शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
2
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
3
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
4
"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला
5
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
6
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
7
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
8
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
9
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
10
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
11
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता
12
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
13
Anil Chauhan: चीनसोबतचा सीमावाद हे सर्वांत मोठे आव्हान; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे वक्तव्य
14
यमुनेच्या पुराने अर्धी दिल्ली पाण्यात; नोएडा, गाझियाबादमध्ये स्थिती बिकट
15
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
16
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
17
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
18
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
19
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...

‘नरेगा ’ कामांचे नियोजन कोलमडले!

By admin | Updated: March 12, 2017 02:30 IST

यंत्रणांची उदासीनता; कामांच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह.

संतोष येलकर अकोला, दि. ११- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राबबिण्यात येत असलेल्या 'समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण' योजनेत जिल्हय़ात विविध कामांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे; मात्र कामांच्या नियोजनाचा अहवाल अद्यापही यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे यंत्रणांच्या उदासीनतेत जिल्हय़ातील ह्यनरेगाह्ण कामांचे नियोजन कोलमडले असून, उद्दिष्टानुसार कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची ११ प्रकारची कामे प्राधान्याने करण्यासाठी शासनामार्फत ह्यसमृद्ध महाराष्ट्र जनकल्याणह्ण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सन २0१६-१७ व २0१७-१८ या दोन वर्षांत सिंचन विहिरी, शेततळी, शौचालयांचे बांधकाम, फळबाग लागवड, शोषखड्डे, ग्राम सबलीकरण, व्हर्मी कंपोस्ट टाके, नाडेप टाके, रोपे निर्मिती, वृक्ष लागवड, गाव तलाव-पाणी साठय़ांचे नूतनीकरण व गाळ काढणे आणि जलसंधारणाची कामे करावयाची आहेत. त्यानुषंगाने जिल्हय़ात यंत्रणानिहाय करावयाच्या कामांचे उद्दिष्ट गत नोव्हेंबरमध्ये ठरविण्यात आले आहे. उद्दिष्टानुसार कामे करण्यासाठी ग्रामसभांचे ठराव घेऊन कामांच्या नियोजनाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत जिल्हय़ातील संबंधित यंत्रणांना देण्यात आले; परंतु ह्यनरेगाह्ण अंतर्गत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांच्या नियोजनाचा अहवाल एकाही यंत्रणेकडून अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे प्राप्त झाला नाही. त्यानुषंगाने यंत्रणांच्या उदासीनतेत नरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र योजनेत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांचे नियोजन रखडले आहे. नियोजन कोलमडल्याच्या पृष्ठभूमीवर ह्यनरेगाह्ण अंतर्गत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांचे उद्दिष्ट केव्हा आणि कसे पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.'या' यंत्रणांकडून रखडले कामांचे नियोजन!'नरेगा' अंतर्गत जिल्हय़ात प्राधान्याने कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, लघू सिंचन (जलसंधारण) विभाग व जिल्हा परिषद लघू सिंचन विभाग इत्यादी यंत्रणांना कामांचे नियोजन करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले; मात्र या यंत्रणांकडून कामांच्या नियोजनाचे अहवाल अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे प्राप्त झाले नाही. त्यामुळे ह्यनरेगाह्ण अंतर्गत प्राधान्याने करावयाच्या जिल्हय़ातील कामांचे नियोजन रखडले आहे.असे आहे कामांचे उद्दिष्ट! नरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये २ हजार ५00 सिंचन विहिरी, १ हजार ४00 शेततळे, २ हजार ३00 शौचालयांची बांधकामे, २ हजार ६00 शोषखड्डे, २ हजार ४00 हेक्टर फळबाग लागवड, ४ हजार ५00 ग्राम सबलीकरण, ३ हजार ३00 व्हर्मी कंपोस्ट टाके, ३ हजार ३00 नाडेप टाके, १८ लाख रोपे निर्मिती, १ लाख ८0 हजार वृक्ष लागवड, ७७0 गावतलाव-पाणीसाठय़ाचे नूतनीकरण, ७७0 गाळ काढण्याची कामे आणि ७६0 जलसंधारणाची कामे इत्यादी कामांचा समावेश आहे.