शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा - किशोर तिवारी यांची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 12:59 IST

अडकलेली दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

- संतोष येलकरअकोला : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत वाटपाची प्रक्रिया रखडली. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून, खरीप हंगाम तोंडवर आला आहे. त्यानुषंगाने अडकलेली दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.राज्यातील दुष्काळी भागातील ४० लाख शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्र्फत मदतनिधी मंजूर करण्यात आला असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी मंजूर मदतनिधी जिल्हानिहाय वितरित करण्यात आला; परंतु गत मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे राज्यात तालुका स्तरावर दुष्काळी मदतीचे वाटप थांबविण्यात आल्याने बहुतांश दुष्काळग्रस्त शेतकºयांना दुष्काळी मदतीचा लाभ अद्याप मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, खरीप हंगामही तोंडावर आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत अडकलेली दुष्काळी मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २४ मे रोजी केली आहे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.‘पीएम किसान’ मदतीचाही शेतकऱ्यांना लाभ द्या!केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (पीएम-किसान) दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार रुपयांची रक्कम काही शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यात ६० लाख लाभार्थी शेतकरी असून, सर्व लाभार्थी शेतकºयांच्या खात्यात तीन हप्त्याची सहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे पात्राद्वारे केल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारीFarmerशेतकरीdroughtदुष्काळPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना