शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात आता केवळ २१ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 13:58 IST

अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणं मिळून केवळ २१.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आठ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ८.९ टक्के, मोर्णा मध्यम प्रकल्पात ११.६३, निर्गुणा ७.९०, उमा धरणात शून्य तर दगडपारवा धरणात ८.९ टक्के जलसाठा आहे.बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात १६.६२ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणात शून्य टक्के तर पेनटाक ळी धरणात १२.८७ टक्केच जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १६.८० टक्के, सोनलमध्ये शून्य, तर एकबुर्जी प्रकल्पात ११.३६ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे.

अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणं मिळून केवळ २१.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आठ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने एवढे पाणी येत्या तीन महिने आठ लाख अकोलेकरांची तहान भागवेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातही प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मैलोगणती भटकंती सुरू आहे; पण प्रशासनाने टंचाई निवारणार्थ अद्याप कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने जलसंकट अधिक गडद झाले.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती येथे सातत्याने पावसाची अनिश्चितता असते; पण गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील धरणे शंभर टक्केच्या आतच होती. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठे धरण आहे; पण हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नव्हते. आजमितीस या धरणात ८.९ टक्के जलसाठा आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात ११.६३, निर्गुणा ७.९०, उमा धरणात शून्य तर दगडपारवामध्ये शून्य टक्के जलसाठा आहे, तर तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ७२.८० टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती डामाडोल आहे. या जिल्ह्यातील नळगंगा धरणात १६.६२ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणात शून्य टक्के तर पेनटाक ळी धरणात १२.८७ टक्केच जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ३६.६०, मसमध्ये शून्य टक्के, कोराडी २.६५, पलढग १४.९१, मन १२.६५, तोरणा ८.६७ टक्के, तर उतावळी धरणात १२.५३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १६.८० टक्के, सोनलमध्ये शून्य, तर एकबुर्जी प्रकल्पात ११.३६ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे.दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा या मोठ्या प्रकल्पात ४३.०९ टक्के जलसाठा आहे. शहानूरमध्ये ४८.४४, चंद्रभागा ४१.४८ टक्के, पूर्णा १५.३३, तर सपन या धरणात बऱ्यापैकी ४८.१६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात १५.६४ टक्के, अरुणावतीमध्ये ८.२७, बेंबळा धरणात १४.०५, लोअर पूसमध्ये २९.७२, सायखेडा ४९.४१, गोकी ८.१७, वाघाडी १०.४१, बोरगाव ७.७२ टक्के, नवरगाव धरणात २३.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

- २१ टक्क्यात लघू प्रकल्पाचा जलसाठापश्चिम विदर्भात पाटबंधारे विभागाच्या अख्त्यारित ४८४ प्रकल्पांचे नियोजन असून, यात नऊ मोठे, २३ मध्यम व ४५२ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पाचा एकूण जलसाठा २१.३७ टक्के आहे. लघू प्रकल्पातील जलसाठा सहसा पिण्यासाठी वापरतच नसल्याने २१.३७ टक्के जलसाठ्यातून लघू प्रकल्पाचा १२.५२ टक्के जलसाठा वजा केल्यास अत्यंत अल्प जलसाठ आजमितीस वºहाडात शिल्लक आहे. या साठ्यात येणारी तीन महिने काढावी लागणार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिमKatepurna Damकाटेपूर्णा धरणnalganga damनळगंगा धरण