शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

खोदकाम केले, जलवाहिनीचा पत्ता नाही; पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:32 PM

अकोला: महापालिकेच्या दप्तरी पहिला क्रमांक असणाऱ्या नायगाव प्रभागात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे चित्र आहे.

अकोला: महापालिकेच्या दप्तरी पहिला क्रमांक असणाऱ्या नायगाव प्रभागात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे चित्र आहे. मनपाला मंजूर झालेल्या ‘अमृत’ योजनेंतर्गत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी अर्धवट खोदकाम करण्यात आले. या भागात जलवाहिनीच नसल्यामुळे महिलांसह लहान मुलांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याचे दिसून आले.महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा भाग म्हणून नायगाव प्रभागाकडे पाहिल्या जाते. संपूर्ण प्रभागाचा स्लम एरियात समावेश होत असल्याने या भागात विकास कामांना मोठा वाव आहे; परंतु प्रभागाचे चारही नगरसेवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, मनपात सत्ता भाजपची आहे. त्यामुळे साहजिकच नायगावच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप सातत्याने होतो. नायगावची एकूणच स्थिती लक्षात घेतली असता, काँग्रेस नगरसेवकांच्या आरोपात तथ्य दिसून येते. नायगावातील वाकापूर रस्ता, इदगाह परिसरात पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्यामुळे लहान मुलांसह महिलांवर पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र समोर आले. या भागात जलवाहिनीसाठी अर्धवट खोदकाम करण्यात आले. नंतर महापालिकेचा कोणताही अधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याचे महिलांनी सांगितले. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कार्यकाळात सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली होती. शौचालयासाठी पाणी हवे म्हणून सबमर्सिबल पंप बसविण्यात आला. त्यावर नागरिकांनी नळाचे स्टॅन्ड लावले असून, याद्वारे तात्पुरता तोडगा काढण्यात आला. नायगाव परिसराकडे मनपाचे अधिकारी ढुंकूनही पाहत नसल्याचा आरोप महिलांनी केला. गुंठेवारी जमिनीवर कर आकारणी केली; परंतु पाणीपुरवठा, स्वच्छतेचा मागमूगसही नसल्याचे शेख शौकत शेख गफूर यांनी सांगितले. सबमर्सिबल पंपावरील साहित्याची वारंवार चोरी होते. त्यावेळी वर्गणी जमा करून सबमर्सिबलचे साहित्य आणल्या जात असल्याचे शेख मुख्तार यांनी सांगितले. जलवाहिनी नसल्यामुळे नागरिकांना गोडे पाणी मिळत नसल्याची तक्रार सईदा बी परवीन यांनी केली. एकाच सबमर्सिबल पंपावर परिसरातील नागरिकांची गर्दी होते. त्यातच पाण्याचा दाब कमी असल्याने एक हंडा भरण्यासाठी किमान २० मिनिट अवधी लागत असल्याचे सायरा बी, जैनबबी, यासीन परवीन, अंजूम परवीन, रेहाना परवीन यांनी सांगितले. प्रभागात काँग्रेसचे तीन व एक राष्ट्रवादीचे नगरसेवक असूनही आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सलमा फिरदोस यांनी सांगितले.सतत पाठपुरावा करतोय!नगरसेवक अब्दुल रहीम अ. कादर यांना विचारणा केली असता, दाट लोकवस्तीच्या भागात पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी मनपा प्रशासनासह महापौरांकडे सतत पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई