शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पाणीटंचाई निवारणाच्या देयकांपोटी हवे ५.५४ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:03 AM

देयके अदा करण्यासाठी ५ कोटी ५४ लाख ७८ हजार रुपये निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

- संतोष येलकरअकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी गत जुलै अखेरपर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांची देयके अदा करण्यासाठी ५ कोटी ५४ लाख ७८ हजार रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून ७ आॅगस्ट रोजी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविला.जिल्ह्यातील ग्रामीण भागात गत उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टंचाई अंतर्गत गत जुलै अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणाच्या विविध उपाययोजनांची कामे करण्यात आली. त्यामध्ये नवीन विंधन विहीर, कूपनलिका, तात्पुरती पूरक नळ योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, खासगी विहिरींचे अधिग्रहण व टँकरद्वारे पाणी पुरवठा इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी गत मे अखेरपर्यंत शासनामार्फत ८ कोटी ८१ लाख ७४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. उपलब्ध निधी पाणीटंचाई निवारण कामांवर खर्च करण्यात आला असून, जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी पूर्ण करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांची देयके अदा करण्यासाठी ५ कोटी ५४ लाख ७८ हजार रुपये निधीची मागणी संबंधित यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कामांची देयके अदा करण्यासाठी ५ कोटी ५४ लाख ७८ हजार रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.उपाययोजनानिहाय अशी आहे निधीची मागणी!उपाययोजना                                          निधी (लाखात)नळ योजना विशेष दुरुस्ती                         १७९.४८टँकरद्वारे पाणी पुरवठा                             २००.००नवीन विंधन विहिरी, कूपनलिका                ७८.५४तात्पुरती पूरक नळ योजना                        ०९.९४खासगी विहिरींचे अधिग्रहण                       ८६.८२..........................................................................एकूण                                                        ५५४.७८विद्युत देयकांसाठी दोन कोटींची मागणी!जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या जून महिन्यातील विद्युत देयकांची रक्कम अदा करण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची मागणी संबंधित यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यानुषंगाने विद्युत देयकांची रक्कम अदा करण्यासाठी दोन कोटी रुपये निधीची मागणीही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाईAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय