शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जलवाहिनीला गळती,पाण्याचा अपव्यय सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:34 IST

नया अंदुरा : कारंजा रमजानपूर प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे ११ पैकी आठ बोअरवेल कोरडे पडले असून तीन बोअरवेलवर ...

नया अंदुरा : कारंजा रमजानपूर प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे ११ पैकी आठ बोअरवेल कोरडे पडले असून तीन बोअरवेलवर १० गावांना पाणीपुरवठा होत असल्याने १० गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १५०-१६० फुटानंतर कडक दगड असल्याने एक-एक करीत बोअरवेल कोरडे पडत आहेत. कारंजा रमजानपुर,नया अंदुरा, शिंगोली,हातला, लोणाग्रा, सोनाळा,निंबा फाटा अंदूरा,आडसूळ व मालवाडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावातील ग्रामस्थांना भरउन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कारंजा रमजानपुर पाणी पुरवठा योजनेंतर्गत १० गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. कारंजा रमजानपूर येथे प्रत्येक गावासाठी स्वतंत्र बोअरवेल करण्यात आली होती. या बोअरवेलचे पाणी जलकुंभात साठवून प्रत्येक गावात जलवाहिनीद्वारे पोहोचण्याची व्यवस्था आहे .मात्र कारंजा रमजानपूर पाणीपुरवठा योजनेसाठी असलेले आठ बोअरवेल आटले असून त्यामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. काही बोअरवेलची पातळी कमी झाली असून ११ पैकी ८ बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. १० गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या उपाययोजना न केल्यास मे महिन्यात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोअरवेल आटल्याने पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले आहे. ३ बोअरवेलची पाणी पातळी खोलवर जात आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने १० गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा जलवाहिनेवरील अनेक लिकेज जोडावे तसेच यावर प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सुनीता गोरे, शिंगोली सरपंच महेश बोर्डे, शिवसेना नेते उमेश जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र पोहर , जनार्दन साबळे,पं. स. सदस्य अनिरुद्ध देशमुख, माजी सरपंच देवकाबाई साबळे,माजी सैनिक नारायण साबळे, गोविंद थोरात आदींनी केली आहे.

फोटो: