शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

५३५ पैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींमध्ये हाताला काम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:21 AM

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींपैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींच्या स्तरावर सद्य:स्थितीत एक हजार ...

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींपैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींच्या स्तरावर सद्य:स्थितीत एक हजार ३२४ कामे सुरू असून, त्यावर काम करीत असलेल्या पाच हजार १२७ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत विविध कामे करण्यात येतात. त्यामध्ये फळबाग लागवड, वृक्षलागवड, रोपवाटिका, वृक्ष संगोपन, घरकूल, गुरांचे गोठे, शाैचखड्डे, सिंचन विहिरी, तुती लागवड आदी प्रकारची कामे करण्यात येतात. रोहयो अंतर्गत जाॅबकार्डधारक मजुरांना मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्यात येतात. जिल्ह्यात एकूण ५३५ ग्रामपंचायती असून, त्यापैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींतर्गत सद्य:स्थितीत रोजगार हमी योजनेची एक हजार ३२४ कामे सुरू आहेत. सुरू असलेल्या कामांवर पाच हजार १२७ मजुरांची उपस्थिती आहे. संबंधित ग्रामपंचायतींतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींमध्ये सुरू

असलेली कामे व मजूर उपस्थितीची स्थिती!

तालुका ग्रामपंचायत कामे मजूर

अकोला ५७ २६० १०३३

अकोट ५३ ३२३ ११०२

बाळापूर ३५ १८६ ७३७

बार्शिटाकळी ४० १४५ ६०२

मूर्तिजापूर ४० १७३ ७२८

पातूर ३९ १६९ ६६४

तेल्हारा २३ ६८ २६१

...................................................................................................

एकूण २८७ १३२४ ५१२७

सर्वात कमी रोजगार तेल्हारा तालुक्यात!

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींतर्गत कामे सुरू असून, या कामांवर पाच हजार १२७ मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सर्वाधिक ३२३ कामे सुरू असून, या कामांवर एक हजार १०२ मजुरांना रोजगार मिळाला आहे. तेल्हारा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ६८ कामे सुरू असून, त्यावर केवळ २६१ मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे रोहयोंतर्गत जिल्ह्यात सर्वात कमी तेल्हारा तालुक्यात मजुरांना रोजगार मिळाल्याचे चित्र आहे.