शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वऱ्हाडात आता केवळ २१ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 13:58 IST

अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणं मिळून केवळ २१.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आठ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ८.९ टक्के, मोर्णा मध्यम प्रकल्पात ११.६३, निर्गुणा ७.९०, उमा धरणात शून्य तर दगडपारवा धरणात ८.९ टक्के जलसाठा आहे.बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात १६.६२ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणात शून्य टक्के तर पेनटाक ळी धरणात १२.८७ टक्केच जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १६.८० टक्के, सोनलमध्ये शून्य, तर एकबुर्जी प्रकल्पात ११.३६ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे.

अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणं मिळून केवळ २१.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आठ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने एवढे पाणी येत्या तीन महिने आठ लाख अकोलेकरांची तहान भागवेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातही प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मैलोगणती भटकंती सुरू आहे; पण प्रशासनाने टंचाई निवारणार्थ अद्याप कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने जलसंकट अधिक गडद झाले.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती येथे सातत्याने पावसाची अनिश्चितता असते; पण गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील धरणे शंभर टक्केच्या आतच होती. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठे धरण आहे; पण हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नव्हते. आजमितीस या धरणात ८.९ टक्के जलसाठा आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात ११.६३, निर्गुणा ७.९०, उमा धरणात शून्य तर दगडपारवामध्ये शून्य टक्के जलसाठा आहे, तर तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ७२.८० टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती डामाडोल आहे. या जिल्ह्यातील नळगंगा धरणात १६.६२ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणात शून्य टक्के तर पेनटाक ळी धरणात १२.८७ टक्केच जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ३६.६०, मसमध्ये शून्य टक्के, कोराडी २.६५, पलढग १४.९१, मन १२.६५, तोरणा ८.६७ टक्के, तर उतावळी धरणात १२.५३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १६.८० टक्के, सोनलमध्ये शून्य, तर एकबुर्जी प्रकल्पात ११.३६ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे.दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा या मोठ्या प्रकल्पात ४३.०९ टक्के जलसाठा आहे. शहानूरमध्ये ४८.४४, चंद्रभागा ४१.४८ टक्के, पूर्णा १५.३३, तर सपन या धरणात बऱ्यापैकी ४८.१६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात १५.६४ टक्के, अरुणावतीमध्ये ८.२७, बेंबळा धरणात १४.०५, लोअर पूसमध्ये २९.७२, सायखेडा ४९.४१, गोकी ८.१७, वाघाडी १०.४१, बोरगाव ७.७२ टक्के, नवरगाव धरणात २३.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

- २१ टक्क्यात लघू प्रकल्पाचा जलसाठापश्चिम विदर्भात पाटबंधारे विभागाच्या अख्त्यारित ४८४ प्रकल्पांचे नियोजन असून, यात नऊ मोठे, २३ मध्यम व ४५२ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पाचा एकूण जलसाठा २१.३७ टक्के आहे. लघू प्रकल्पातील जलसाठा सहसा पिण्यासाठी वापरतच नसल्याने २१.३७ टक्के जलसाठ्यातून लघू प्रकल्पाचा १२.५२ टक्के जलसाठा वजा केल्यास अत्यंत अल्प जलसाठ आजमितीस वºहाडात शिल्लक आहे. या साठ्यात येणारी तीन महिने काढावी लागणार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिमKatepurna Damकाटेपूर्णा धरणnalganga damनळगंगा धरण