शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतची धुरा तरुणाईच्या खांद्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:34 IST

तालुक्यातील ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यावेळी निवडणूक झालेल्या २९ ग्रामपंचायतींपैकी सोनोरी (बपोरी) ...

तालुक्यातील ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यावेळी निवडणूक झालेल्या २९ ग्रामपंचायतींपैकी सोनोरी (बपोरी) व मोहखेड या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होऊन गेल्या १५ जानेवारीला २७ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी पार पडली, उर्वरित १५ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचपदासाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सर्वांत कमी वयाचे सरपंच म्हणून लाखपुरी येथील अजय जयदेवराव तायडे यांना मिळाला असून, २३ वर्षांचे तरुण लाखपुरी सरपंचपदावर विराजमान झाले, तर त्याच पाठोपाठ हातगाव सरपंच अक्षय जितेंद्र राऊत व धानोरा पाटेकर येथील मोनिका अक्षय म्हसाये हे केवळ २५ व्या वर्षी सरपंचपदी आरूढ झाले. यामध्ये २३ ते ३५ वर्षे वयोगटातील १२ सरपंच व ११ उपसरपंचांचा समावेश आहे. यामध्ये लाखपुरी अजय जयदेवराव तायडे (२३), हातगाव अक्षय जितेंद्र राऊत (२५), धानोरा पाटकर मोनिका अक्षय म्हसाये (२५), कवठा खोलापूर आरती प्रफुलराव देशमुख (३०), निंभा जयश्री प्रदीप फुके (३०), जामठी बु. अर्चना संदीप तायडे (३१), धामोरी बु. पुष्पा सतीश निलखन (३२), बपोरी मोनिका पंकज खंडारे (३२), मोहखेड सुवर्णा चंद्रशेखर लांडे (३२), खांदला सविता राजकुमार पंडित (३३), कवठा सोपीनाथ अतुल सुभाष बाजड (३५), हिरपूर अमोल छत्रपती गडवे (३५), टिपटाळा जयश्री सुनील डोंगरे (३६), सांगवी अर्चना दिलीप खोकले (३७), सिरसो जयकुमार महादेवराव तायडे (३७), पारद विनोद नारायण मानकर (३७), गोरेगाव यशोदा देवानंद सरदार (३८), कुरुम अतुल दादाराव वाट (४०) हे सरपंच म्हणून विराजमान झाले आहेत, तर उपसरपंच पारद चंदा नाजूक खंडारे (२९), दुर्गवाडा चित्रा सतीश पंडित (२७), कवठा सोपीनाथ शुभांगी प्रसिक मेश्राम (२६), हिरपूर काजोल रवींद्र शिंदे (२७), गोरेगाव शेख निकत अंजूम बयाजोद्दीन (३०), सांगवी प्रशांत सुरेशराव खांडेकर (३६), टिपटाळा प्रियंका अमोल गावंडे (३०), खांदला माधुरी विलास पिंगळे(३९), निंभा अनुप प्रभाकर चंदुले (३३), विराहित मनोज अरुण राऊत (३७), मोहखेड श्रीधर अनिल कांबे(३१), धानोरा पाटेकर मंगला देवानंद उके (४०), कंझरा नीलेश शंकरराव गिरी (४०) या नवख्या व तरुणाईला संधी देण्यात आली असली तरी मिळालेल्या संधीचे काय फलित करून घेतात याकडेच गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे. यातील अनेक सरपंच, उपसरपंच अविवाहित असल्याने गावाचा कारभार कशा पद्धतीने हाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.