शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतची धुरा तरुणाईच्या खांद्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:34 IST

तालुक्यातील ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यावेळी निवडणूक झालेल्या २९ ग्रामपंचायतींपैकी सोनोरी (बपोरी) ...

तालुक्यातील ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यावेळी निवडणूक झालेल्या २९ ग्रामपंचायतींपैकी सोनोरी (बपोरी) व मोहखेड या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होऊन गेल्या १५ जानेवारीला २७ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी पार पडली, उर्वरित १५ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचपदासाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सर्वांत कमी वयाचे सरपंच म्हणून लाखपुरी येथील अजय जयदेवराव तायडे यांना मिळाला असून, २३ वर्षांचे तरुण लाखपुरी सरपंचपदावर विराजमान झाले, तर त्याच पाठोपाठ हातगाव सरपंच अक्षय जितेंद्र राऊत व धानोरा पाटेकर येथील मोनिका अक्षय म्हसाये हे केवळ २५ व्या वर्षी सरपंचपदी आरूढ झाले. यामध्ये २३ ते ३५ वर्षे वयोगटातील १२ सरपंच व ११ उपसरपंचांचा समावेश आहे. यामध्ये लाखपुरी अजय जयदेवराव तायडे (२३), हातगाव अक्षय जितेंद्र राऊत (२५), धानोरा पाटकर मोनिका अक्षय म्हसाये (२५), कवठा खोलापूर आरती प्रफुलराव देशमुख (३०), निंभा जयश्री प्रदीप फुके (३०), जामठी बु. अर्चना संदीप तायडे (३१), धामोरी बु. पुष्पा सतीश निलखन (३२), बपोरी मोनिका पंकज खंडारे (३२), मोहखेड सुवर्णा चंद्रशेखर लांडे (३२), खांदला सविता राजकुमार पंडित (३३), कवठा सोपीनाथ अतुल सुभाष बाजड (३५), हिरपूर अमोल छत्रपती गडवे (३५), टिपटाळा जयश्री सुनील डोंगरे (३६), सांगवी अर्चना दिलीप खोकले (३७), सिरसो जयकुमार महादेवराव तायडे (३७), पारद विनोद नारायण मानकर (३७), गोरेगाव यशोदा देवानंद सरदार (३८), कुरुम अतुल दादाराव वाट (४०) हे सरपंच म्हणून विराजमान झाले आहेत, तर उपसरपंच पारद चंदा नाजूक खंडारे (२९), दुर्गवाडा चित्रा सतीश पंडित (२७), कवठा सोपीनाथ शुभांगी प्रसिक मेश्राम (२६), हिरपूर काजोल रवींद्र शिंदे (२७), गोरेगाव शेख निकत अंजूम बयाजोद्दीन (३०), सांगवी प्रशांत सुरेशराव खांडेकर (३६), टिपटाळा प्रियंका अमोल गावंडे (३०), खांदला माधुरी विलास पिंगळे(३९), निंभा अनुप प्रभाकर चंदुले (३३), विराहित मनोज अरुण राऊत (३७), मोहखेड श्रीधर अनिल कांबे(३१), धानोरा पाटेकर मंगला देवानंद उके (४०), कंझरा नीलेश शंकरराव गिरी (४०) या नवख्या व तरुणाईला संधी देण्यात आली असली तरी मिळालेल्या संधीचे काय फलित करून घेतात याकडेच गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे. यातील अनेक सरपंच, उपसरपंच अविवाहित असल्याने गावाचा कारभार कशा पद्धतीने हाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.