शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

अकोला शहरावर जलसंकट; महान धरणात अवघा नऊ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 3:01 PM

अकोला : महान धरणात आजरोजी अवघा नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली असताना पाण्याची होणारी नासाडी चिंतेचा विषय झाला आहे.

ठळक मुद्देशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणातील (काटेपूर्णा प्रकल्प) जलसाठ्यात घसरण झाली आहे.आठ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याची पुरेपूर जाणीव असतानादेखील नागरिकांना पाण्याचे महत्त्व समजले नसल्याचे चित्र पहावयास मिळते. मनपा प्रशासनाने ‘जल’जागृतीसाठी शहरात फ्लेक्स, होर्डिंग उभारले असले, तरी नागरिकांनीच पाण्याचा जपून वापर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

- आशिष गावंडे

अकोला : अकोलेकरांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत असला, तरी पाण्याची किंमत समजत नसल्यामुळे की काय, हातात पाइप घेऊन रस्त्यांवर पाणी शिंपडणारे, चारचाकी, दुचाकी वाहने धुणाऱ्यांची संख्या कमी होण्याचे नावच घेत नसल्याचे चित्र आहे. महान धरणात आजरोजी अवघा नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली असताना पाण्याची होणारी नासाडी चिंतेचा विषय झाला आहे. ही बाब लक्षात घेता मनपा प्रशासनाने जनजागृतीसाठी पुढाकार घेतला असला, तरी शहरातील सामाजिक, स्वयंसेवी संघटनांनी ‘जल’जागृतीसाठी समोर येण्याची गरज निर्माण झाली आहे.गतवर्षी पावसाने हुलावणी दिल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणातील (काटेपूर्णा प्रकल्प) जलसाठ्यात घसरण झाली आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अखेरच्या काही दिवसांत आलेल्या पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात अवघ्या एक ते दीड टक्क्याने वाढ झाली. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून शहरवासीयांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. नळाला आठ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याची पुरेपूर जाणीव असतानादेखील नागरिकांना पाण्याचे महत्त्व समजले नसल्याचे चित्र पहावयास मिळते. पाणी पुरवठा करताना त्या-त्या भागातील पाइपलाइनवरील शेवटच्या नळ कनेक्शनधारकांना पाणी पुरवठा करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. पाइपलाइनवरील शेवटच्या नळ कनेक्शनधारकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी लागणाºया कालावधीचा गैरफायदा घेत नागरिक पाण्याची नासाडी करीत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येते. घरासमोरील रस्त्यावर पाणी शिंपडणे, चारचाकी, दुचाकी वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जात आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता मनपा प्रशासनाने ‘जल’जागृतीसाठी शहरात फ्लेक्स, होर्डिंग उभारले असले, तरी नागरिकांनीच पाण्याचा जपून वापर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव!यंदा महान धरणात ठणठणाट होणार असल्याची परिस्थिती आहे. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे जलसाठ्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाच्या मदतीने धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव तयार केला. सदर प्रस्ताव जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सादर केल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरKatepurna Damकाटेपूर्णा धरण