शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

बाळापूर तालुक्यातील ४१ हजार ५३३ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 13:50 IST

बाळापूर तालुक्यातील ४१ हजार ५३३ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.

- अनंत वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतपिकांचे १00 टक्के नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण झाले असून, बाळापूर तालुक्यातील ४१ हजार ५३३ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.गेल्या ३ वर्षांपासून कोरड्या दुष्काळाने होरपळलेल्या शेतकºयाने याही वर्षी खरीप हंगामासाठी पीक कर्ज, सावकाराकडील कर्ज, उसणवारी करून खरीप हंगामात पिकांची पेरणी केली. मोठ्या आशेने पिकावर कर्जाची परतफेडीचे स्वप्न पाहत असताना परतीच्या पावसाने शेतकरी अक्षरश: कोलमडला आहे. तोंडाशी आलेला पिकांचा घास १५ दिवसांच्या पावसाच्या झडीने अक्षरश: हिरावला गेला आहे. खरीप हंगामात संपूर्ण जवळची रक्कम संपल्याने पुन्हा रब्बी हंगामासाठी पैसा कोठून आणायचा, संपूर्ण वर्षाचा खर्च कसा भागवायचा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.तालुक्यातील ४१ हजार १३३ शेतकºयांच्या ५४ हजार ८८२.२३ हेक्टरवरील पिकांचे नुकसानाचा पंचनामा पूर्ण करण्यात आला. खरीप पिकासाठी घेतलेले पीक कर्ज काढून मूग, कापूस, सोयाबीन, उडीद, तूर पिके पेरली त्याला लागणारी खते, पेरणी, डवरणी, फवारणी करून मेहनतीने शेतात हिवरे पिके डोलत असताना निसर्गाने शेतकºयांचा तोंडचा घास पळविला. शेत पिके झाडावरच सडल्याने सोयाबीन काळे पडून रंगहीन झाले व अर्ध्यापेक्षा जास्त शेतातच पडले. त्यामुळे काढणीचा खर्चही निघत नाही. डागी सोयाबीनला नाफेड खरेदी करीत नाही. त्यामुळे नाफेडच्या खरेदी केंद्रावर शुकशुकाट आहे. त्याचा गैरफायदा घेत व्यापारी मातीमोल भावात शेतकºयाचे सोयाबीन, उडीद, खरेदी करीत आहे. यावर नियंत्रण ठेवणारी बाजार समिती मात्र मूग गिळून बसली आहे. बाजार समितीचे परवाना नसलेले व्यापारी शेतकºयांच्या असाह्यतेचा गैरफायदा घेत असताना मात्र कुणीही शेतकºयांचा वाली पुढे येत नसल्याचे चित्र आहे.तालुक्यात सुरुवातीपासूनच अतिवृष्टीमुळे नदी-नाल्या काठच्या शेतजमिनी शेत पिकासह खरडून गेल्या. यामध्ये तालुक्याचा उत्तर भागातील मोठ्या प्रमाणात शेत पिके वाहून गेली आहेत. तर काही क्षेत्रात शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिके सडली, कापसाची झाडे जमिनीवर पडल्याने कापसातून कोंब बाहेर पडली. सोयाबीन, उडीद पिके पाण्याने सडल्याने शेतात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी परसली आहे. हातात आलेली पिके घरी आणण्यासाठी शेत रस्ते नसल्याने शेतात लावलेल्या गंज्यावरच पाण्याने कोंब आले आहेत. शेतकºयाने निसर्गाच्या मारासोबत शासनकर्त्यांचे शेतीसाठी नसलेल्या नियोजनाचा मार शेतकºयांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील ४१,५३३ शेतकºयांनी ५९,८0५ हेक्टर क्षेत्र खरीप पिकांसाठी लागवडीखाली आणले. कापूस क्षेत्र २७ हजार ८५२.१३ हेक्टर, सोयाबीन २0 हजार 00५.४७ हेक्टर, ज्वारी ३ हजार ५0३.१५ हेक्टर, इतर पिके ३ हजार ५१९.४८ हेक्टर एकूण क्षेत्रापैकी ५४ हजार ८८२.२३ हेक्टर यामध्ये बाधित नुकसानीचे क्षेत्र आहे. खरडून गेलेल्या शेतपिकांचे पंचनामेच नाहीत. अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना आलेल्या महापूर व शेतात साचलेल्या पावसाच्या पाण्याने पिके सडली. पिके वाहून गेली, जमीन खरडून गेली; मात्र याचा कुठला सर्व्हे नसल्याने शेतकरी प्रशासनाच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह करीत आहे. खरडून गेलेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करण्याच्या मागणीचे निवेदने शेतकºयांनी तालुका प्रशासनाला दिली; परंतु निवडणुकीच्या कामाबाबत व्यस्त असल्याचे अधिकारी सांगून सर्वेक्षणाला पाठ फिरवली आहे.

 

टॅग्स :BalapurबाळापूरAkolaअकोलाFarmerशेतकरी