शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

वृक्षलागवडीत २९ जिल्ह्यांवर लाल शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 15:02 IST

अकोला: ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार राज्यातील २९ जिल्ह्यात अद्यापपर्यंत उद्दिष्टाच्या ३० टक्केही लागवड झालेली नाही.

अकोला: ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार राज्यातील २९ जिल्ह्यात अद्यापपर्यंत उद्दिष्टाच्या ३० टक्केही लागवड झालेली नाही. त्यामुळे त्या जिल्ह्यांची कामगिरी लाल शाईत नोंदली जात आहे. तर पाच जिल्ह्यांमध्ये ३० टक्क्यांवर लागवड झाली आहे. त्याचवेळी कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वृक्षलागवड ६० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची नोंद १५ जुलै रोजी झाली आहे. शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षीच्या पावसाळ्यात राज्यात ३४ कोटी ४९ लाख ९४ हजार ४२० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट शासनाकडून ठरविण्यात आले. त्यासाठी राज्य शासनाच्या विविध ५४ विभागांना जिल्हानिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. संबंधित यंत्रणांमार्फत राज्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्ष लागवड करायची आहे. वृक्ष लागवडीसाठी यंत्रणाकडून खड्डे तयार करण्यात आले. ती संख्या ३२ कोटी ४७ लाख १० हजार ६५९ एवढी आहे. राज्यभरात सध्या पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्याचवेळी अनेक जिल्ह्यांमध्ये वृक्षलागवडीच्या मोहिमेकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच २९ जिल्ह्यांमध्ये गेल्या १५ दिवसातील लागवडीची आकडेवारी निराशाजनक असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पावसाळ््याच्या दिवसातच वृक्षलागवड जोमात होण्याची गरज आहे. त्याचवेळी गती मंद आहे. केवळ पाच जिल्ह्यांमध्ये वृक्षलागवडीची टक्केवारी ३० पेक्षा पुढे सरकली आहे. त्यामध्ये ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दोन जिल्ह्यातच म्हणजे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ती ६० टक्क्यांवर पोहचली आहे.

- राजधानी मुंबई शून्यावरच!राज्याचा कारभार चालवल्या जाणाऱ्या मुंबई शहरात वृक्षलागवड सुरूच झाली नाही. तर मुंबई उपनगरात ती ०.२९ टक्के असल्याची माहिती आहे. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यात केवळ ६ टक्के, लातूर-९, सोलापूर, उस्मानाबाद-१३, नागपूर, जालना, बीड-१४, हिंगोली-१६, अकोला, धुळे-१७, औरंगाबाद, जळगाव-१८, गोंदिया-१९ टक्के वृक्षलागवड झाल्याची आकडेवारी आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाforest departmentवनविभाग