शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘नरेगा ’ कामांचे नियोजन कोलमडले!

By admin | Updated: March 12, 2017 02:30 IST

यंत्रणांची उदासीनता; कामांच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह.

संतोष येलकर अकोला, दि. ११- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राबबिण्यात येत असलेल्या 'समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण' योजनेत जिल्हय़ात विविध कामांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे; मात्र कामांच्या नियोजनाचा अहवाल अद्यापही यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे यंत्रणांच्या उदासीनतेत जिल्हय़ातील ह्यनरेगाह्ण कामांचे नियोजन कोलमडले असून, उद्दिष्टानुसार कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची ११ प्रकारची कामे प्राधान्याने करण्यासाठी शासनामार्फत ह्यसमृद्ध महाराष्ट्र जनकल्याणह्ण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सन २0१६-१७ व २0१७-१८ या दोन वर्षांत सिंचन विहिरी, शेततळी, शौचालयांचे बांधकाम, फळबाग लागवड, शोषखड्डे, ग्राम सबलीकरण, व्हर्मी कंपोस्ट टाके, नाडेप टाके, रोपे निर्मिती, वृक्ष लागवड, गाव तलाव-पाणी साठय़ांचे नूतनीकरण व गाळ काढणे आणि जलसंधारणाची कामे करावयाची आहेत. त्यानुषंगाने जिल्हय़ात यंत्रणानिहाय करावयाच्या कामांचे उद्दिष्ट गत नोव्हेंबरमध्ये ठरविण्यात आले आहे. उद्दिष्टानुसार कामे करण्यासाठी ग्रामसभांचे ठराव घेऊन कामांच्या नियोजनाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत जिल्हय़ातील संबंधित यंत्रणांना देण्यात आले; परंतु ह्यनरेगाह्ण अंतर्गत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांच्या नियोजनाचा अहवाल एकाही यंत्रणेकडून अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे प्राप्त झाला नाही. त्यानुषंगाने यंत्रणांच्या उदासीनतेत नरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र योजनेत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांचे नियोजन रखडले आहे. नियोजन कोलमडल्याच्या पृष्ठभूमीवर ह्यनरेगाह्ण अंतर्गत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांचे उद्दिष्ट केव्हा आणि कसे पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.'या' यंत्रणांकडून रखडले कामांचे नियोजन!'नरेगा' अंतर्गत जिल्हय़ात प्राधान्याने कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, लघू सिंचन (जलसंधारण) विभाग व जिल्हा परिषद लघू सिंचन विभाग इत्यादी यंत्रणांना कामांचे नियोजन करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले; मात्र या यंत्रणांकडून कामांच्या नियोजनाचे अहवाल अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे प्राप्त झाले नाही. त्यामुळे ह्यनरेगाह्ण अंतर्गत प्राधान्याने करावयाच्या जिल्हय़ातील कामांचे नियोजन रखडले आहे.असे आहे कामांचे उद्दिष्ट! नरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये २ हजार ५00 सिंचन विहिरी, १ हजार ४00 शेततळे, २ हजार ३00 शौचालयांची बांधकामे, २ हजार ६00 शोषखड्डे, २ हजार ४00 हेक्टर फळबाग लागवड, ४ हजार ५00 ग्राम सबलीकरण, ३ हजार ३00 व्हर्मी कंपोस्ट टाके, ३ हजार ३00 नाडेप टाके, १८ लाख रोपे निर्मिती, १ लाख ८0 हजार वृक्ष लागवड, ७७0 गावतलाव-पाणीसाठय़ाचे नूतनीकरण, ७७0 गाळ काढण्याची कामे आणि ७६0 जलसंधारणाची कामे इत्यादी कामांचा समावेश आहे.