शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अकोला जिल्ह्यात धुवाधार पाऊस;  तीन तालुक्यांत अतिवृष्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:04 PM

जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, जिल्ह्यातील विविध भागात खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत.

अकोला : जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत सार्वत्रिक धुवाधार पाऊस बरसला असून, बार्शीटाकळी, तेल्हारा व पातूर या तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, जिल्ह्यातील विविध भागात खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.जिल्ह्यातील सातही तालुक्यांत शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस बरसला. शनिवारी दुपारीही पावसाने हजेरी लावली. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ५३.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, त्यामध्ये बार्शीटाकळी, तेल्हारा व पातूर या तीन तालुक्यांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने, या तीनही तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धुवाधार पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून, शेतातील खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतात पावसाचे पाणी साचल्याने कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाच्या दणक्यात कपाशीची फुले-पात्या व बोंड्या व सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्या. तसेच तूर पिकाच्या फांद्याही जमिनीवर कोसळल्या. हाताशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यात सरासरी ५३.३ मि.मी.पाऊस!जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजतापर्यंत गत २४ तासांत सरासरी ५३.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यात ३९.२ मि.मी., बार्शीटाकळी तालुक्यात ८२.१ मि.मी., अकोट तालुक्यात ३८.८ मि.मी., तेल्हारा तालुक्यात ७१.३ मि.मी., बाळापूर तालुक्यात ५५.१ मि.मी., पातूर तालुक्यात ७३.४ मि.मी. व मूर्तिजापूर तालुक्यात १३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.पाच तालुक्यांतील १४ महसूल मंडळांत अतिवृष्टी!जिल्ह्यात पाच तालुक्यांतील १४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील सांगळूद महसूल मंडळात ९१.४ मि.मी., बोरगाव मंजू महसूल मंडळात ७२ मि.मी., बार्शीटाकळी तालुक्यातील बार्शीटाकळी महसूल मंडळात ९० मि.मी., महान महसूल मंडळात १६० मि.मी., खेर्डा बु. महसूल मंडळात ११५ मि.मी., तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा महसूल मंडळात ८७ मि.मी., अडगाव महसूल मंडळात ६७ मि.मी., पाथर्डी महसूल मंडळात ७२ मि.मी., हिवरखेड महसूल मंडळात ६५ मि.मी., पंचगव्हाण महसूल मंडळात ८२ मि.मी., बाळापूर तालुक्यातील निंबा महसूल मंडळात ६८ मि.मी., हातरुण महसूल मंडळात ७६ मि.मी. आणि पातूर तालुक्यातील पातूर महसूल मंडळात ११० मि.मी., बाभूळगाव महसूल मंडळात १६४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
नदी-नाल्याकाठची खरबडून गेली जमीन!जोरदार पाऊस पडल्याने, नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुरामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्याकाठची शेतजमीन खरबडून गेली आहे. शेतजमिनीचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच अतिवृष्टी आणि पावसाचे पाणी शेतांमध्ये साचले असून, पिके पाण्याखाली गेली आहेत.
काटेपूर्णा धरणातील जलसाठा ३३ टक्क्यांवर!अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणातील जलसाठा २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत ३३. ५३ टक्क्यांवर पोहोचला. तसेच वान धरणात ९६.४९ टक्के, मोर्णा धरणात ४६.१८ टक्के, निर्गुणा धरणात ५९.२७ टक्के, उमा धरणात २९.७९ टक्के व दगडपारवा धरणात १३.७४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला. पाऊस व पुरामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्याने, धरणांच्या जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस