातळीत ०.१ दोन टक्क्यांचा फरक पडला. मागील आठ ते दहा दिवसाची टक्केवारी बघितल्या २० जुलै रोजी काटेपूर्णा धरणात ३.४७ टक्के जलसाठा होता. २६ जुलै ते २८ जुलैपर्यंत हा साठा ३.९ टक्के स्थिर होता. २९ जुलै रोजी मात्र यात ०.४ टक्के घट झाली. येत्या ३० व ३१ रोजी विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे; परंतु हा इशारा केवळ किरकोळ ठिकाणी असल्याने अकोलेकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाचे चित्र बघता महापालिका प्रशासनाने मृत साठा उचलण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे असून, नियोजन करण्याची गरज आहे.२००५ मध्ये केला होता मनपाने प्रस्ताव२००४-०५ मध्ये उद्भवलेल्या भीषण पाणी टंचाईनंतरअकोला शहराची कायमची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तत्कालीन मनपा आयुक्तांनी या दोन्ही धरणातून पाणी आणण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता. अप्पर वर्धा धरणाची जलवाहिनी कुरू मपर्यंत असल्याने येथून सहज जलवाहिनी टाकता येऊ शकते.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणwater scarcityपाणी टंचाई