शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जलवाहिनीला गळती,पाण्याचा अपव्यय सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:34 IST

नया अंदुरा : कारंजा रमजानपूर प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे ११ पैकी आठ बोअरवेल कोरडे पडले असून तीन बोअरवेलवर ...

नया अंदुरा : कारंजा रमजानपूर प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे ११ पैकी आठ बोअरवेल कोरडे पडले असून तीन बोअरवेलवर १० गावांना पाणीपुरवठा होत असल्याने १० गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १५०-१६० फुटानंतर कडक दगड असल्याने एक-एक करीत बोअरवेल कोरडे पडत आहेत. कारंजा रमजानपुर,नया अंदुरा, शिंगोली,हातला, लोणाग्रा, सोनाळा,निंबा फाटा अंदूरा,आडसूळ व मालवाडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावातील ग्रामस्थांना भरउन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कारंजा रमजानपुर पाणी पुरवठा योजनेंतर्गत १० गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. कारंजा रमजानपूर येथे प्रत्येक गावासाठी स्वतंत्र बोअरवेल करण्यात आली होती. या बोअरवेलचे पाणी जलकुंभात साठवून प्रत्येक गावात जलवाहिनीद्वारे पोहोचण्याची व्यवस्था आहे .मात्र कारंजा रमजानपूर पाणीपुरवठा योजनेसाठी असलेले आठ बोअरवेल आटले असून त्यामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. काही बोअरवेलची पातळी कमी झाली असून ११ पैकी ८ बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. १० गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या उपाययोजना न केल्यास मे महिन्यात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोअरवेल आटल्याने पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले आहे. ३ बोअरवेलची पाणी पातळी खोलवर जात आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने १० गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा जलवाहिनेवरील अनेक लिकेज जोडावे तसेच यावर प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सुनीता गोरे, शिंगोली सरपंच महेश बोर्डे, शिवसेना नेते उमेश जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र पोहर , जनार्दन साबळे,पं. स. सदस्य अनिरुद्ध देशमुख, माजी सरपंच देवकाबाई साबळे,माजी सैनिक नारायण साबळे, गोविंद थोरात आदींनी केली आहे.

फोटो: