शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

गारपिटीने संत्रा पिकाचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:31 IST

विदर्भात पाऊस सुरू च असून, गारपीटही होत असल्याने संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पाऊस व गारपिटीने विदर्भातील फळवर्गीय फळ पिकांचा अंबिया बहार गळाला असून, संत्र्याचे नुकसान झाले आहे. आणखी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या स्थितीत या फळांच्या मृग व येणाºया अंबिया बहाराची काळजी घेण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भात पाऊस सुरू च असून, गारपीटही होत असल्याने संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान झाले आहे.गारपिटीमुळे झाडांच्या फांद्यांवरील आणि खोडांवरील सालीला जखमा होतात. त्यातून झांडांना संक्रमण होऊन प्रामुख्याने फायटोप्थोरा, कोलोटोत्रिकम, डिप्लोडिया, आॅनरनारियासारख्या बुरशीचा शिरकाव होऊन रोगांचा प्रसार वाढतो. पानाला गारांचा मार बसल्याने पाने फाटून गळतात. विदर्भात दोन दिवस पडलेल्या गारपिटीमुळे हे नुकसान झाले आहे. यामुळे सूर्यप्रकाशात झाडांची अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. झाडांवरील मृग बहाराच्या फळाची मोठ्या प्रमाणात फळगळ होते. अंबिया बहाराची फुले गळतात, अंबिया बहार फुटण्यास विलंब होतो. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.ढगाळ वातावरणाचा प्रतिकूल परिणामसततच्या ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे मृग बहार असलेल्या बगीचांमधील फळांवर तपकिरी कुज (ब्राऊन राट) या रोगाचे संक्रमण होऊ शकते. त्यासाठी संपूर्ण झाडावर फोसेटील २.५ ग्रॅम किंवा कॉपर आॅक्सिक्लोराइड ५० डब्ल्यूपी ३० ग्रॅम प्रतिलीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.४पावसामुळे कागदी लिंबूवरील खैºया रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे संरक्षणासाठी कॉपर आॅक्सिक्लोराइड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शेतकºयांनी ही उपाययोजना करावी!गारपिटीने मोडलेल्या फांद्या आरीच्या साहाय्याने कापून त्या भागावर १:१:१० बोर्डो पेस्ट लावावी. तर बुंध्यास १ मीटर उंचीपर्यंतही ही पेस्ट लावावी. साल फाटल्यास १ टक्का पोटॅशियम परमॅग्नेट द्रावणाने १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाणी टाकून स्वच्छ पुसून जखमेवर १:१:१० प्रमाणे बोर्डो पेस्ट लावावी. गारपीटग्रस्त झाडावर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम लीटर पाणी किंवा कॉपर आॅक्सिक्लोराइड ३ ग्रॅम लीटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण ६०० ग्रॅम चुना अधिक ६०० ग्रॅम मोरचूद अधिक १०० लीटर पाणी याप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी करावी.

गारपीट, पाऊस ढगाळ वातावरणामुळे लिंबूवर्गीय पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने शेतकºयांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे फवारणी, उपाययोजना करावी.- डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाHailstormगारपीटagricultureशेतीFarmerशेतकरी