शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

आलेगावात पाण्याची भीषण टंचाई; ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 9:45 PM

आलेगाव (अकोला): येथे गेल्या एक महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वॉर्ड क्र. चारमधील मुस्लीम महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयवर १७ फेब्रुवारी घागर मोर्चा काढला. 

ठळक मुद्देग्रामस्थांसह पाळीव जनावराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव (अकोला): येथे गेल्या एक महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वॉर्ड क्र. चारमधील मुस्लीम महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयवर १७ फेब्रुवारी घागर मोर्चा काढला. ग्रामपंचायत सरपंचपती गजेंद्र तेलगोटे यांना निवेदन देऊन सात दिवसांत पाण्याची समस्या सोडवावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. आंदोलनामध्ये अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील, असे निवेदनामध्ये नमूद केले आहे. तसेच चोंढी, निर्गुणा प्रकल्पाचे पाणी शासन व प्रशासनाने पारस येथील औष्णिक केंद्राला दिल्यामुळे गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली व ग्रामस्थांसह पाळीव जनावराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अशा विविध समस्या परिसरात निर्माण झाल्याचे महिलांनी सांगितले, तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने मस्तानशाह चौकामध्ये ५0 फुटावर दोन हातपंप उभारले; परंतु ज्या ठिकाणी पाण्याच्या गंभीर समस्या आहेत, तेथे एकही हातपंप नाही. त्यामुळे पाण्याच्या समस्येसाठी नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या समस्येची संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन पाणी समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणagitationआंदोलन