शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

अवैध रेती प्रकरणात तेल्हारा तहसीलदारांनी ठोठावला ४२ लाखांचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:34 IST

तेल्हारा : महसूल विभागाने अवैध रेती प्रकरणात गेल्या अकरा महिन्यांत ४८ कारवाया केल्या असून, ४२ लाख दंड केला, ...

तेल्हारा : महसूल विभागाने अवैध रेती प्रकरणात गेल्या अकरा महिन्यांत ४८ कारवाया केल्या असून, ४२ लाख दंड केला, तर ८ वाहने पोलीस स्टेशनमध्ये जमा असून, ८ प्रकरणांत दंडात्मक कारवाई सुरू आहे. दोन वाहने पसार झाल्याने त्याबाबत पोलीस स्टेशनला पत्र दिले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तिप्पट कारवाया करण्यात आल्या असून, तिपटीने दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवायांमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहे.

रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहनधारक शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीत लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. महसूल विभाग कारवाई करून गौण खनिज चोरीला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करीत आहे. तालुक्यात बरेच नदी-नाले असून, पूर्णा व वाण नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन होत असून, अनेक रेतीमाफिया निनावी नंबरच्या वाहनाने अवैध वाहतूक करतात. सदर वाहनेही महसूल विभागाच्या कारवाईनंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पाठवणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही महिन्यांपर्यंत अशा कारवाया करण्यात आल्या नाहीत, तसेच दंड वसूल होणे गरजेचे होते; परंतु तसे झाले नाही. त्यामुळेसुद्धा महसूल विभागाच्या वसुलीमध्ये बरीच घट झाली होती. मागील वर्षात २०१९-२० मध्ये केवळ अकरा वाहनांवर कारवाई करून केवळ १५ लाख महसूल शासनाकडे जमा झाला, तर चालू वर्षात सण २०२०-२०२१ च्या अकरा महिन्यांत ४८ कारवाया करण्यात आल्या असून, ४२ लाखांवर दंड ठोठाविण्यात आला असून, २८ लाख रुपयांचा महसूल शासन दप्तरी जमा झाला आहे. यामध्ये गेल्या तीन महिन्यांत नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार राजेश गुरव यांच्याकडे संजय गांधी निराधार योजना हा विभाग असताना त्यांच्याकडे तहसीलदारपदाचा प्रभार आला. चालू वर्षातील मागील तीन महिन्यांत अवैध रेती वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांनी २८ प्रकरणांत कारवाई करून २६ लाख रुपये दंड वसूल केला आहे. सोबत निनावी नंबरची वाहनांकडून दंडात्मक वसुली करून ती वाहने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला यांच्याकडे वर्ग केली आहेत, तसेच ११२ ब्रास रेती जप्त करून तिचा जाहीर लिलाव ठेवला आहे. ज्या ठिकाणावरून रेती जप्त केली त्यांच्या सातबारावरसुद्धा दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे, असे तहसीलदार राजेश गुरव यांनी सांगितले. सदर कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहे.