शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

गारपिटीने संत्रा पिकाचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:31 IST

विदर्भात पाऊस सुरू च असून, गारपीटही होत असल्याने संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पाऊस व गारपिटीने विदर्भातील फळवर्गीय फळ पिकांचा अंबिया बहार गळाला असून, संत्र्याचे नुकसान झाले आहे. आणखी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या स्थितीत या फळांच्या मृग व येणाºया अंबिया बहाराची काळजी घेण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भात पाऊस सुरू च असून, गारपीटही होत असल्याने संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान झाले आहे.गारपिटीमुळे झाडांच्या फांद्यांवरील आणि खोडांवरील सालीला जखमा होतात. त्यातून झांडांना संक्रमण होऊन प्रामुख्याने फायटोप्थोरा, कोलोटोत्रिकम, डिप्लोडिया, आॅनरनारियासारख्या बुरशीचा शिरकाव होऊन रोगांचा प्रसार वाढतो. पानाला गारांचा मार बसल्याने पाने फाटून गळतात. विदर्भात दोन दिवस पडलेल्या गारपिटीमुळे हे नुकसान झाले आहे. यामुळे सूर्यप्रकाशात झाडांची अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. झाडांवरील मृग बहाराच्या फळाची मोठ्या प्रमाणात फळगळ होते. अंबिया बहाराची फुले गळतात, अंबिया बहार फुटण्यास विलंब होतो. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.ढगाळ वातावरणाचा प्रतिकूल परिणामसततच्या ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे मृग बहार असलेल्या बगीचांमधील फळांवर तपकिरी कुज (ब्राऊन राट) या रोगाचे संक्रमण होऊ शकते. त्यासाठी संपूर्ण झाडावर फोसेटील २.५ ग्रॅम किंवा कॉपर आॅक्सिक्लोराइड ५० डब्ल्यूपी ३० ग्रॅम प्रतिलीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.४पावसामुळे कागदी लिंबूवरील खैºया रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे संरक्षणासाठी कॉपर आॅक्सिक्लोराइड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शेतकºयांनी ही उपाययोजना करावी!गारपिटीने मोडलेल्या फांद्या आरीच्या साहाय्याने कापून त्या भागावर १:१:१० बोर्डो पेस्ट लावावी. तर बुंध्यास १ मीटर उंचीपर्यंतही ही पेस्ट लावावी. साल फाटल्यास १ टक्का पोटॅशियम परमॅग्नेट द्रावणाने १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाणी टाकून स्वच्छ पुसून जखमेवर १:१:१० प्रमाणे बोर्डो पेस्ट लावावी. गारपीटग्रस्त झाडावर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम लीटर पाणी किंवा कॉपर आॅक्सिक्लोराइड ३ ग्रॅम लीटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण ६०० ग्रॅम चुना अधिक ६०० ग्रॅम मोरचूद अधिक १०० लीटर पाणी याप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी करावी.

गारपीट, पाऊस ढगाळ वातावरणामुळे लिंबूवर्गीय पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने शेतकºयांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे फवारणी, उपाययोजना करावी.- डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाHailstormगारपीटagricultureशेतीFarmerशेतकरी