शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

अकोला जिल्ह्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस कार्ड तयार होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 2:17 PM

जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची २८ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शालेय स्तरावर पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे पायाभूत चाचणीमध्ये मिळणारे गुण शिक्षक अप्लिकेशनमध्ये आॅनलाइन किंवा आॅफलाइन भरणार आहेत. हे अप्लिकेशन सरल प्रणालीशी जोडलेले असल्याने ते गुण आपोआप सरल प्रणालीत जातील. त्यामुळे जिल्ह्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस कार्ड तयार करण्यात येईल.

- नितीन गव्हाळे

 अकोला: शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणी सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची २८ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शालेय स्तरावर पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे. पायाभूत चाचणीमध्ये मिळणारे गुण शिक्षक अप्लिकेशनमध्ये आॅनलाइन किंवा आॅफलाइन भरणार आहेत. हे अप्लिकेशन सरल प्रणालीशी जोडलेले असल्याने ते गुण आपोआप सरल प्रणालीत जातील. त्यामुळे जिल्ह्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस कार्ड तयार करण्यात येईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या केआरएनुसार देशपातळीवर मूल्यमापनात महाराष्ट्राचा प्रथम तीन क्रमांकामध्ये समावेश करण्याचे टार्गेट दिले आहे. त्यानुसार यंदा अध्ययन निष्पत्तींवर आधारित पायाभूत चाचणी ही राज्य मंडळाशी संलग्न शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रगती किती झाली, विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये कमी पडतो आहे, हे तपासण्यात येईल. त्यासाठी जिल्हा स्तरावर सर्व प्रश्नपत्रिका गोपनीय राहतील. प्रश्नपत्रिकांचे तालुकास्तरावरून केंद्रांना वितरण २१ ते २३ आॅगस्टदरम्यान करण्यात येईल. इ. दुसरी ते आठवीचा २८ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते १ पर्यंत प्रथम भाषा, २९ आॅगस्टला गणित, इ. तिसरी ते आठवी ३0 आॅगस्टला इंग्रजी (तृतीय भाषा) आणि इ. सहावी ते आठवी विज्ञान विषयाची चाचणी घेण्यात येईल. शिक्षकांनी गुणांचे मूल्यांकन केल्यानंतर मूलभूत क्षमतेत ७५ टक्केपेक्षा कमी गुण व वर्ग पातळीवरील क्षमतेत ६० टक्केपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय याद्या बनविण्यात येणार आहेत. अशा अप्रगत मुलांकडे विशेष लक्ष दिले जाईल. प्रगत विद्यार्थी प्रगत होईपर्यंत दर महिन्याला त्याची चाचणी घेतली जाणार आहे. पायाभूत चाचणी मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे. लेखी व तोंडी चाचणी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण संकेतस्थळावर भरले जातील. त्यानंतरच प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रोगे्रस कार्ड तयार होईल.गैरप्रकार टाळण्यासाठी समितीपायाभूत चाचणीमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत गुणवाढ होऊ नये, यासाठी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती नेमली आहे. या समितीतील अधिकारी व सदस्य प्रत्येक शाळेला भेट देऊन पाहणी करीत आहेत.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी पायाभूत चाचणी घेण्यात येते. गतवर्षीसुद्धा ही चाचणी घेतली होती. त्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावत असल्याचे दिसून आले. यंदासुद्धा विद्यार्र्थ्याचे प्रोग्रेस कार्ड तयार करण्यासाठी ही चाचणी होत आहे.- समाधान डुकरे, ज्येष्ठ अधिव्याख्याता,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणStudentविद्यार्थी