शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

‘नरेगा ’ कामांचे नियोजन कोलमडले!

By admin | Updated: March 12, 2017 02:30 IST

यंत्रणांची उदासीनता; कामांच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह.

संतोष येलकर अकोला, दि. ११- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राबबिण्यात येत असलेल्या 'समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण' योजनेत जिल्हय़ात विविध कामांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे; मात्र कामांच्या नियोजनाचा अहवाल अद्यापही यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे यंत्रणांच्या उदासीनतेत जिल्हय़ातील ह्यनरेगाह्ण कामांचे नियोजन कोलमडले असून, उद्दिष्टानुसार कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची ११ प्रकारची कामे प्राधान्याने करण्यासाठी शासनामार्फत ह्यसमृद्ध महाराष्ट्र जनकल्याणह्ण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सन २0१६-१७ व २0१७-१८ या दोन वर्षांत सिंचन विहिरी, शेततळी, शौचालयांचे बांधकाम, फळबाग लागवड, शोषखड्डे, ग्राम सबलीकरण, व्हर्मी कंपोस्ट टाके, नाडेप टाके, रोपे निर्मिती, वृक्ष लागवड, गाव तलाव-पाणी साठय़ांचे नूतनीकरण व गाळ काढणे आणि जलसंधारणाची कामे करावयाची आहेत. त्यानुषंगाने जिल्हय़ात यंत्रणानिहाय करावयाच्या कामांचे उद्दिष्ट गत नोव्हेंबरमध्ये ठरविण्यात आले आहे. उद्दिष्टानुसार कामे करण्यासाठी ग्रामसभांचे ठराव घेऊन कामांच्या नियोजनाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत जिल्हय़ातील संबंधित यंत्रणांना देण्यात आले; परंतु ह्यनरेगाह्ण अंतर्गत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांच्या नियोजनाचा अहवाल एकाही यंत्रणेकडून अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे प्राप्त झाला नाही. त्यानुषंगाने यंत्रणांच्या उदासीनतेत नरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र योजनेत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांचे नियोजन रखडले आहे. नियोजन कोलमडल्याच्या पृष्ठभूमीवर ह्यनरेगाह्ण अंतर्गत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांचे उद्दिष्ट केव्हा आणि कसे पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.'या' यंत्रणांकडून रखडले कामांचे नियोजन!'नरेगा' अंतर्गत जिल्हय़ात प्राधान्याने कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, लघू सिंचन (जलसंधारण) विभाग व जिल्हा परिषद लघू सिंचन विभाग इत्यादी यंत्रणांना कामांचे नियोजन करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले; मात्र या यंत्रणांकडून कामांच्या नियोजनाचे अहवाल अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे प्राप्त झाले नाही. त्यामुळे ह्यनरेगाह्ण अंतर्गत प्राधान्याने करावयाच्या जिल्हय़ातील कामांचे नियोजन रखडले आहे.असे आहे कामांचे उद्दिष्ट! नरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये २ हजार ५00 सिंचन विहिरी, १ हजार ४00 शेततळे, २ हजार ३00 शौचालयांची बांधकामे, २ हजार ६00 शोषखड्डे, २ हजार ४00 हेक्टर फळबाग लागवड, ४ हजार ५00 ग्राम सबलीकरण, ३ हजार ३00 व्हर्मी कंपोस्ट टाके, ३ हजार ३00 नाडेप टाके, १८ लाख रोपे निर्मिती, १ लाख ८0 हजार वृक्ष लागवड, ७७0 गावतलाव-पाणीसाठय़ाचे नूतनीकरण, ७७0 गाळ काढण्याची कामे आणि ७६0 जलसंधारणाची कामे इत्यादी कामांचा समावेश आहे.