शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतची धुरा तरुणाईच्या खांद्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:34 IST

तालुक्यातील ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यावेळी निवडणूक झालेल्या २९ ग्रामपंचायतींपैकी सोनोरी (बपोरी) ...

तालुक्यातील ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यावेळी निवडणूक झालेल्या २९ ग्रामपंचायतींपैकी सोनोरी (बपोरी) व मोहखेड या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होऊन गेल्या १५ जानेवारीला २७ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी पार पडली, उर्वरित १५ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचपदासाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सर्वांत कमी वयाचे सरपंच म्हणून लाखपुरी येथील अजय जयदेवराव तायडे यांना मिळाला असून, २३ वर्षांचे तरुण लाखपुरी सरपंचपदावर विराजमान झाले, तर त्याच पाठोपाठ हातगाव सरपंच अक्षय जितेंद्र राऊत व धानोरा पाटेकर येथील मोनिका अक्षय म्हसाये हे केवळ २५ व्या वर्षी सरपंचपदी आरूढ झाले. यामध्ये २३ ते ३५ वर्षे वयोगटातील १२ सरपंच व ११ उपसरपंचांचा समावेश आहे. यामध्ये लाखपुरी अजय जयदेवराव तायडे (२३), हातगाव अक्षय जितेंद्र राऊत (२५), धानोरा पाटकर मोनिका अक्षय म्हसाये (२५), कवठा खोलापूर आरती प्रफुलराव देशमुख (३०), निंभा जयश्री प्रदीप फुके (३०), जामठी बु. अर्चना संदीप तायडे (३१), धामोरी बु. पुष्पा सतीश निलखन (३२), बपोरी मोनिका पंकज खंडारे (३२), मोहखेड सुवर्णा चंद्रशेखर लांडे (३२), खांदला सविता राजकुमार पंडित (३३), कवठा सोपीनाथ अतुल सुभाष बाजड (३५), हिरपूर अमोल छत्रपती गडवे (३५), टिपटाळा जयश्री सुनील डोंगरे (३६), सांगवी अर्चना दिलीप खोकले (३७), सिरसो जयकुमार महादेवराव तायडे (३७), पारद विनोद नारायण मानकर (३७), गोरेगाव यशोदा देवानंद सरदार (३८), कुरुम अतुल दादाराव वाट (४०) हे सरपंच म्हणून विराजमान झाले आहेत, तर उपसरपंच पारद चंदा नाजूक खंडारे (२९), दुर्गवाडा चित्रा सतीश पंडित (२७), कवठा सोपीनाथ शुभांगी प्रसिक मेश्राम (२६), हिरपूर काजोल रवींद्र शिंदे (२७), गोरेगाव शेख निकत अंजूम बयाजोद्दीन (३०), सांगवी प्रशांत सुरेशराव खांडेकर (३६), टिपटाळा प्रियंका अमोल गावंडे (३०), खांदला माधुरी विलास पिंगळे(३९), निंभा अनुप प्रभाकर चंदुले (३३), विराहित मनोज अरुण राऊत (३७), मोहखेड श्रीधर अनिल कांबे(३१), धानोरा पाटेकर मंगला देवानंद उके (४०), कंझरा नीलेश शंकरराव गिरी (४०) या नवख्या व तरुणाईला संधी देण्यात आली असली तरी मिळालेल्या संधीचे काय फलित करून घेतात याकडेच गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे. यातील अनेक सरपंच, उपसरपंच अविवाहित असल्याने गावाचा कारभार कशा पद्धतीने हाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.