शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

कनिष्ठ महाविद्यालये ओस, शिकवणी वर्गांमध्ये विद्यार्थी भरघोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 14:25 IST

राज्यातील ८0 टक्के कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी तासिकांना हजर राहात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी तासिकांना उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे केल्यानंतर राज्यात अमरावती व लातूर विभाग वगळता, बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्था करण्यात आली; परंतु राज्यातील ८0 टक्के कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी तासिकांना हजर राहात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शिकवणी वर्गांमुळे महाविद्यालये ओस पडत आहेत. अमरावती विभागातसुद्धा महाविद्यालयांमध्ये ओस आणि शिकवणी वर्गांमध्ये विद्यार्थी भरघोस, अशी परिस्थिती आहे.राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये खासगी शिकवणी वर्गांचे मोठे पीक आले आहे. विद्यार्थी केवळ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात; परंतु तासिकांना हजेरी लावत नाहीत. महाविद्यालयांपेक्षा शिकवणी वर्गातील तासिका विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या वाटतात. परिणामी, कनिष्ठ महाविद्यालये ओस पडत आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी करण्यात आल्यानंतर शासनाने अकोला व लातूर विभाग वगळता बायोमेट्रिक उपस्थिती लागू करण्यात आली. सुरुवातीला बायोमेट्रिक उपस्थितीचा परिणाम दिसू लागला; परंतु काही महिन्यांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांची संख्या रोडावली. विज्ञान शाखेचे विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिकेला हजेरी न लावता, केवळ कोचिंग क्लासेसच्या शिक्षणावर भर देत आहेत. कोचिंग क्लासेस संचालकांनी स्वत:चे स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालये सुरू केली आहेत. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी खासगी कोचिंग क्लासेससोबत सामंजस्य करार केले आहेत, त्यामुळे बायोमेट्रिक उपस्थितीचा फज्जा उडाला आहे. कनिष्ठ महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसमध्ये संगनमत असून, नावापुरते बायोमेट्रिक उपस्थिती दाखविण्यात येत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने कडक पाऊले उचलावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय