शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

पाठ्यक्रमात जलजागृतीचा धडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 2:35 PM

विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

अकोला : विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच पाण्याचे महत्त्व रुजावे, जलजागृती निर्माण होऊन गावोगावी ‘जलदूत’ तयार व्हावेत, याकरिता पाठ्यक्रमात एक धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाने यासाठीचा पुढाकार घेतला असून, शासनही याबाबत अनुकूल असल्याने लवकरच हा धडा पाठ्यक्र मात समाविष्ट केला जाणार असल्याचे वृत्त आहे.राज्यात भूजल पातळीपासून ६० ते ६५ मीटर खोलपर्यंत मिळते. कोकणात सामान्यत: दोन मीटरवर पाणी लागते, विदर्भात तेच दोन ते पाच मीटरवर लागते तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये हेच पाणी ५ ते १० मीटरवर उपलब्ध होते. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात व उत्तरेस तापी व पूर्णा नदीच्या खोऱ्यात भूपृष्ठ पातळीच्या खाली २० मीटरपर्यंत पाणी लागते. अलीकडच्या काळात राज्याच्या बहुतांश भागात पाण्याची पातळी खाली आली आहे. अपर्याप्त पाऊस, घटलेले पुनर्भरण आणि भूजलाचा अतिउपसा यामुळे अशी स्थिती झाली आहे. नगर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, जालना, लातूर, नागपूर, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही भागात पावसाळा संपताच भूजल पातळी वेगाने खाली जात असल्याचे दिसून येते. हवामान बदलाचा प्रभाव जाणवू लागल्याने पाऊस अनिश्चित स्वरू पाचा झाला आहे. याच अनुषांगाने पाण्याच महत्त्व सांगण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने राज्यात १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या अख्त्यारीत एका गावातील शाळा दत्तक घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. हेच विद्यार्थी त्यांचे पालक प परिसरात पाण्याविषयी जलजागृती करतील.पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात जलजागृतीचा धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देणारा विषय राहील तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाणी बचत, आठवीच्या विद्यार्थ्यांना हवामान बदल, पावसाचे होणारे बदल आदी विषयांची माहिती देण्यात येईल.

जलजागृती विषयावर पाठ्यक्रमात धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पाण्याबाबतचे महत्त्व रुजविण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. जलजागृती सप्ताहातही जनजागृती करण्यात येत आहे.- अविनाश सुर्वे,कार्यकारी संचालक,विदर्भ सिंचन विकास मंडळ, नागपूर. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र