शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

दहावी निकाल सुधार प्रकल्पाची अकोल्यात सुरुवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 10:22 AM

दहावी निकाल सुधार प्रकल्प सुरू केला असून, राज्यातील हा पहिला प्रयोग आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: इयत्ता दहावीची घसरत चाललेली टक्केवारी लक्षात घेता, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी आणि निकालाची टक्क्यात वाढ व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेत, दहावी निकाल सुधार प्रकल्प सुरू केला असून, राज्यातील हा पहिला प्रयोग आहे. मंगळवारी मुख्याध्यापकांनी दहावीचा निकाल वाढविण्याबाबतचे सादरीकरण सीईओ आयुष प्रसाद यांच्यासमोर सादर केले.यावर्षी इयत्ता दहावीचा निकाल विभागात सर्वात कमी लागला आहे. दहावी निकालाची घसरलेली टक्केवारी चिंताजनक आहे. पुढील निकालात दहावीची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेतला आहे. सीईओ आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या समन्वयातून दहावी निकाल सुधार प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत इयत्ता दहावीचा १00 टक्के निकाल आणि शाळा गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापकांचे व्हिजन काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मुख्याध्यापकांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. दहावीचा निकाल कसा वाढवायचा, याचे सादरीकरण जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना सीईओ आयुष प्रसाद यांच्यासमोर करायचे आहे. मंगळवार, ५ नोव्हेंबरपासून त्याची जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात सुरुवात झाली. यावेळी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, विभागीय शिक्षण मंडळ सदस्य प्रा. नरेंद्र लखाडे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम झामरे, जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व व्यावसायिक विकास संस्थेच्या प्रतिनिधी कविता बोरसे, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव, डॉ. साबीर कमाल आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षण