शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नेर-धामणा बॅरेजमध्ये जलसंचय; जलसिंचन संघर्ष समितीने केले जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 16:05 IST

या बॅरेजमध्ये जलसंचय झाल्याने जलसिंचन संघर्ष समिती व परिसरातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

अकोला: पूर्णा नदीवरील नेर-धामणा बॅरेजमध्ये प्रथमच या वर्षापासून जलसंचय झाल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आनंद झाला; पण हे पाणी प्रत्यक्ष शेतात पोहोचेल तेव्हा आमचा आनंद द्विगुणित होईल, असे भावपूर्ण प्रतिपादन अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी रविवारी केले.नेरधामणा पूर्णा बॅरेजला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भेट देऊन जलपूजन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. खारपाणपट्ट्यातील भीषण पाणीटंचाईवर उपाय म्हणून २००८ साली जिल्ह्यातील मंगरुळकांबे, घुंगशी, नेरधामणा, उमा नदीवरील रोहणा बॅरेजच्या कामाला प्रारंभ झाला. २०१२ साली पूर्ण होणाऱ्या या बॅरेजची कामे प्रलंबित झाली. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमसभेत महादेवराव भुईभार यांनी बॅरेजचा प्रश्न उपस्थित केला. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समिती स्थापन केली. वारंवार निवेदन देऊन धरणे दिले. जनसामान्यांच्या रेट्याने व जलसिंचन संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे पाणी प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यपालांनी या बॅरेजला भेट देऊन समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, उपाध्यक्ष शिरीष धोत्रे, सचिव भाई प्रदीप देशमुख, प्रा. बोर्डे, अ‍ॅड. रामसिंह राजपूत, बबनराव कानकिरड यांच्यासोबत चर्चा करून या बॅरेजची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. अनेक संकटांवर मात करीत २०१९ मध्ये या बॅरेजमध्ये जलसंचय झाल्याने जलसिंचन संघर्ष समिती व परिसरातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बॅरेजच्या नदीपात्रात पाणी पाहून आनंद होतो; पण पूर आला की बॅरेजच्या दोन्ही बाजूची माती वाहून जाते, पुढे शेतात, गावात पाणी शिरले, नदीकाठचे रस्ते बंद झाले, पाइपलाइनने शेतापर्यंत पाणी येणार होते, ती कामे अद्याप अपूर्णच आहेत, अशा तक्रारी ग्रामस्थ मांडत आहेत.वºहाडला सोन्याची कºहाड म्हटले जाते. प्रत्यक्षात खारपाणपट्टा अनेक वर्षांपासून पाणी टंचाईशी झुंज देत आहे. संघर्ष करत असताना पूर्णा पात्रात पयोष्णी पाहून आता शेतकºयांच्या शेतात पाणी पोहोचेल. गोरगरिबांच्या, गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याची, शेती सिंचनाची सुविधा होत आहे. हा अवघ्या खारपाणपट्टावासीयांसाठी आनंदाचा वर्षाव असल्याचे भावोद्गार शेकापचे भाई प्रदीप देशमुख यांनी काढले. जलपूर्णा जलपूजनप्रसंगी शाखा अभियंता देशमुख, सहायक अभियंता सैतवाल, बबनराव कानकिरड, मोहन पाटील भांबेरे, विजय भांबेरे, दिनकरराव भांबेरे, अ‍ॅड. रामराव पाटील (सांगवी), बंडूभाऊ मोडक (गोपाळखेड) यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

टॅग्स :AkolaअकोलाNer-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज