शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

पाणीस्त्रोत स्वच्छता सर्व्हेक्षण : ८५ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:58 IST

बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व पाण्याच्या स्त्रोताचे स्वच्छता सर्व्हेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींना पिवळे तर ७८३ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व पाण्याच्या स्त्रोताचे स्वच्छता सर्व्हेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींना पिवळे तर ७८३ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायतींना महिनाभरात याबाबत उपाययोजना कराव्या लागणार आहेत.जिल्ह्यात ६ हजार ८४१ पाणीस्त्रोत आहेत. नळयोजना, विहिर, हातपंपांचा यामध्ये समावेश आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा स्त्रोतांचे वर्षातून दोन वेळा सर्व्हेक्षण करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर हे सर्व्हेक्षण करण्यात येते. जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा स्त्रोतांचे आॅक्टोंबरपर्यंत स्वच्छता सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये ८५ ग्रामपंचायतींना पिवळे तर ७८३ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आाले. पाणीपुरवठा स्त्रोतातील पाणी नमुन्यांची कारणे शोधून संबंधित ग्रामपंचायतींना महिनाभरात उपाययोजना करणे अनिवार्य आहे.पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याकडे सार्वजनिक पाणीपुरवठा नळयोजना, विहिर, बोअरवेल, हातपंप हे स्त्रोत आहेत. सर्वच स्त्रोत पिण्यास योग्य असतीलच असे नाही. बºयाचदा अनेक पाणी स्त्रोतात काही घटकांची कमतरता आढळून येते. तर काही घटक जास्त प्रमाणात असतात. शरिरावर याचा परिणाम होवू शकतो. आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी नमुन्यांचे सर्व्हेक्षण करुन तपासणी करण्यात येते. प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी करण्यात येते. तपासणीत हे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही कळते. पाण्यात काही घटकांची कमतरता असल्यास किंवा काही घटकांचे प्रमाण वाढल्यास त्याबाबत उपाययोजना करण्यात येतात.पावसाळा तोंडावर आला असून पिण्याच्या पाण्याबाबत आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. पाण्यातून अनेक आजारांचा प्रसार होतो. वेळीच आजारांना आवर घालण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहेत. पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांबाबत प्रशासनाकडून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येतात. मात्र अनेकदा बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. पाणी नमुन्याची तपासणी करण्याकडे लक्ष दिल्या जात नाही. त्यामधून आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. नागरिकांनी याबाबत दक्षता घेतली पाहिजे. आरोग्यासाठी पाणी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. शरिरात जवळपास ७० टक्के पाणी असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.असे दिले जाते कार्डपाणी स्त्रोताच्या स्वच्छता सर्व्हेक्षणानंतर जोखीम तपासणी केली जाते. सौम्य जोखमीसाठी हिरवे, मध्यमसाठी पिवळे व तीव्र जोखीमसाठी संबंधित ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जातात. शुन्य ते २९ गुणांपर्यंत हिरवे कार्ड, ३० ते ६९ गुणांपर्यंत पिवळे व ७० पेक्षा जास्त गुणांवर लाल कार्ड मिळते. जिल्ह्यात एकाही ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळालेले नाही. हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतीचे पाणीस्त्रोत पिण्यास योग्य असून पिवळे कार्ड मिळालेल्या स्त्रोतांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहेत.यांच्या स्वाक्षरीने होते कार्डचे वाटपसौम्य जोखीमचे हिरवे कार्ड वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सहीने देण्यात येते. तर पिवळे कार्ड गटविकास अधिकारी, ग्रामिण पाणीपुरवठा विभागाचे तालुका उपअभियंता व तालुका आरोग्य अधिकाºयांच्या स्वाक्षरीने दिले जाते. लाल कार्ड हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी