शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
4
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
5
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
6
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
7
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
8
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
9
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
10
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
11
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
12
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
13
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
14
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
15
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
16
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
17
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
18
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
19
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

कनिष्ठ महाविद्यालये ओस, शिकवणी वर्गांमध्ये विद्यार्थी भरघोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 14:25 IST

राज्यातील ८0 टक्के कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी तासिकांना हजर राहात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी तासिकांना उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे केल्यानंतर राज्यात अमरावती व लातूर विभाग वगळता, बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्था करण्यात आली; परंतु राज्यातील ८0 टक्के कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी तासिकांना हजर राहात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शिकवणी वर्गांमुळे महाविद्यालये ओस पडत आहेत. अमरावती विभागातसुद्धा महाविद्यालयांमध्ये ओस आणि शिकवणी वर्गांमध्ये विद्यार्थी भरघोस, अशी परिस्थिती आहे.राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये खासगी शिकवणी वर्गांचे मोठे पीक आले आहे. विद्यार्थी केवळ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात; परंतु तासिकांना हजेरी लावत नाहीत. महाविद्यालयांपेक्षा शिकवणी वर्गातील तासिका विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या वाटतात. परिणामी, कनिष्ठ महाविद्यालये ओस पडत आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी करण्यात आल्यानंतर शासनाने अकोला व लातूर विभाग वगळता बायोमेट्रिक उपस्थिती लागू करण्यात आली. सुरुवातीला बायोमेट्रिक उपस्थितीचा परिणाम दिसू लागला; परंतु काही महिन्यांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांची संख्या रोडावली. विज्ञान शाखेचे विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिकेला हजेरी न लावता, केवळ कोचिंग क्लासेसच्या शिक्षणावर भर देत आहेत. कोचिंग क्लासेस संचालकांनी स्वत:चे स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालये सुरू केली आहेत. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी खासगी कोचिंग क्लासेससोबत सामंजस्य करार केले आहेत, त्यामुळे बायोमेट्रिक उपस्थितीचा फज्जा उडाला आहे. कनिष्ठ महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसमध्ये संगनमत असून, नावापुरते बायोमेट्रिक उपस्थिती दाखविण्यात येत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने कडक पाऊले उचलावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय