शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

विश्व हिंदू परिषदेची ‘शेतकरी जागर यात्रा’ १५ जानेवारीपासून; ८३ तालुक्यांमधून जाणार यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 7:02 PM

विश्व हिंदू परिषदेच्यावतीने १५ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत विदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या दोन ठिकाणांहून ‘शेतकरी जागर यात्रा’ काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या दोन ठिकाणांहून ‘शेतकरी जागर यात्रा’ काढण्यात येणारया यात्रेत डीजीटल रथ राहणार असून, मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे जैविक शेती, गोपालन आदींचा जागर केला जाणार आहे.यात्रा २५५१ किमीचा प्रवास करून वर्धा येथे २६ जानेवारी रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे.

अकोला : शेतकऱ्यांमधील कृषीधर्म जागृत करून, त्यांना गोवंश पालनाचे महत्व समजावून सांगणे, रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहीत करणे या उद्देशाने विश्व हिंदू परिषदेच्यावतीने १५ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत विदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या दोन ठिकाणांहून ‘शेतकरी जागर यात्रा’ काढण्यात येणार असून, वर्धा येथे या यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेकडून सोमवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सनतकुमार गुप्ता यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांमधील कृषीधर्म जागृत करण्यासाठी विदर्भात दोन शेतकरी जागर यात्रा काढण्यात येणार आहेत. जिजाऊंची जन्मभूमी सिंदखेड राजा आणि अहेरी येथून या यात्रांचा शुभारंभ होणार आहे. एकून दहा दिवस चालणारी ही यात्रा २५५१ किमीचा प्रवास करणार आहे. स्वदेशीचा मुलमंत्र देणारे महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी वर्धा येथे २६ जानेवारी रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेत डीजीटल रथ राहणार असून, मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे जैविक शेती, गोपालन आदींचा जागर केला जाणार आहे. या स्क्रिनवर जैविक शेती यशस्वी करणाºया शेतकºयांच्या मुलाखती, गो-विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार व गो-सेवा केंद्र, म्हैसपूर या संस्थांनी केलेल्या अनुसंधानपर प्रयोगांची माहिती देण्यात येईल. तसेच या यात्रेतून गोवंश पालनातून समृद्धीकडे कसे जाता येईल, याविषयी प्रत्यक्ष होत असलेल्या कामाची चित्रफीत प्रदर्शीत केल्या जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस संयोजक अ‍ॅड. अमोल अंधारे, अटल पांडे, महेंद्र देशमुख, गोविंदराव शेंडे, हेमंत थोरात, सुरज भगेवार, डॉ. संजय एकापूरे, राजेश्वर निवळ आदींची उपस्थिती होती.दररोज दोन शेतकरी मेळावे, ३ कृषी वार्ताया यात्रेदरम्यान, दररोज दोन शेतकरी मेळावे, ३ कृषी वार्ता व ३ कृषी चर्चा, रात्री कृषी किर्तन होणार आहे. विदर्भातील ८३ तालुक्यातील गावांमधील लाखो शेतकºयांशी संवाद साधण्यात येणार आहे. गोवंश पालनासोबत जैवीक शेतीचे यशस्वी प्रयोग करणारे शेतकरी या यात्रेत मार्गदर्शन करणार आहेत. गोवंश पालन व जैविक शेती करणााºया शेतकºयांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरFarmerशेतकरी