शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

वऱ्हाडात आता केवळ २१ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 13:58 IST

अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणं मिळून केवळ २१.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आठ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ८.९ टक्के, मोर्णा मध्यम प्रकल्पात ११.६३, निर्गुणा ७.९०, उमा धरणात शून्य तर दगडपारवा धरणात ८.९ टक्के जलसाठा आहे.बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात १६.६२ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणात शून्य टक्के तर पेनटाक ळी धरणात १२.८७ टक्केच जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १६.८० टक्के, सोनलमध्ये शून्य, तर एकबुर्जी प्रकल्पात ११.३६ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे.

अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणं मिळून केवळ २१.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आठ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने एवढे पाणी येत्या तीन महिने आठ लाख अकोलेकरांची तहान भागवेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातही प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मैलोगणती भटकंती सुरू आहे; पण प्रशासनाने टंचाई निवारणार्थ अद्याप कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने जलसंकट अधिक गडद झाले.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती येथे सातत्याने पावसाची अनिश्चितता असते; पण गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील धरणे शंभर टक्केच्या आतच होती. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठे धरण आहे; पण हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नव्हते. आजमितीस या धरणात ८.९ टक्के जलसाठा आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात ११.६३, निर्गुणा ७.९०, उमा धरणात शून्य तर दगडपारवामध्ये शून्य टक्के जलसाठा आहे, तर तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ७२.८० टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती डामाडोल आहे. या जिल्ह्यातील नळगंगा धरणात १६.६२ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणात शून्य टक्के तर पेनटाक ळी धरणात १२.८७ टक्केच जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ३६.६०, मसमध्ये शून्य टक्के, कोराडी २.६५, पलढग १४.९१, मन १२.६५, तोरणा ८.६७ टक्के, तर उतावळी धरणात १२.५३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १६.८० टक्के, सोनलमध्ये शून्य, तर एकबुर्जी प्रकल्पात ११.३६ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे.दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा या मोठ्या प्रकल्पात ४३.०९ टक्के जलसाठा आहे. शहानूरमध्ये ४८.४४, चंद्रभागा ४१.४८ टक्के, पूर्णा १५.३३, तर सपन या धरणात बऱ्यापैकी ४८.१६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात १५.६४ टक्के, अरुणावतीमध्ये ८.२७, बेंबळा धरणात १४.०५, लोअर पूसमध्ये २९.७२, सायखेडा ४९.४१, गोकी ८.१७, वाघाडी १०.४१, बोरगाव ७.७२ टक्के, नवरगाव धरणात २३.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

- २१ टक्क्यात लघू प्रकल्पाचा जलसाठापश्चिम विदर्भात पाटबंधारे विभागाच्या अख्त्यारित ४८४ प्रकल्पांचे नियोजन असून, यात नऊ मोठे, २३ मध्यम व ४५२ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पाचा एकूण जलसाठा २१.३७ टक्के आहे. लघू प्रकल्पातील जलसाठा सहसा पिण्यासाठी वापरतच नसल्याने २१.३७ टक्के जलसाठ्यातून लघू प्रकल्पाचा १२.५२ टक्के जलसाठा वजा केल्यास अत्यंत अल्प जलसाठ आजमितीस वºहाडात शिल्लक आहे. या साठ्यात येणारी तीन महिने काढावी लागणार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिमKatepurna Damकाटेपूर्णा धरणnalganga damनळगंगा धरण