शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

निमकर्दा येथे १४ एकरातील गावतलावाचे काम अर्धवट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:43 IST

हातरुण :  बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथे १४ एकरात गावतलाव साकारत असताना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या गावतलावाचे काम ठप्प पडले आहे.

- संतोष गव्हाळेहातरुण :  बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथे १४ एकरात गावतलाव साकारत असताना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या गावतलावाचे काम ठप्प पडले आहे. ई - क्लास जमिनीवर साकारत असलेल्या या गावतलावाचे काम सुरू करण्याचा मुहूर्त कधी निघतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरनाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गाच्या निर्मिती मध्ये निमकर्दा येथील ई - क्लास जमिनीचे खोदकाम करून त्यातील मुरुम वापरण्यात येत आहे. १४ एकरात जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या साह्याने खंडाळा ते मांजरी नाल्याच्या बाजूने गावतलावाचे खोदकाम सुरू होते. या मुरुमाची मोठ्या ट्रकने वाहतूक सुरू होती. मात्र अचानक या तलावाच्या ठिकाणी सुरू असलेले खोदकाम बंद करण्यात आले. १४ एकरातील गावतलावचे काम ठप्प पडल्याने या पावसाळ्यात या तलावात पाणी साठवणार नाही. निमकर्दा आणि टाकळी निमकर्दा गावातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी निमकर्दा ते मोरगाव सादीजन मार्गावर १४ एकराच्या गावतलावासाठी प्रयत्न केले. साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या निमकर्दा येथे १४ एकरातील गावतलावाच्या आजूबाजूच्या भिंतीचे काम अर्धवट असून तलावाचे खोलीकरण १० फूट पर्यंत झाले आहे. या तलावाचे खोलीकरण १५ फूटपर्यंत पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी या तलावाचे काम झाल्यास या तलावात पाणीसाठा राहणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी या तलावाच्या कामाची बाळापूरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी पाहणी केली होती. मे महिन्यात अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून यावर उपाययोजना करण्यासाठी गावतलावाच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे असतांना याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दृष्काळ सदृष्य परिस्थितीत हा गावतलाव साकारल्यास जीवनदायी ठरणार आहे. या गावतालावामुळे गुराढोरांची तहान भागणार असून नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळणार आहे. गावतलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ होण्याच्या दृष्टीने हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.

बंद पडलेल्या कामाला मुहूर्त सापडेना!

अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरनाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गाच्या निर्मिती मध्ये निमकर्दा येथील ई - क्लास जमिनीचे खोदकाम करून त्यातील मुरुम वापरण्यात येत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुरुमाचे खोदकाम बंद करण्यात आले. अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरणा साठी निमकर्दा ऐवजी दुसऱ्या गावातून मुरुम नेण्यात येत असल्याने निमकर्दा गावतलावचे काम ठप्प पडले आहे.

दृष्काळ सदृष्य परिस्थितीत निमकर्दा गावतलाव साकारल्यास जीवनदायी ठरणार आहे. या गावतालावामुळे गुराढोरांची तहान भागणार असून नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळणार आहे. गावतलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ होण्याच्या दृष्टीने हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केल्यास लोकसहभाग मिळणार आहे.      -  नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, बाळापूर. 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई