शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

ऑनलाइन एज्युकेशनने बिघडविले हस्ताक्षर अन् लिहिण्याची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 10:08 IST

Online education डोळ्यांच्या आरोग्यासोबत आता विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर आणि लिहिण्याची गती बिघडली आहे.

ठळक मुद्देलेखी परीक्षा झाल्यास येणार अडचणीकोरोनामुळे ऑनलाईनवर भर

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाईलाजाने ऑनलाईन प्रणालीचा स्वीकार करावा लागत आहे. ऑनलाईन मोबाईल शिक्षणामुळे डोळ्यांच्या आरोग्यासोबत आता विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर आणि लिहिण्याची गती बिघडली आहे. यामुळे लेखी परीक्षेत अडचणी निर्माण होणार आहेत.

मार्च २०२० पासून कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे; यामध्ये दीड वर्षापासून केवळ मोबाईलचा उपयोग करून ऑनलाईन शिक्षण होत आहे. लिहिण्याची सवय नसल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर कमालीचे बिघडत चालले आहेत. वळणदार हस्ताक्षर येत नसून लिहिण्याची गतीही मंदावत आहे. पालकवर्गही याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने विद्यार्थी दुर्लक्ष करीत आहेत. दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा जवळ आली असून परीक्षेतील सर्व प्रश्न सोडविता येणार की नाही, याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे. प्रश्न-उत्तरे व गृहपाठ लिहिण्याची सवय राहली नसल्याने लेखी परीक्षेला अडचण येणार आहे.

विद्यार्थ्यांनो हे करा!

१) विद्यार्थ्यांनी नियमित काही पाने शुद्धलेखनाचा सराव करावा.

२) पुस्तकांमधील काही उतारे वहीमध्ये लिहिल्यास हस्ताक्षरांची गती वाढण्यास मदत होईल.

३) दररोज ऑनलाईन शिक्षणामध्ये सांगितलेले लिहून घ्यावे.

मराठी विषयांचे तज्ज म्हणतात...

मूल्यमापन लेखी परीक्षेवर होत असते. लेखी पेपर सोडविण्यासाठी लेखी सराव आवश्यक असतो. तीन तासाच्या आत पेपर सोडविण्यासाठी हा सराव गरजेचा आहे. शिक्षक व शाळांनी लेखी सराव करून घेतल्यास अडचण दूर होईल.

नीलेश पाकदुणे, शिक्षक

 

लिहिण्याचा सराव राहिला नाही. मोबाईलमध्ये बोलून टाईप करूनच सर्व शक्य होत आहे. मुलांना हस्तांक्षरात लेखन करणे गरजेचे वाटत नाही. त्याचा परिणाम शुद्धलेखनावर होत आहे.

स्वाती दामोदरे, शिक्षिका

ऑनलाईनमुळे लिहिण्याची सवय बिघडत चालली आहे. त्यामुळे घरीच हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. मुलांचा लेखी सराव सुरू आहे.

किशोर पाटील, पालक

 

ऑनलाईन अभ्यासामुळे मुले लिहिण्याचा सराव विसरले आहेत. मोबाईलवर सर्व होते. लिहिण्याची गती कमी झाली आहे. त्यामुळे लेखी परीक्षेची चिंता लागली आहे.

अमोल कळंब, पालक

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीonlineऑनलाइनEducationशिक्षण