शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

निमकर्दा येथे १४ एकरातील गावतलावाचे काम अर्धवट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:43 IST

हातरुण :  बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथे १४ एकरात गावतलाव साकारत असताना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या गावतलावाचे काम ठप्प पडले आहे.

- संतोष गव्हाळेहातरुण :  बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथे १४ एकरात गावतलाव साकारत असताना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या गावतलावाचे काम ठप्प पडले आहे. ई - क्लास जमिनीवर साकारत असलेल्या या गावतलावाचे काम सुरू करण्याचा मुहूर्त कधी निघतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरनाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गाच्या निर्मिती मध्ये निमकर्दा येथील ई - क्लास जमिनीचे खोदकाम करून त्यातील मुरुम वापरण्यात येत आहे. १४ एकरात जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या साह्याने खंडाळा ते मांजरी नाल्याच्या बाजूने गावतलावाचे खोदकाम सुरू होते. या मुरुमाची मोठ्या ट्रकने वाहतूक सुरू होती. मात्र अचानक या तलावाच्या ठिकाणी सुरू असलेले खोदकाम बंद करण्यात आले. १४ एकरातील गावतलावचे काम ठप्प पडल्याने या पावसाळ्यात या तलावात पाणी साठवणार नाही. निमकर्दा आणि टाकळी निमकर्दा गावातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी निमकर्दा ते मोरगाव सादीजन मार्गावर १४ एकराच्या गावतलावासाठी प्रयत्न केले. साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या निमकर्दा येथे १४ एकरातील गावतलावाच्या आजूबाजूच्या भिंतीचे काम अर्धवट असून तलावाचे खोलीकरण १० फूट पर्यंत झाले आहे. या तलावाचे खोलीकरण १५ फूटपर्यंत पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी या तलावाचे काम झाल्यास या तलावात पाणीसाठा राहणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी या तलावाच्या कामाची बाळापूरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी पाहणी केली होती. मे महिन्यात अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून यावर उपाययोजना करण्यासाठी गावतलावाच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे असतांना याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दृष्काळ सदृष्य परिस्थितीत हा गावतलाव साकारल्यास जीवनदायी ठरणार आहे. या गावतालावामुळे गुराढोरांची तहान भागणार असून नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळणार आहे. गावतलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ होण्याच्या दृष्टीने हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.

बंद पडलेल्या कामाला मुहूर्त सापडेना!

अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरनाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गाच्या निर्मिती मध्ये निमकर्दा येथील ई - क्लास जमिनीचे खोदकाम करून त्यातील मुरुम वापरण्यात येत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुरुमाचे खोदकाम बंद करण्यात आले. अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरणा साठी निमकर्दा ऐवजी दुसऱ्या गावातून मुरुम नेण्यात येत असल्याने निमकर्दा गावतलावचे काम ठप्प पडले आहे.

दृष्काळ सदृष्य परिस्थितीत निमकर्दा गावतलाव साकारल्यास जीवनदायी ठरणार आहे. या गावतालावामुळे गुराढोरांची तहान भागणार असून नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळणार आहे. गावतलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ होण्याच्या दृष्टीने हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केल्यास लोकसहभाग मिळणार आहे.      -  नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, बाळापूर. 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई