शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा - किशोर तिवारी यांची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 12:59 IST

अडकलेली दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

- संतोष येलकरअकोला : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत वाटपाची प्रक्रिया रखडली. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून, खरीप हंगाम तोंडवर आला आहे. त्यानुषंगाने अडकलेली दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.राज्यातील दुष्काळी भागातील ४० लाख शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्र्फत मदतनिधी मंजूर करण्यात आला असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी मंजूर मदतनिधी जिल्हानिहाय वितरित करण्यात आला; परंतु गत मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे राज्यात तालुका स्तरावर दुष्काळी मदतीचे वाटप थांबविण्यात आल्याने बहुतांश दुष्काळग्रस्त शेतकºयांना दुष्काळी मदतीचा लाभ अद्याप मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, खरीप हंगामही तोंडावर आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत अडकलेली दुष्काळी मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २४ मे रोजी केली आहे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.‘पीएम किसान’ मदतीचाही शेतकऱ्यांना लाभ द्या!केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (पीएम-किसान) दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार रुपयांची रक्कम काही शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यात ६० लाख लाभार्थी शेतकरी असून, सर्व लाभार्थी शेतकºयांच्या खात्यात तीन हप्त्याची सहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे पात्राद्वारे केल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारीFarmerशेतकरीdroughtदुष्काळPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना