शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

ऑनलाइन एज्युकेशनने बिघडविले हस्ताक्षर अन् लिहिण्याची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 10:08 IST

Online education डोळ्यांच्या आरोग्यासोबत आता विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर आणि लिहिण्याची गती बिघडली आहे.

ठळक मुद्देलेखी परीक्षा झाल्यास येणार अडचणीकोरोनामुळे ऑनलाईनवर भर

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाईलाजाने ऑनलाईन प्रणालीचा स्वीकार करावा लागत आहे. ऑनलाईन मोबाईल शिक्षणामुळे डोळ्यांच्या आरोग्यासोबत आता विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर आणि लिहिण्याची गती बिघडली आहे. यामुळे लेखी परीक्षेत अडचणी निर्माण होणार आहेत.

मार्च २०२० पासून कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे; यामध्ये दीड वर्षापासून केवळ मोबाईलचा उपयोग करून ऑनलाईन शिक्षण होत आहे. लिहिण्याची सवय नसल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर कमालीचे बिघडत चालले आहेत. वळणदार हस्ताक्षर येत नसून लिहिण्याची गतीही मंदावत आहे. पालकवर्गही याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने विद्यार्थी दुर्लक्ष करीत आहेत. दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा जवळ आली असून परीक्षेतील सर्व प्रश्न सोडविता येणार की नाही, याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे. प्रश्न-उत्तरे व गृहपाठ लिहिण्याची सवय राहली नसल्याने लेखी परीक्षेला अडचण येणार आहे.

विद्यार्थ्यांनो हे करा!

१) विद्यार्थ्यांनी नियमित काही पाने शुद्धलेखनाचा सराव करावा.

२) पुस्तकांमधील काही उतारे वहीमध्ये लिहिल्यास हस्ताक्षरांची गती वाढण्यास मदत होईल.

३) दररोज ऑनलाईन शिक्षणामध्ये सांगितलेले लिहून घ्यावे.

मराठी विषयांचे तज्ज म्हणतात...

मूल्यमापन लेखी परीक्षेवर होत असते. लेखी पेपर सोडविण्यासाठी लेखी सराव आवश्यक असतो. तीन तासाच्या आत पेपर सोडविण्यासाठी हा सराव गरजेचा आहे. शिक्षक व शाळांनी लेखी सराव करून घेतल्यास अडचण दूर होईल.

नीलेश पाकदुणे, शिक्षक

 

लिहिण्याचा सराव राहिला नाही. मोबाईलमध्ये बोलून टाईप करूनच सर्व शक्य होत आहे. मुलांना हस्तांक्षरात लेखन करणे गरजेचे वाटत नाही. त्याचा परिणाम शुद्धलेखनावर होत आहे.

स्वाती दामोदरे, शिक्षिका

ऑनलाईनमुळे लिहिण्याची सवय बिघडत चालली आहे. त्यामुळे घरीच हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. मुलांचा लेखी सराव सुरू आहे.

किशोर पाटील, पालक

 

ऑनलाईन अभ्यासामुळे मुले लिहिण्याचा सराव विसरले आहेत. मोबाईलवर सर्व होते. लिहिण्याची गती कमी झाली आहे. त्यामुळे लेखी परीक्षेची चिंता लागली आहे.

अमोल कळंब, पालक

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीonlineऑनलाइनEducationशिक्षण