शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात विजेची तूट कायम

By admin | Updated: June 4, 2014 23:52 IST

देशातील वाढलेल्या वीज मागणीचा राज्याला फटका बसला असून नागरिकांना सोसावे लागते आकस्मिक भारनियमन

अकोला: गत तीन दिवसांपासून नागरिकांना आकस्मिक भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. वाढलेल्या वीज मागणीमुळे राज्यात मोठय़ा प्रमाणावर विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त विजेचा पुरवठा झाला नाही. देशभर विजेची मागणी वाढली असल्याने त्याचा फटका राज्याला बसला आहे. राज्यातील बहुतांश फिडर भारनियमनमुक्त झालेले आहेत. वीज गळतीनुसार पाडण्यात आलेल्या गटातील अ, ब, क आणि ड गट पूर्णपणे भारनियमनमुक्त आहेत. असे असले तरी तीन दिवसांपासून आकस्मिक भारनियमन केले जात आहे. विजेची वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत उपलब्ध असलेली वीज यात मोठी तफावत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी राष्ट्रीय ग्रीडमधूनही आवश्यक विजेचा पुरवठा महाराष्ट्राला झाला नाही. त्यामुळे आकस्मिक भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. ही तूट भरून काढण्यासाठी वेगवेगळय़ा स्रोतांकडून २ हजार मेगावॅट वीज उपलब्ध करून घेण्यात आली. केंद्राच्या ग्रीडमधून १२00 मेगावॅट वीज बुधवारी मिळाली. अदानीचा ६६0 मेगावॅट आणि जेएसडब्ल्यूचा ३00 मेगावॅटचा संच पूर्ववत सुरू झाल्याने विजेची तूट काही प्रमाणात कमी झाली. त्यानंतरही क आणि ड या भारनियमनमुक्त असलेल्या गटांतील फिडरवरही १ तासाचे भारनियमन करावे लागले. अकोला शहरातील फिडरवरही भारनियमन याच कारणामुळे झाल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. गुरुवारसाठी ८00 ते १000 मेगावॅट वीज उपलब्ध करून घेण्यात आली असल्याने राज्यातील विजेची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.