शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा - किशोर तिवारी यांची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 12:59 IST

अडकलेली दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

- संतोष येलकरअकोला : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत वाटपाची प्रक्रिया रखडली. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून, खरीप हंगाम तोंडवर आला आहे. त्यानुषंगाने अडकलेली दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.राज्यातील दुष्काळी भागातील ४० लाख शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्र्फत मदतनिधी मंजूर करण्यात आला असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी मंजूर मदतनिधी जिल्हानिहाय वितरित करण्यात आला; परंतु गत मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे राज्यात तालुका स्तरावर दुष्काळी मदतीचे वाटप थांबविण्यात आल्याने बहुतांश दुष्काळग्रस्त शेतकºयांना दुष्काळी मदतीचा लाभ अद्याप मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, खरीप हंगामही तोंडावर आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत अडकलेली दुष्काळी मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २४ मे रोजी केली आहे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.‘पीएम किसान’ मदतीचाही शेतकऱ्यांना लाभ द्या!केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (पीएम-किसान) दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार रुपयांची रक्कम काही शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यात ६० लाख लाभार्थी शेतकरी असून, सर्व लाभार्थी शेतकºयांच्या खात्यात तीन हप्त्याची सहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे पात्राद्वारे केल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारीFarmerशेतकरीdroughtदुष्काळPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना