शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिशी संबंधीत दस्तऐवजाच्या जतनासाठी स्कॅनिंग मोहीम

By admin | Updated: August 5, 2014 00:18 IST

महसुल दिनापासून त्या दस्तऐवजाच्या स्कॅनींगची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वाशिम : जिल्हाभरातील तहसील तथा भूमिअभीलेख कार्यालयातील महत्वाच्या दस्तऐवजाचे जतन करण्यासाठी यावेळच्या महसुल दिनापासून त्या दस्तऐवजाच्या स्कॅनींगची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाशिम उपविभाग कार्यालयांतर्गत येणार्‍या वाशिम तहसील कार्यालयात या मोहीमेचा शुभारंभ वाशिमचे उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार यांच्या हस्ते व अप्पर जिल्हाधिकारी एल. बी. राउत, वाशिमचे तहसीलदार आशिष बिजवल, भूमी अभिलेखचे अधीक्षक हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांनी भूमिशी संबंधीत दस्तऐवजाचे महत्व लक्षात घेवून शासनाने महसुल दिनापासून भूमी अभिलेख व तहसील कार्यालयातील सर्व महत्वाच्या दस्तऐवजाचे स्कॅनींग करुन त्याचे जतन करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला अनुसरुन वाशिम जिल्ह्यातही ही मोहीम महसुल दिनापासून राबविल्या जात आहे. या मोहिमेमुळे शेकडो वर्षापासून तहसील वा भूमी अभिलेख कार्यालयात जिर्णावस्थेत पडून असलेल्या व कोणत्याही क्षणी नष्ट होउ शकणार्‍या दस्ताऐवजांना संजीवनी मिळणार आहे. अर्थात स्कॅनीग केलेल्या दस्तऐवजात काही स्पष्ट न दिसल्यासच मुळ दस्तऐवज उघडण्याची गरज पडणार आहे. जिल्ह्यातील सहाही तालूक्यातील दस्ताऐवजाचे स्कॅनींग झाल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातील संगणकात साठविल्यानंतर त्या दस्तऐवजाला महाईसेवा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचाही प्रयत्न शासन, प्रशासनाच्या माध्यमातून करणार आहे.